शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

नऊ दिवसांत कशी होणार २३ लाख क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST

गोंदिया : यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीचा तिढा शासन आणि प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सुरुवातीपासून वाढला आहे. याचा फटका मात्र ...

गोंदिया : यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीचा तिढा शासन आणि प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सुरुवातीपासून वाढला आहे. याचा फटका मात्र रब्बी धान उत्पादक हजारो शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. रब्बीच्या धान खरेदीसाठी केवळ नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना, आतापर्यंत केवळ ७ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. २३ लाख क्विंटल धान खरेदी होणे अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे नऊ दिवसांत एवढी धान खरेदी होणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहावे लागणार आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत दरवर्षी खरिपानंतर रब्बीतील धानाची शासकीय धान खरेदी केली जाते. या धान खरेदीची मुदत ३० जूनपर्यंत असते. याचदरम्यान पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने शासकीय धान खरेदी बंद केली जाते. मात्र यंदा मागील खरीप हंगामातील धानाची उचल झाली नसल्याने रब्बीतील धान खरेदी सुरू होण्यास विलंब झाला आहे. गोदामे रिकामी झाली नसल्याने ३७ लाख क्विंटल धान गोदामात पडले आहे. हीच स्थिती पूर्व विदर्भातील उर्वरित पाच जिल्ह्यांची आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली, तर रब्बी धान खरेदीचा तिढा सुटला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना घरी धान ठेवण्यासाठी जागा नाही, शिवाय धानाची विक्री करूनच ते खरिपाचे नियोजन करीत असतात. त्यामुळे दोन्हीकडून त्यांची कोंडी झाली आहे. परिणामी त्यांना खासगी व्यापाऱ्यांना १३०० रुपये प्रति क्विंटल दराने धानाची विक्री करावी लागत आहे. यामुळे त्यांना प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र यानंतरही शासन आणि प्रशासन सगळे ऑल इज वेल असल्याचे दाखवित आहे.

...................

महिनाभरात ७ लाख क्विंटल धान खरेदी

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने रब्बीतील धान खरेदीसाठी ११४ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावरून आतापर्यंत केवळ ७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे, तर आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीची स्थिती यापेक्षा बिकट आहे. त्यामुळे यंदा रब्बीतील पूर्ण धान खासगी व्यापाऱ्यांनाच विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, हमीभावापासून वंचित राहावे लागले.

................

केवळ ३ लाख क्विंटल धानाची उचल

गेल्या खरीप हंगामातील ३३ लाख क्विंटल धानापैकी आतापर्यंत राईस मिलर्स भरडाईसाठी केवळ ३ लाख ११ हजार क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे ३० लाख क्विंटल धान अद्यापही विविध गोदामांमध्ये पडला आहे. धान भरडाईसाठी २८८ राईस मिलर्सने करार केले असून, प्रत्यक्षात ७० ते ७५ राईस मिलर्सने धानाची उचल केली असल्याने समस्येत वाढ झाली आहे.

..............

चुकारे आणि बोनस थकले

खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना बोनसची रक्कम अद्यापही मिळाली नाही, तर रब्बी हंगामात ७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली असून, त्याचे १३४ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. त्यामुळे बळीराजाची आर्थिक कोंडी झाली आहे.