शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

नऊ दिवसांत कशी होणार २३ लाख क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST

गोंदिया : यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीचा तिढा शासन आणि प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सुरुवातीपासून वाढला आहे. याचा फटका मात्र ...

गोंदिया : यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीचा तिढा शासन आणि प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सुरुवातीपासून वाढला आहे. याचा फटका मात्र रब्बी धान उत्पादक हजारो शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. रब्बीच्या धान खरेदीसाठी केवळ नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना, आतापर्यंत केवळ ७ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. २३ लाख क्विंटल धान खरेदी होणे अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे नऊ दिवसांत एवढी धान खरेदी होणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहावे लागणार आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत दरवर्षी खरिपानंतर रब्बीतील धानाची शासकीय धान खरेदी केली जाते. या धान खरेदीची मुदत ३० जूनपर्यंत असते. याचदरम्यान पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने शासकीय धान खरेदी बंद केली जाते. मात्र यंदा मागील खरीप हंगामातील धानाची उचल झाली नसल्याने रब्बीतील धान खरेदी सुरू होण्यास विलंब झाला आहे. गोदामे रिकामी झाली नसल्याने ३७ लाख क्विंटल धान गोदामात पडले आहे. हीच स्थिती पूर्व विदर्भातील उर्वरित पाच जिल्ह्यांची आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली, तर रब्बी धान खरेदीचा तिढा सुटला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना घरी धान ठेवण्यासाठी जागा नाही, शिवाय धानाची विक्री करूनच ते खरिपाचे नियोजन करीत असतात. त्यामुळे दोन्हीकडून त्यांची कोंडी झाली आहे. परिणामी त्यांना खासगी व्यापाऱ्यांना १३०० रुपये प्रति क्विंटल दराने धानाची विक्री करावी लागत आहे. यामुळे त्यांना प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र यानंतरही शासन आणि प्रशासन सगळे ऑल इज वेल असल्याचे दाखवित आहे.

...................

महिनाभरात ७ लाख क्विंटल धान खरेदी

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने रब्बीतील धान खरेदीसाठी ११४ शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावरून आतापर्यंत केवळ ७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे, तर आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीची स्थिती यापेक्षा बिकट आहे. त्यामुळे यंदा रब्बीतील पूर्ण धान खासगी व्यापाऱ्यांनाच विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, हमीभावापासून वंचित राहावे लागले.

................

केवळ ३ लाख क्विंटल धानाची उचल

गेल्या खरीप हंगामातील ३३ लाख क्विंटल धानापैकी आतापर्यंत राईस मिलर्स भरडाईसाठी केवळ ३ लाख ११ हजार क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे ३० लाख क्विंटल धान अद्यापही विविध गोदामांमध्ये पडला आहे. धान भरडाईसाठी २८८ राईस मिलर्सने करार केले असून, प्रत्यक्षात ७० ते ७५ राईस मिलर्सने धानाची उचल केली असल्याने समस्येत वाढ झाली आहे.

..............

चुकारे आणि बोनस थकले

खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना बोनसची रक्कम अद्यापही मिळाली नाही, तर रब्बी हंगामात ७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली असून, त्याचे १३४ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. त्यामुळे बळीराजाची आर्थिक कोंडी झाली आहे.