शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जिल्हा परिषदेतील शेकडो कर्मचारी दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या किंवा अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने विशेष मागास प्रवर्गाचे किंवा बिगर मागास वर्गाचे प्रमाणपत्र सादर केलेले किंवा अनुसूूचित जमातीचा दावा सोडून दिलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आता आपली नोकरी जाणार या भितीने ग्रासले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनोकरी जाण्याची भीती : जात प्रमाणपत्र सादर न करणे येणार अंगलट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विविध प्रवर्गाच्या आरक्षणावर अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत आहे. परंतु अद्याप जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या किंवा अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने विशेष मागास प्रवर्गाचे किंवा बिगर मागास वर्गाचे प्रमाणपत्र सादर केलेले किंवा अनुसूूचित जमातीचा दावा सोडून दिलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आता आपली नोकरी जाणार या भितीने ग्रासले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरल्याचे दिसून येत आहे.सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र.८९२८/२०१५ व इतर याचिकांमध्ये ६ जुलै रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबतचे महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८/प्रक्र.३०८/१६ ब/सामान्य प्रशासन महाराष्ट्र शासन मुंबई ४०००३२ दि.२१ डिसेंबर २०१९८ अन्वये १९९५ नंतर अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, इतर मागासर्वीय, विशेष मागास वर्गीय, या अंशत: विविध प्रवर्गाच्या आरक्षणावर नोकरी मिळविलेल्या राज्य शासनाच्या अखत्यारितील अधिकारी कर्मचाऱ्यांने आपले जात वैधता प्राणपत्र सादर करणे आवश्यक आहे.नोकरीवर रुजूृ झाल्यानंतर ३ महिन्यांत हे प्रमाणपत्र द्यावे असा सध्याचा शासन आदेश आहे. मात्र सन १९९५ नंतर रुजू झालेल्या बºयाच कर्मचाºयांनी अद्याप हे प्रमाणपत्र दिलेले नाही. किंवा काहींनी सेवा पुस्तिकेत जात प्रवर्ग बदलल्याच्या चर्चा ऐकावयास मिळत आहे. परंतु २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयातील (ब) जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने किंवा जातीचा प्रवर्ग बदलल्याने सदर कर्मचाºयांच्या सेवेला संरक्षण देण्यात येऊ नये असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे निश्चितच अनु. जमातीला न्याय मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.सन २०१० ला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा यांनी जात-प्रमाणपत्र (वैधतेचे) सादर करण्याचे आदेश काढले होते. परंतु सदर आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी न झाल्याचे बोलले जात आहे. परिणामी जमातीच्या जागेवरील कार्यरत अधिकारी-कर्मचारी आजही कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी सदर प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात याकडे मागासवर्गीय कर्मचाºयांचे लक्ष लागले आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावतंत्रामुळे कित्येक वेळा वरिष्ठ अधिकाºयांना निर्णय घेणे जिकरीचे असते. परंतु अधिकाºयांची सचोटी, निष्ठा व मागासवर्गीयांचे हित जोपासण्याच्या भावनेतून निश्चितच सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे बोलले जात आहे.जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांकर्मचाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त शिक्षण विभागात असून बाकी विभागातील कर्मचाºयांना पकडून ही संख्या शेकडोंच्या घरात आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची सध्या झोप उडाली आहे.सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत तातडीने करण्याचे शासन निर्णय असल्याने प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद