शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार अजूनही उघडयावरच

By admin | Updated: July 10, 2014 23:39 IST

जिल्ह्यातील सर्व गटई कामगारांना समाजकल्याण विभागाकडून लोखंडी स्टॉल मिळून सुध्दा आजही जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार रस्त्याच्या किंवा चौकाच्या कोपऱ्यात उघड्यावर आपले ठाण मांडून बसत आहेत.

गोंदिया : जिल्ह्यातील सर्व गटई कामगारांना समाजकल्याण विभागाकडून लोखंडी स्टॉल मिळून सुध्दा आजही जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार रस्त्याच्या किंवा चौकाच्या कोपऱ्यात उघड्यावर आपले ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे त्यांना वर्षभर उन-पावसाचा तडाखा सहन करावा लागत आहे. त्यांना मिळालेले लोखंडी स्टॉल कचऱ्यात धूळखात पडलेले आहेत. त्यांना जंग लागल्यामुळे निकामी व नष्ठ होण्याच्या मार्गावर आहेत. ही परिस्थिती पाहून असे वाटते की गटई कामगारांना शासनाकडून मिळणारी मदत वाया जात असते. तर चर्मकारांची आर्थिक परिस्थिती जैसे थे दिसून येत आहे.गटई कामगार उघड्यावर बसून जोडे-चपला दुरूस्ती किंवा विक्री करीत असल्याचे मुख्य कारण असे की ज्या लोकांच्या घरासमोर किंवा जागे समोर ते आपले लोखंडी स्टॉल मांडू इच्छितात ते लोक त्या ठिकाणी जागा देत नाही. त्यांना असे वाटते की एक वेळा लोखंडी स्टॉल ठेवायला जागा दिली तर त्यावर ते कायमचा आपला हक्कम जमावतील व भविष्यात त्यांना हटविता येवू शकणार नाही. काही जागा मालक तर असे आहेत की, आपल्या जागेसमोर त्यांना उघड्यावर सुध्दा दुकान मांडू देत नाही. एवढेच नाहीतर आपल्या घरासमोर असलेल्या शासकीय जागेवर सुध्दा बसू देत नाही. त्यामुळे अनेकांना सोयीस्कर ठिकाणी दुकान मांडण्यासाठी मोठी पंचाईत होत असते.चपला-जोडे विकण्याचा व तयार करण्याचा व्यवसाय हा आता एका जणापुरता मर्यादीत राहीला नसून कोणीही या व्यवसायात विनियोग करून अर्थार्जन करू शकतो. त्याचप्रमाणे चर्मकार लोक चर्मकाम करण्याच्या पूर्ती स्वत:ला अकडवून न ठेवता वाटेल तो व्यवसाय करून आपली आर्थिक परिस्थती भक्कम करू लागले आहेत. पिढ्यांपिढ्यापासून अनेक कुटुंब हाच व्यवसाय करीत असल्याचे दिसते. शासन त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करीत आहे. समाज ग्रामीण भागात सामाजीक प्रवाहापासून वेगळाच राहतो. इतर समाजीत लोक त्यांना आपल्या कोणत्याही काम काजात सम्मिलीत करीत नाही किंवा त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत नाही. त्यामुळे गावातील सामाजीक ऐक्य निर्माण होण्यास अडचण निर्माण होत असते. चर्मकामगारांचा अनुसूचीत जातीमध्ये समावेश असून त्यांच्यावर जातीय अत्याचार झाल्यास अ‍ॅट्रासिटी कायद्याअंतर्गत आपले संरक्षण करून ते सन्मानाने जगू शकतात. परंतू या समाजाचे लोक मृदू स्वाभावाचे व समाजातील इतर लोकांशी नमते घेवून जीवन यापन करीत असल्याने त्यांना कोणी दुकान लावायला जागा देत नाही. (तालुका प्रतिनिधी)