शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

प्रधानमंत्री सन्मान योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:06 IST

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. तसेच निवडणुकीत याचा लाभ मिळवून घेण्यासाठी पहिला हप्ता सुध्दा मार्च महिन्यात जमा करण्यात येईल, असे सांगितले होते.

ठळक मुद्देप्रशासनच अनभिज्ञ : १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. तसेच निवडणुकीत याचा लाभ मिळवून घेण्यासाठी पहिला हप्ता सुध्दा मार्च महिन्यात जमा करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र आतापर्यंत किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आला याची माहिती जिल्हा प्रशासनाकडेच नसून प्रशासनच यापासून अनभिज्ञ असल्याची बाब पुढे आली आहे.केंद्र सरकारने यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली होती. तसेच एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका असल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वी या योजनेचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता पात्र शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याची लगईघाई केली. एवढेच नव्हे तर प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील १५ ते २० शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करुन फोटो काढण्यात आले. विशेष म्हणजे यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेला दिवसरात्र जुपंण्यात आले. पण त्यानंतर या योजनेतंर्गत किती शेतकºयांना याचा लाभ मिळाला याची माहिती सध्या जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही.गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ८५ हजार खातेदार शेतकरी आहे. यापैकी १ लाख ३५ हजार ७८५ शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर शेती आहे. त्यामुळे एवढेच शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेस पात्र ठरले होते. महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेने पात्र शेतकºयांची यादी शासनाच्या एनआयसी या संकेतस्थळावर अपलोड केली.त्यानंतर ३ हजार ४०१ शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात येईल, असा संदेश सुध्दा या विभागाला प्राप्त झाला. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत या योजनेतंर्गत किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा झाला याची कुठलीही माहिती या दोन्ही विभागाकडे उपलब्ध नसल्याचे या विभागाच्या अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले.त्यामुळे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील किती शेतकºयांना मिळाला यापासून स्वत: जिल्हा प्रशासनच अनभिज्ञ असल्याची बाब पुढे आली आहे.पैसे जमा करण्याची माहिती जिल्हा प्रशासनाला नाहीमहसूल आणि कृषी विभागाने दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांची संपूर्ण माहिती एनआयसी या संकेतस्थळावर अपलोड केली. त्यानंतर शासनाने किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचा पहिला हप्ता जमा केला याची यादी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. मात्र तसे करणे टाळले जात असल्याने जिल्हा प्रशासनाला विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.महसूल व कृषी विभाग याद्या तयार करण्यापुरताचप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांची यादी तयार करण्यासाठी शासनाने या दोन्ही विभागाच्या अधिकाºयांना दिवसरात्र राबवून घेतले. मात्र यानंतर त्यांना किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला याची सुध्दा माहिती उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे या विभागाचे काम केवळ याद्या तयार करण्यापुरतेच असल्याचे दिसून येते.आचारसंहितेमुळे काम थंडबस्त्यातप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आचारसंहिता लागण्यापूर्वी पहिला हप्ता जमा करण्यासाठी लगीनघाई सुरू होती. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने सध्या हे काम थंडबस्त्यात असल्याची माहिती आहे.हजारो शेतकरी संभ्रमातप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ८७५ शेतकरी पात्र ठरले. मात्र अद्यापही त्यांना पहिला २ हजार रुपयांचा हप्ता जमा होण्याच्या संदेश आला नाही. त्यामुळे हप्त्याची रक्कम बँक खात्यावर जमा होणार की अशा संभ्रमात शेतकरी आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती