शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

शेकडो एकरातील धान भरलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:19 IST

शेतकरी विश्वासाचे बियाणे म्हणून महाबीजचे बियाणे खरेदी करतात मात्र यंदा याच बियाण्यांनी शेतकºयांचा घात केला. शेकडो एकरात लागवड केलेले महाबीजचे सह्याद्री धान भरलेच नाही. त्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक सकंट ओढावले असून पूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : महाबीजने विश्वासघात केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : शेतकरी विश्वासाचे बियाणे म्हणून महाबीजचे बियाणे खरेदी करतात मात्र यंदा याच बियाण्यांनी शेतकऱ्यांचा घात केला. शेकडो एकरात लागवड केलेले महाबीजचे सह्याद्री धान भरलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक सकंट ओढावले असून पूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागले आहे.प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील वडेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पाऊस समाधानकारक झाल्याचे पाहून महागडे व विश्वासाचे बियाणे म्हणून महाबीजचे सह्याद्री ४ चे धानाचे बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी केले. सदर बियाणांचे रोप व्यवस्थीत आल्यानंतर शेतकऱ्यांनी पिकाची रोवणी केली. प्रमाणानुसार खताची मात्रा दिली. अनेक शेतकऱ्यांनी श्री पध्दतीने धान पिकाची लागवड केली.कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सदर धानाची लागवड करण्यात आली. वेळेवर धानाला लोंब लागले परंतू २० ते २५ दिवसांचा कालावधी लोटला तरी धानाचे लोंब भरलेच नाही. पोसट लोंब निघाल्यामुळे शेतकऱ्यांना धानाचे उत्पादन घेताच आले नाही. या धानापासून केवळ तणसीच शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.कोयलारी येथील डॉ. मुकेश पटले यांनी त्यांच्या सहा एकर शेतात सह्याद्री ४ या धानाची लागवड केली. पिकाला वेळोवेळी खत व पाणी दिले. मात्र लोंब येवून सुध्दा धान भरल्यामुळे सदर शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. दरम्यान याची तक्रार तालुका कृषी अधिकारी व महाबीजकडे करण्यात आली आहे.याप्रकरणी संबंधित कृषी अधिकारी व महाबीजने लक्ष देवून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी मुकेश पटले, चंद्रराज कटरे व इतर शेतकऱ्यांनी केली आहे.सह्याद्री ४ हे महाबीजचे बियाणे १६ जूनला नागपुरे कृषी केंद्र बिर्सी येथून ०५४४६ या बॅच क्रमाकांचे १२ पोती खरेदी करुन त्याची शेतात लागवड केली. मात्र धानाचे लोंब भरलेच नाही त्यामुळे पूर्ण हंगामाला मुकावे लागले असून मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे महाबीजने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी.-डॉ. मुकेश पटले, शेतकरीशेतकऱ्यांनी सह्याद्री ४ या महाबीजच्या बियाणांची व्यवस्थीत पेरणी करुन पीक लावले होते. पीक उत्तम होते. किडरोगांचा प्रादुर्भाव देखील नव्हता. मात्र धान भरलेच नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.- एम.डी.डोंगरवार, कृषी सहायक.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती