शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

महामार्ग ठरतोय कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 21:48 IST

देवरीपासून आमगाव मार्गे या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. पदमपूरच्या पोवारीटोला ते आमगावच्या नाबार्ड बोर्डपर्यंत या रस्त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. रस्ता तयार करतांना एका बाजूचा रस्ता तयार करून दुसºया बाजूने प्रवाश्यांना सहजरित्या प्रवास करता येईल, अशी सोय करायला हवी होती. परंतु तसे न करता संपूर्ण रस्ता खोदून टाकला. वाटसरूंना जाण्या-येण्यासाठी मुरूम व माती टाकण्यात आली. परंतु मुरूमामध्येही चिकण माती मिश्रीत असल्यामुळे पाण्याने मुरूम ओले होऊन त्यावरून वाहने गेल्यास वाहने घसरतात. त्यामुळे वाहन चालकांचा अपघात होतो.

ठळक मुद्देढिसाळ नियोजनाचा फटका : १४ तासात २० प्रवासी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया येथे देवरी-आमगाव मार्गे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम नियोजन शून्य होत आहे. या मार्गावर एक किमी अंतरात अवघ्या १४ तासात २० जण जखमी झाले आहेत. याकडे सदर यंत्रणेने दुर्लक्ष केल्यास या ठिकाणी प्राणांतीक अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.देवरीपासून आमगाव मार्गे या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. पदमपूरच्या पोवारीटोला ते आमगावच्या नाबार्ड बोर्डपर्यंत या रस्त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. रस्ता तयार करतांना एका बाजूचा रस्ता तयार करून दुसºया बाजूने प्रवाश्यांना सहजरित्या प्रवास करता येईल, अशी सोय करायला हवी होती. परंतु तसे न करता संपूर्ण रस्ता खोदून टाकला. वाटसरूंना जाण्या-येण्यासाठी मुरूम व माती टाकण्यात आली. परंतु मुरूमामध्येही चिकण माती मिश्रीत असल्यामुळे पाण्याने मुरूम ओले होऊन त्यावरून वाहने गेल्यास वाहने घसरतात. त्यामुळे वाहन चालकांचा अपघात होतो. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पाऊस आल्याने आमगावच्या नाबार्ड बोर्डपासून धम्मगीरी या एक किमीच्या अंतरावर सायंकाळी ७ वाजता पासून १ जानेवारी २०२० च्या सकाळी ९ वाजता या १४ तासाच्या आत २० पेक्षा अधिक जण पडले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.चिखलातून मार्गक्रमण करावा लागत असतांना वाहने घरून त्यावरून चालक व मागे बसलेले लोक पडतात. या मार्गावरून जातांना सर्वात जास्त अपघात मोटारसायकल चालकांचा होत आहे. चिकण माती मिश्रीत मुरूम टाकल्यामुळे दुचाकी सहज घसरते. परिणामी अपघात होतात. या महामार्गाचे बांधकाम करतांना वाटसरूंची येण्या-जाण्याचा रस्ता सोयीस्कर करूनच बांधकाम करणे अपेक्षीत होते. परंतु तसे होत नसल्याने अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागते. याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाहीत. या रस्त्यावर रात्रीपासून सकाळपर्यंत झालेल्या अपघातामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे.अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटलीया महामार्गाचे बांधकाम करतांना बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची मोठी पाईप लाईन अनेकदा फुटली. बांधकाम करतांना जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करण्यात येत असल्यामुळे जेसीबीने पाईप फुटले आहेत.त्यामुळे अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा बंद असतो. मुख्य पाईप लाईन फुटली की सर्वच गावांचा पाणी पुरवठा बंद होतो. पाईप फुटल्यानंतर हा महामार्ग बणविणारे पाईपची दुरूस्ती करून देतात. परंतु मागील वर्षभरापासून दोन-चार दिवसात पाईप फुटण्याचा प्रकार सुरू आहे.त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.

२५ हजार ब्रास मुरुमाची मंजुरी पण वापरले किती?राष्ट्रीय महार्गासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २५ हजार ब्रास मुरूम तालावातून काढण्याची मंजुरी देण्यात आली आहे. परंतु या रस्त्यावर वापरण्यात येणारे मुरूम तलावातील नाही. तलाव खोलीकरण करून त्यातील मुरूम या ठिकाणी वापरण्यात यावे अश्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना होत्या. परंतु तसे न करता भलत्याच ठिकाणी खोदकाम करून मुरूमाचा वापर केला जात आहे. २५ हजार ब्रास मुरूम वापरण्याची मंजुरी देण्यात आली. परंतु या ठिकाणी वापरण्यात आलेले मुरूम लाखो ब्रासच्या घरात आहे. याकडे जिल्हाधिकाºयांनी जातीने लक्ष घालण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी महोदय, मुरुमाची चौकशी कराचदेवरी ते आमगाव मार्गे तयार होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी वापरण्यात आलेले मुरूम कुठून काढण्यात आले. किती ब्रास मुरूम काढण्यात आले याची सर्व चौकशी जिल्हाधिकारी यांनी केल्यास किती मुरूम अधिक काढण्यात आले ही बाब पुढे येईल. या बांधकामाच्या नावाने अनेक अधिकाऱ्यांचे हात ओले झाल्यामुळे कुणीच याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा