शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

मुख्य मार्गावरील खड्डे पुन्हा किती बळी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 20:48 IST

शहरातील मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे असल्यामुळे या मार्गावरुन वाहने चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देअपघातात वाढ : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतआमगाव : शहरातील मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे असल्यामुळे या मार्गावरुन वाहने चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतसुध्दा वाढ झाली असून आत्तापर्यंत सात ते आठ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे पुन्हा किती जणांचे बळी घेणार, असा संतप्त सवाल केला जात आहे.आमगाव शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे विविध वस्तूंच्या खरेदीसाठी परिसरातील नागरिक आमगाव येथे येतात. त्यामुळे येथे सतत वर्दळ असते. आमगाव राज्य मार्गावर वाहनांची सुध्दा दिवसभर वर्दळ असते. आमगाव ते सालेकसा राज्य मार्ग, कामठा, गोंदिया, देवरी व शहरातील नटराज मार्ग ते गुरुदेव चौक मार्गावरील रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्त्यांवरील एक ते दीड फुटापर्यंतचे खड्डे, डांबरीकरण रस्त्यांवरील उखडलेल्या खड्ड्यांमधील बोल्डर, गिट्टी यामुळे वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.मागील महिनाभराच्या कालावधीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चार जणांना जीव गमवावा लागला. मात्र यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केलेले नाही.शहरातील आंबेडकर चौक, शेंडे मार्केट मार्ग, नटराज मार्ग, कामठा चौक या मार्गांवरील खड्ड्यांमुळे वाहने अनियंत्रित होवून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रस्ते विकासाची कामे सुरु आहेत. परंतु आमगाव शहर व सीमा राज्य मार्ग अद्यापही विकास कामांपासून वंचित आहेत. त्यासाठी संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.जखमींना वेळेवर मदतीचा हात द्यामार्गावरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी वाहन चालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. अनेक मार्गावर अपघातातील जखमींना वेळेवर मदत मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम त्वरित सुरू करावे. जखमींच्या मदतीसाठी नागरिकांनी मदतीचा हात द्यावा, अशी मागणी युवा शक्ती फाऊंडेशनच्या गुणीराज पटले, सुशीला शिव यांनी केली आहे.