शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

दुष्काळी भागातच सर्वाधिक उत्पन्नाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:51 IST

यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाला. तर कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तर वादळी पावसाचा फटका सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धानपिकांना बसला.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अफलातून कारभार : जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाला. तर कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तर वादळी पावसाचा फटका सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धानपिकांना बसला. मात्र यानंतरही कृषी विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालात या तालुक्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या या अफलातून अहवालामुळे चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ कृषी विभागाने दिलेल्या धानाच्या उत्पादनाच्या अंदाजावर कोणत्या तालुक्यात किती धान खरेदी करायची याचे नियोजन करते. मात्र यंदा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने वर्तविलेल्या अंदाजावरुन चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. कीडरोग आणि वादळी पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री बडोले हे तालुक्यातील गावागावांमध्ये जाऊन शेतकºयांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देत आहे. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती असल्याचे स्पष्ट होते. मात्र दुसरीकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय याच तालुक्यात सर्वाधिक उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करित आहे. त्यामुळे पालकमंत्री खरे बोलत आहेत की जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे समजायला शेतकºयांना मात्र मार्ग नाही.खरीपातील तालुकानिहाय धानाचे उत्पादन किती होईल. याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना २६ आॅक्टोबरला पाठविला. या पत्रात, आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये गोंदिया जिल्ह्यात ५४ टक्के पाऊस झाला. यंदा कमी पावसामुळे धानाच्या हेक्टरी उत्पादन होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही त्यांना १६९० किलो दर हेक्टरी उत्पादन होईल.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन व्यवस्था आहे त्यांना ३८६० किलो उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात सर्वात कमी धानाचे उत्पादन देवरी तालुक्यात १६९८ किलो दर हेक्टरी होण्याची अंदाज कृषि अधिकारी यांनी पाठविलेल्या अहवालातून व्यक्त केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी