शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
3
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
4
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
5
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
6
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
7
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
8
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
9
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
10
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
11
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
12
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
14
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
15
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
16
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; एक तरुण आला आणि...
17
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
18
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
19
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
20
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?

हिरवी मिरची झोंबू लागली, 80 रूपयांवर भाव कसा परवडेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

भाजीपाला आता मागे राहिला नसून भाजीपाल्याचे दरही चांगलेच वधारले आहे. आज बाजारात ४०-५० रुपयांच्या आत एकही भाजी मिळत नाही अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे, हिरवी मिरचीचे भाव सध्या ८० रुपयांवर पोहचले असून मिरची चांगलीच तिखट झाली आहे. तर हिरव्या भाज्या आता संपत आल्याने त्यांचे दर वधारले आहे. किराणा माल वधारला असतानाच स्वयंपाक घराचे बजेट बिघडले असून, त्यात आता भाजीपाल्याचे दर ऐकताच घाम फुटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आजघडीला प्रत्येकच वस्तूचे दर वधारले असून सर्वसामान्यांना आता बाजारात जाणे म्हणताच धडकी भरू लागते. रशिया व युक्रेनमधील युद्धाचे पडसाद आता उमटू लागले असून खाद्यतेलाचे भाव वधारल्यानंतर आता किराणामालही वधारत चालला आहे. यात भाजीपाला आता मागे राहिला नसून भाजीपाल्याचे दरही चांगलेच वधारले आहे. आज बाजारात ४०-५० रुपयांच्या आत एकही भाजी मिळत नाही अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे, हिरवी मिरचीचे भाव सध्या ८० रुपयांवर पोहचले असून मिरची चांगलीच तिखट झाली आहे. तर हिरव्या भाज्या आता संपत आल्याने त्यांचे दर वधारले आहे. किराणा माल वधारला असतानाच स्वयंपाक घराचे बजेट बिघडले असून, त्यात आता भाजीपाल्याचे दर ऐकताच घाम फुटत आहे. अशात मात्र सर्वसामान्यांनी काय खावे असा प्रश्न पडतो. शासनाने महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा ही एकच मागणी जनता करीत आहे. 

पालेभाजीही महागली हिवाळा म्हणजे पालेभाज्यांचा काळ असतो मात्र आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्यो पालेभाज्यांचा काळ संपला आहे. परिणामी पालेभाज्यांची बाजारात आवक कमी झाली आहे. म्हणूनच आता पालेभाज्या चांगल्याच महागल्या आहेत. 

शेतकऱ्यांचे गणित बसेना 

भाजीपाला लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. शिवाय मजुरीही जास्त लागत असल्याने शेतकरी साधारणत: भाजीपाला लागवड करीत नाही. त्यातल्या त्यात वातावरणात बदल झाल्यास रोगराईमुळे सर्व मेहनत वाया जाते. म्हणूनच भाजीपाला लागवड परवडत नाही. - मंसाराम चिखलोंडे 

यंदा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे भाजीपाला पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. भाजीपाला लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. मात्र तेवढीच मेहनत असून रोगराई आल्यास हाती काहीच येत नाही. यामुळेच भाजीपाला लागवड करणे धोक्याचे असून परवडणारे ठरत नाही. - निहारीलाल दमाहे 

ग्राहकांनाही परवडेना भाजीपाला

खाद्य तेल व किराणामालाचे दर अवाढव्य वाढले असून सर्वसामान्यांना परवडणारे राहिलेले नाही. त्यात आता भाजीपाला वधारल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. - देवा शेंडे 

आता उन्हाळा लागल्याने हिरवा भाजीपाला मिळणार नाही. यामुळेच आवक कमी झाली असून त्यांचे दर वदारले आहे. शिवाय सर्वच भाजीपाला महागला आहे. सर्वसामान्यांनी काय खावे असा प्रश्न पडतो. - महेंद्र तिडके 

 

टॅग्स :vegetableभाज्या