शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 21:33 IST

मागील आठ दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरीे लावली. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले.

ठळक मुद्देदोन तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद : घरांची पडझड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठ दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरीे लावली. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले. तर सर्वाधिक ११७ मि.मी.पावसाची नोंद अर्जुनी मोरगाव तालुक्यात झाली. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली तर महागाव नाल्याला पूर आल्याने या गावाचा तालुक्याशी काही तास संर्पक तुटला होता. मागील चौवीस तासात जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून ३२३.३९ मि.मी.पावसाची नोंद झाली.सोमवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात सुध्दा वाढ झाली आहे. धरणाची वाढती पाण्याची पातळी लक्षात घेवून पुजारीटोला धरणाचे २ गेट, कालीसरार २ गेट आणि धापेवाडा प्रकल्पाचे पाच गेट उघडण्यात आले होते. हवामान विभागाने मंगळवार, बुधवारी सुध्दा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठालगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाचा काही प्रमाणात पिकांना सुध्दा फटका बसला. सडक अर्जुनी तालुक्यातील बंधारा वाहून गेल्यामुळे बंधाऱ्यालगत असलेल्या शेतकºयांची केलेली रोवणी वाहून गेली. यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर जिल्ह्यातील इतर भागात पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र जिल्हा कृषी विभागाकडे याबाबत अद्यापही नुकसानीचीे अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. नुकसानीचे पंचनामे केल्यानंतरच अधिकृत आकडा सांगता येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने ५० ते ६० घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. दरम्यान या पावसाचा जिल्ह्यातील काही भागातील शेतकºयांना फायदा सुध्दा झाला आहे. पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात सुध्दा समाधानकारक वाढ झाली आहे.वीज पडून इसम ठारसोमवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान तिरोडा तालुक्यातील मुरमाडी येथील सुदाम भुरनशा टेकाम यांचा वीेज पडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.या महसूल मंडळात अतिवृष्टीसोमवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील नवेगावबांध, बोंडगावदेवी, अर्जुनी मोरगाव, केशोरी, महागाव, सौंदड, डव्वा, सडक अर्जुनी या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊस