शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो एकरातील धान भरलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:19 IST

शेतकरी विश्वासाचे बियाणे म्हणून महाबीजचे बियाणे खरेदी करतात मात्र यंदा याच बियाण्यांनी शेतकºयांचा घात केला. शेकडो एकरात लागवड केलेले महाबीजचे सह्याद्री धान भरलेच नाही. त्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक सकंट ओढावले असून पूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : महाबीजने विश्वासघात केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : शेतकरी विश्वासाचे बियाणे म्हणून महाबीजचे बियाणे खरेदी करतात मात्र यंदा याच बियाण्यांनी शेतकऱ्यांचा घात केला. शेकडो एकरात लागवड केलेले महाबीजचे सह्याद्री धान भरलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक सकंट ओढावले असून पूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागले आहे.प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील वडेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पाऊस समाधानकारक झाल्याचे पाहून महागडे व विश्वासाचे बियाणे म्हणून महाबीजचे सह्याद्री ४ चे धानाचे बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी केले. सदर बियाणांचे रोप व्यवस्थीत आल्यानंतर शेतकऱ्यांनी पिकाची रोवणी केली. प्रमाणानुसार खताची मात्रा दिली. अनेक शेतकऱ्यांनी श्री पध्दतीने धान पिकाची लागवड केली.कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सदर धानाची लागवड करण्यात आली. वेळेवर धानाला लोंब लागले परंतू २० ते २५ दिवसांचा कालावधी लोटला तरी धानाचे लोंब भरलेच नाही. पोसट लोंब निघाल्यामुळे शेतकऱ्यांना धानाचे उत्पादन घेताच आले नाही. या धानापासून केवळ तणसीच शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.कोयलारी येथील डॉ. मुकेश पटले यांनी त्यांच्या सहा एकर शेतात सह्याद्री ४ या धानाची लागवड केली. पिकाला वेळोवेळी खत व पाणी दिले. मात्र लोंब येवून सुध्दा धान भरल्यामुळे सदर शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. दरम्यान याची तक्रार तालुका कृषी अधिकारी व महाबीजकडे करण्यात आली आहे.याप्रकरणी संबंधित कृषी अधिकारी व महाबीजने लक्ष देवून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी मुकेश पटले, चंद्रराज कटरे व इतर शेतकऱ्यांनी केली आहे.सह्याद्री ४ हे महाबीजचे बियाणे १६ जूनला नागपुरे कृषी केंद्र बिर्सी येथून ०५४४६ या बॅच क्रमाकांचे १२ पोती खरेदी करुन त्याची शेतात लागवड केली. मात्र धानाचे लोंब भरलेच नाही त्यामुळे पूर्ण हंगामाला मुकावे लागले असून मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे महाबीजने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी.-डॉ. मुकेश पटले, शेतकरीशेतकऱ्यांनी सह्याद्री ४ या महाबीजच्या बियाणांची व्यवस्थीत पेरणी करुन पीक लावले होते. पीक उत्तम होते. किडरोगांचा प्रादुर्भाव देखील नव्हता. मात्र धान भरलेच नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.- एम.डी.डोंगरवार, कृषी सहायक.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती