शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

प्रधानमंत्री सन्मान योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:06 IST

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. तसेच निवडणुकीत याचा लाभ मिळवून घेण्यासाठी पहिला हप्ता सुध्दा मार्च महिन्यात जमा करण्यात येईल, असे सांगितले होते.

ठळक मुद्देप्रशासनच अनभिज्ञ : १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. तसेच निवडणुकीत याचा लाभ मिळवून घेण्यासाठी पहिला हप्ता सुध्दा मार्च महिन्यात जमा करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र आतापर्यंत किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आला याची माहिती जिल्हा प्रशासनाकडेच नसून प्रशासनच यापासून अनभिज्ञ असल्याची बाब पुढे आली आहे.केंद्र सरकारने यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली होती. तसेच एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका असल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वी या योजनेचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता पात्र शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याची लगईघाई केली. एवढेच नव्हे तर प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील १५ ते २० शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करुन फोटो काढण्यात आले. विशेष म्हणजे यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेला दिवसरात्र जुपंण्यात आले. पण त्यानंतर या योजनेतंर्गत किती शेतकºयांना याचा लाभ मिळाला याची माहिती सध्या जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही.गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ८५ हजार खातेदार शेतकरी आहे. यापैकी १ लाख ३५ हजार ७८५ शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर शेती आहे. त्यामुळे एवढेच शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेस पात्र ठरले होते. महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेने पात्र शेतकºयांची यादी शासनाच्या एनआयसी या संकेतस्थळावर अपलोड केली.त्यानंतर ३ हजार ४०१ शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात येईल, असा संदेश सुध्दा या विभागाला प्राप्त झाला. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत या योजनेतंर्गत किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा झाला याची कुठलीही माहिती या दोन्ही विभागाकडे उपलब्ध नसल्याचे या विभागाच्या अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले.त्यामुळे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील किती शेतकºयांना मिळाला यापासून स्वत: जिल्हा प्रशासनच अनभिज्ञ असल्याची बाब पुढे आली आहे.पैसे जमा करण्याची माहिती जिल्हा प्रशासनाला नाहीमहसूल आणि कृषी विभागाने दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांची संपूर्ण माहिती एनआयसी या संकेतस्थळावर अपलोड केली. त्यानंतर शासनाने किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचा पहिला हप्ता जमा केला याची यादी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. मात्र तसे करणे टाळले जात असल्याने जिल्हा प्रशासनाला विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.महसूल व कृषी विभाग याद्या तयार करण्यापुरताचप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांची यादी तयार करण्यासाठी शासनाने या दोन्ही विभागाच्या अधिकाºयांना दिवसरात्र राबवून घेतले. मात्र यानंतर त्यांना किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला याची सुध्दा माहिती उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे या विभागाचे काम केवळ याद्या तयार करण्यापुरतेच असल्याचे दिसून येते.आचारसंहितेमुळे काम थंडबस्त्यातप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आचारसंहिता लागण्यापूर्वी पहिला हप्ता जमा करण्यासाठी लगीनघाई सुरू होती. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने सध्या हे काम थंडबस्त्यात असल्याची माहिती आहे.हजारो शेतकरी संभ्रमातप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ८७५ शेतकरी पात्र ठरले. मात्र अद्यापही त्यांना पहिला २ हजार रुपयांचा हप्ता जमा होण्याच्या संदेश आला नाही. त्यामुळे हप्त्याची रक्कम बँक खात्यावर जमा होणार की अशा संभ्रमात शेतकरी आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती