शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

ऐतिहासिक रॅलीने गजबजली नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:26 IST

आरक्षणाची मर्यादा ५० टक्के पर्यत असावी या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या ‘सेव मेरीट-सेव नेशन’ आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२८) शहरात निघालेल्या रॅलीने नगरी गजबजली होती. सामान्य वर्गातील नागरिकांनी प्रथमच काढलेल्या या रॅलीत १५ हजारांवर नागरिकांनी भाग घेतल्याने शहरातील ही ऐतिहासिक रॅली ठरली. विशेष म्हणजे, या रॅलीत भाग घेत व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्त बंद पाळत आपले समर्थन नोंदविले.

ठळक मुद्दे‘सेव्ह मेरीट-सेव्ह नेशन’ : १५ हजारांवर नागरिकांचा रॅलीत सहभाग, व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्त बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरक्षणाची मर्यादा ५० टक्के पर्यत असावी या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या ‘सेव मेरीट-सेव नेशन’ आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२८) शहरात निघालेल्या रॅलीने नगरी गजबजली होती. सामान्य वर्गातील नागरिकांनी प्रथमच काढलेल्या या रॅलीत १५ हजारांवर नागरिकांनी भाग घेतल्याने शहरातील ही ऐतिहासिक रॅली ठरली. विशेष म्हणजे, या रॅलीत भाग घेत व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्त बंद पाळत आपले समर्थन नोंदविले.‘सेव्ह मेरीट-सेव्ह नेशन’ रॅलीची सुरूवात सकाळी १० वाजता येथील इंदिरा गांधी स्टेडियममधून झाली. या रॅलीपूर्वी संयोजक डॉ. उमेश शर्मा, डॉ. आनंद इसरका, डॉ. नितीन कोतवाल, देवरी येथील सुमित अग्रवाल यांनी विचार व्यक्त करीत या आंदोलनाला आजची गरज असल्याचे सांगितले. एकदा आरक्षण नामक कुबडीची लत लागल्याने ती लत कधी सुटत नाही. स्वातंत्र्याच्या वेळी १५ टक्क्यांपासून सुरू झालेले आरक्षण आत राज्यात ८५ टक्क्यांवर पोहचले आहे. जे उच्च न्यायालयाच्या ५० टक्के आरक्षण मर्यादेचे उल्लंघन आहे. एकंदर देशाचा मागासपणा मागील ७० वर्षांत १५ टक्क्यांवरून ८०-८५ टक्के टक्के झाल्याचे सांगितले. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गांनी रॅली निघाली.पश्चात, आयोजीत सभेत मंचावर डॉ.प्रमोद मुंदडा, अ‍ॅड. इंद्रकुमार होतचंदानी, माजी नगराध्यक्ष दामोदर अग्रवाल, डॉ.अर्चना कोठारी, डॉ.मनीषा मिश्रा, ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधी जगदीश शमा, सिख समाजाचे चरण जुनेजा, डॉ.काबरा, माधवदास खटवानी, अनिल हुंदानी, प्रकाश कोठारी, अरूण अजमेरा, लवली होरा, चिराग पटेल, चंद्रेश माधवानी, सीताराम अग्रवाल, (महालक्ष्मी), डॉ.निलेश जैन, डॉ.विकास जैन, डॉ.जूली जैन, डॉ.शेफाली जैन, डॉ.ऋतु जैन, डॉ. संजय अग्रवाल, डॉ.अनिता कोतवाल, डॉ.प्रणिता चिटणवीस, वामा महिला संघटन प्रमुख पूजा तिवारी, राजेंद्र बग्गा, शशि मिश्रा, डॉ.लक्ष्मी गुप्ता, अजय शामका, हर्षल पवार, कायस्त समाज के विनय श्रीवास्तव आदि उपस्थित होते.याप्रसंगी सिंधी समाजाचे प्रतिनिधि अ‍ॅड. होतचंदानी यांनी, संविधानात ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षणाची तरतूद नव्हती. मात्र राजकीय स्वार्थातून राज्यात ७८ टक्के पर्यंत आरक्षण जात असून हा अन्याय असल्याचे मत व्यक्त केले. ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधी शर्मा यांनी, सामान्य वर्गातील जनता हजारोंच्या संख्येत पहिल्यांदाच रस्त्यावर उतरली असून न्याय मिळेपर्यंत त्यांचा हा लढा सुरू राहणार असल्याचे सांगीतले. माधवानी यांनी, महाराष्ट्र आमचा असूनही सरकार सामान्य वर्गासोबत अन्याय करीत आहे. सामान्य वर्गाने छत्तीसगड व मध्यप्रदेशात आपली ताकत दाखविली असून आता महाराष्ट्रात पाळी असल्याचे मत व्यक्त केले.माजी नगराध्यक्ष अग्रवाल यांनी, बाबासाहेबांनी सादर केलेल्या संविधानाचे मूळ रूप बदलले असून यामुळेच सामान्य वर्गाला आज रस्त्यावर उतरावे लागल्याचे सांगितले. राजपूत समाजातील रूचीता चव्हाण यांनी, प्रतिभांचा सन्मान न झाल्यास त्यांना पळून जाणे हाच एकमात्र पर्याय उरणार व नव भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे हा लढा पुढेही सुरू ठेवावा लागणार असल्याचे मत व्यक्त केले. क्रांतीकुमार चव्हाण यांनी, प्रवेश न मिळाल्याने ९४ टक्के गुण घेणारे विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. जुनेजा यांनी, सामान्य वर्गाच्या या लढ्याला सुरू ठेवण्याचे आवाहन केले. अ‍ॅड. ओमप्रकाश मेठी यांनी, या आंदोलनाला ऐतिहासिक सांगत अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. विठ्ठल मेश्राम यांनी, सामान्य वर्गाने काढलेली रॅली ऐतिहासिक असल्याचे सांगीतले.विशेष म्हणजे, या रॅलीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील सामान्य वर्गातील नागरिक सहभागी झाले होते. संचालन श्री मारवाडी युवक मंडळाचे सचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार मंडळाचे अध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी मानले.राष्ट्रपती व प्रधानमंत्र्यांना पाठविले निवेदन‘सेव्हमेरीट-सेव्ह नेशन’ या आंदोलनातंर्गत रॅली व सभा आटोपल्यानंतर आंदोलनाच्या प्रतिनिधी मंडळाने येथील नायब तहसीलदार राजेश भांडारकर यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन दिले. तसेच या निवेदनाची प्रत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या नावानेही देण्यात आली.चौकाचौकांत पथनाट्य सादरशहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी रॅलीदरम्यान चौकाचौकांत ‘आरक्षणाचे दुष्परिणाम’ या विषयावर आधारीत पथनाट्य सादर केले.