शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

वणव्यामुळे घर खाक

By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST

मोहाफुल वेचण्याकरीता ग्रामस्थांकडून जंगलात लावण्यात आलेल्या आगीचा वणवा गावापर्यंत पसरल्याने दोन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

देवरी : मोहाफुल वेचण्याकरीता ग्रामस्थांकडून जंगलात लावण्यात आलेल्या आगीचा वणवा गावापर्यंत पसरल्याने दोन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात एका शेतकऱ्याचे घर जळून पूर्णपणे राख झाल्याची घटना शनिवारला दु.१ वाजता मल्हारबोडी गावात घडली. देवरीपासून ५ किमी अंतरावर असलेले मल्हारबोडी हे गाव १५ ते २० घरांचे आहे. गावातील महिला पुरूष मग्रारोहयोच्या कामावर गेले होते. काही लोकांनी मोहफुल वेचण्याकरीता जंगलाला आग लावल्यामुळे ती आग गावापर्यंत पोहोचली. या आगीमुळे गावातील वाड्या, तणसाचे ढिगारे, शेतातील सिंचनाचे पाईप व एका शेतकऱ्यांचे मकान पूर्णत: जळून राख झाले. घर जळालेल्या शेतकऱ्यांचे नाव मोतीनाथ काशीनाथ ठाकरे (६६) असे आहे. ते एकटेच आपल्या घरात राहात होते. याप्रसंगी ते घरात झोपलेले होते. गावात कोणीच ग्रामस्थ नसल्याने आग विझविता न आल्याने मोतीनाथ ठाकरे यांचे घर राख झाले. या शेतकऱ्याच्या घराला लागून असलेले लक्ष्मण दागो प्रधान (६०) यांच्या घराबाहेर ठेवलेले सिंचन पाईप पूर्णपणे जळाले. तसेच तणसाचे ढिगारे पूर्णपणे जळाले. घटनेची बातमी कळताच देवरीचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी देवरी व चिचेवाड्यावरुन पाण्याचा टॅकरची व्यवस्था करून आग आटोक्यात आणली. दोन्ही शेतकऱ्यांना सांत्वना देत सरकारी मदत देण्याचे आश्वासन दिले. या वणव्यामुळे मल्हारबोडी गावातील लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरीत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)