शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

२० हजार बालकांना जेवण देणाऱ्या उपाशी

By admin | Updated: March 12, 2017 00:23 IST

तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत जिल्हा परिषदेच्या १३८ शाळा, खाजगी अनुदानीत ३७ असे १७५ शाळा आहेत.

अल्पसे मानधन : चार महिन्यांपासून मोबदलाच नाही अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत जिल्हा परिषदेच्या १३८ शाळा, खाजगी अनुदानीत ३७ असे १७५ शाळा आहेत. इयत्ता १ ली ते ८ वीच्या २० हजार २९७ विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देण्याचे काम ३४० स्वयंपाकी व मदतनीस एक हजाराच्या अल्प मानधनावर करीत आहेत. परंतु या महिलांना मागील ४ महिन्यापासून त्यांच्या कामाचा मोबदला न मिळाल्याने त्यांच्या कुटूंबावर उमासमारीची वेळ आली. सर्वशिक्षा अभियानांतर्गत मागील काही वर्षापासून शालेय पोषण आहार योजना शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांची गळती थांबावी, गावातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये, सामान्य विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेमध्ये शासनाच्या वतीने मध्यान्ह भोजनाची व्यवस्था करण्यात आली. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गावातील महिलांची स्वयंपाकी व मदतनिस म्हणून शाळा समिती मार्फत निवड केली जाते. निवड झालेल्या स्वयंपाकी व मदतनीस महिलांना एका महिन्यापोटी सरसकट एक हजार रुपये असे अल्पशे मानधन दिले जाते. देण्यात येणारा हा तुटपुंजा मोबदलाही दर महिन्याला त्यांच्या हातात मिळत नाही. मोलमजूरी करणाऱ्या विधवा महिला आहार शिजविण्याच्या कामावर येतात. त्या महिला दिवसभर राबून दर महिन्याला हजाराची नोटाच्या मोबदल्यासाठी पंचायत समितीच्या पायऱ्याही झिजवतात. दिवसापोटी ३० रुपये ३३ पैसे रोजी घेऊन प्राथमिक शाळेतील मुलांना दुपारचे जेवण वाढणाऱ्या स्वयंपाकी व मदतनिस आज आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवतील याचेही आत्मचिंतन सरकारने करणे गरजेचे आहे. दर महिन्यापोटी मोबदला मिळत नाही अशी व्यथा स्वयंपाकीन महिलांनी मांडली. महिन्यापोटी एक हजार रुपयाचा मानधन काढण्याची तसदी संबधीत विभाग घेत नाही. गेल्या आॅक्टोबर महिन्यापासून शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाच्या मोबदल्याचे पैसे अजून पावेतो मिळाले नाही. शाळेत मध्यान्ह भोजन शिजविण्याचे काम करताना इतर दुसरे काम करता येत नाही. हीच अल्पशी मजूरी त्या महिलांच्या कुटूंबाच्या चरितार्थाची शिदोरी आहे. चार-चार महिन्याचे मानधन थकीत असल्याने त्या सामान्य महिलांवर आज उपासमारीची पाळी आल्याचे चित्र आहे. पैशाअभावी येणाऱ्या सणावर पाणी फेरावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)