शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

ओबीसी आरक्षण लागू केल्यानंतरच निवडणुका घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:25 IST

गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मांडला नाही. त्यामुळे सर्वोच्च ...

गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मांडला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांच्या आत ठेवण्याचा निकाल देत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सदस्यांची निवड रद्द करण्याचे आदेश दिले. याचा फटका अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना बसला. याला केवळ महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मराठा व मुस्लीम आरक्षणावरून दिशाभूल करण्याचे काम करीत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडण्यात राज्य सरकार आधीच अपयशी ठरले आहे. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षणाची बाजू याेग्य पद्धतीने मांडण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजबांधव मोठ्या प्रमाणात असून स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षण देण्याची गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षण कायम राहावे यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. तसेच ओबीसी आरक्षण लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी मागणी माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. तसेच ओबीसी लोकसंख्येसंदर्भात माहिती गोळा करण्यासाठी आयाेगाची स्थापना करण्याची मागणी केली आहे. ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका व ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर करू नये, अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे.