शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षण लागू केल्यानंतरच निवडणुका घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:25 IST

गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मांडला नाही. त्यामुळे सर्वोच्च ...

गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मांडला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांच्या आत ठेवण्याचा निकाल देत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सदस्यांची निवड रद्द करण्याचे आदेश दिले. याचा फटका अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना बसला. याला केवळ महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मराठा व मुस्लीम आरक्षणावरून दिशाभूल करण्याचे काम करीत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडण्यात राज्य सरकार आधीच अपयशी ठरले आहे. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षणाची बाजू याेग्य पद्धतीने मांडण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजबांधव मोठ्या प्रमाणात असून स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षण देण्याची गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षण कायम राहावे यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. तसेच ओबीसी आरक्षण लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी मागणी माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. तसेच ओबीसी लोकसंख्येसंदर्भात माहिती गोळा करण्यासाठी आयाेगाची स्थापना करण्याची मागणी केली आहे. ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका व ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर करू नये, अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे.