शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
3
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
4
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
5
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
6
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
7
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
8
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
9
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
10
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
11
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
12
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
13
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
14
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
15
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
16
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
17
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
19
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
20
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!

तुटपुंज्या निधीतून घरकूल कसे बांधावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 20:56 IST

स्वत:चे हक्काचे घर असावे, असे सर्वांनाच वाटते. शासन अनेक योजनांच्या माध्यमातून घरकूल योजना राबविते. मात्र लाभार्थ्यांना मिळणारा निधीच तुटपुंजा असल्यामुळे त्यातून घरकूल बांधावे तरी कसे? अशी समस्या लाभार्थ्यांसमोर निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची दिरंगाई : लाभार्थी सावकाराच्या शोधात

लोकमत न्यूज नेटवर्करावणवाडी : स्वत:चे हक्काचे घर असावे, असे सर्वांनाच वाटते. शासन अनेक योजनांच्या माध्यमातून घरकूल योजना राबविते. मात्र लाभार्थ्यांना मिळणारा निधीच तुटपुंजा असल्यामुळे त्यातून घरकूल बांधावे तरी कसे? अशी समस्या लाभार्थ्यांसमोर निर्माण झाली आहे.हक्काचे घर असावे, असे सर्वांचेच स्वप्न असते. पण गगणाला भिडणाऱ्या महागाईमुळे व घर बांधकाम करण्याची सर्वांचीच ऐपत नसल्यामुळे स्वत:च्या घराचे स्वप्न अपूर्णच राहते. सध्या दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाºया नागरिकांसाठी शासनाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना, शबरी घरकूल योजना राबविली जात आहे. मात्र घरकूल बांधण्यासाठी पहिल्या टप्प्यात देण्यात येणाºया तुटपुंज्या अनुदानामुळे स्वत:चे घर बांधताना लाभार्थ्यांना सावकाराचा शोध घ्यावा लागत असून कर्जबाजारीच व्हावे लागत आहे.दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अर्थ सहाय्याने पंचायत समिती स्तरावर प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना राबविली जात आहे. आदिवासी विकास प्रकल्प विभागांतर्गत शबरी घरकूल योजना राबविली जात आहे. मात्र घरकूल बांधकामासाठी देण्यात येणारा प्रथम टप्प्याचा अनुदान फारच अपुरे पडत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वेगळे कर्ज घेवून बांधकामाच्या साहित्यांची जमवाजमव करणे भाग पडत आहे. अशातच संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीमुळे या योजना कुचकामी ठरत आहेत.घराचे छप्पर स्लॅब करावे लागते. घरकूल मंजुरीसाठी लाभार्थ्यांना गोळा करावी लागणारी कागदपत्रे, नंतर ये-जा करण्यामध्ये साहेबांजी जी-हुजूरी करण्याचा खर्चही आठ हजारांच्या वर होते. त्यातच गरजेच्या वेळीच अनुदान मिळत नाही. शासनाने या सर्व बाबींचा विचार करून घरकुलासाठी असलेले अनुदान वाढवून तीन लाखांपर्यंत करणे काळाची गरज आहे व तशी लाभार्थ्यांची मागणीसुद्धा आहे.बांधकामाचे दर महागलेघर बांधकामाच्या साहित्याचे दर महागले आहेत. सिमेंट, रेती, विटा, बेलदार, मजूर आदींचा खर्च परवडण्याजोगा राहिला नाही. किमान ८०० रूपये चौरस फूट असा खर्च बांधकामासाठी धरला तर सामान्य माणसांचे बजेट कोलमडून जाते. २६६ चटई क्षेत्राचे घरकूल उभे केले तर हा खर्च पाच लाखांपर्यंत जातो. मात्र यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान फार कमी पडत आहे.प्रथम टप्प्यात केवळ ३० हजारप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक लाख ३० हजार रूपयांचे अनुदान लाभार्थ्यांसाठी ठरविण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्यात केवळ ३० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. तर दुसऱ्या टप्प्यात लाभार्थ्यांना अनुदान देण्याची कालमर्यादा निश्चित नाही. त्यामुळे सावकारांकडून अधिक टक्केवारीने व्याजावर कर्जाची उचल करावी लागत आहे.लाभार्थ्यांसमोर पेच, बांधकाम अर्धवटप्रधानमंत्री आवास योजना लोककल्याणासाठी राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र या योजनेंतर्गत बांधकाम पूर्ण करण्याची ठराविक कालमर्यादा घालण्यात आली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांसमोर पेच निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक बांधकाम अपूर्णच आहेत. काही बांधकाम पूर्णत: ठप्प पडले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोषाची भावना वाढली आहे.