शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागातच सर्वाधिक उत्पन्नाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:51 IST

यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाला. तर कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तर वादळी पावसाचा फटका सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धानपिकांना बसला.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अफलातून कारभार : जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाला. तर कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तर वादळी पावसाचा फटका सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धानपिकांना बसला. मात्र यानंतरही कृषी विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालात या तालुक्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या या अफलातून अहवालामुळे चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ कृषी विभागाने दिलेल्या धानाच्या उत्पादनाच्या अंदाजावर कोणत्या तालुक्यात किती धान खरेदी करायची याचे नियोजन करते. मात्र यंदा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने वर्तविलेल्या अंदाजावरुन चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. कीडरोग आणि वादळी पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री बडोले हे तालुक्यातील गावागावांमध्ये जाऊन शेतकºयांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देत आहे. त्यामुळे या तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती असल्याचे स्पष्ट होते. मात्र दुसरीकडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय याच तालुक्यात सर्वाधिक उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करित आहे. त्यामुळे पालकमंत्री खरे बोलत आहेत की जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे समजायला शेतकºयांना मात्र मार्ग नाही.खरीपातील तालुकानिहाय धानाचे उत्पादन किती होईल. याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना २६ आॅक्टोबरला पाठविला. या पत्रात, आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये गोंदिया जिल्ह्यात ५४ टक्के पाऊस झाला. यंदा कमी पावसामुळे धानाच्या हेक्टरी उत्पादन होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नाही त्यांना १६९० किलो दर हेक्टरी उत्पादन होईल.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन व्यवस्था आहे त्यांना ३८६० किलो उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात सर्वात कमी धानाचे उत्पादन देवरी तालुक्यात १६९८ किलो दर हेक्टरी होण्याची अंदाज कृषि अधिकारी यांनी पाठविलेल्या अहवालातून व्यक्त केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी