शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

कोरोनामुळे पालक हिरावलेल्या बालकांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 05:00 IST

तालुक्यातील रिसामा येथील कोरोनामुळे वडिलांचे छत्र हिरावलेल्या बालकांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शनिवारी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेक जण निराधार झाले. अनेकांचे छत्र हरपले. रिसामा येथील योगेश्वरी अरविंद कावळे व प्रियांका प्रशांत शहारे यांच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबातील प्रमुख गेल्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी खवले यांनी त्यांच्या कुटुंबाला भेट दिली.

ठळक मुद्देराजेश खवले यांचा उपक्रम : अन्नधान्य व भेट वस्तूंचे केले वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : कोरोनामुळे पालकत्व हिरावलेल्या व एकल पालक असलेल्या जिल्ह्यातील या बालकांच्या कुटुंबांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शनिवारी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची विचारपूस केली, तसेच या बालकांच्या कुटुंबांना अन्नधान्याची मदत केली, तसेच शासनाच्या योजनांचा लाभ देण्याची ग्वाही देत या बालकांचे सांत्वन केले. प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी घरापर्यंत येऊन सांत्वन केल्याने या बालकांचे नातेवाईकसुद्धा भारावून गेले होते.  तालुक्यातील रिसामा येथील कोरोनामुळे वडिलांचे छत्र हिरावलेल्या बालकांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शनिवारी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेक जण निराधार झाले. अनेकांचे छत्र हरपले. रिसामा येथील योगेश्वरी अरविंद कावळे व प्रियांका प्रशांत शहारे यांच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबातील प्रमुख गेल्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी खवले यांनी त्यांच्या कुटुंबाला भेट दिली. कुटुंबातील मुलांना फळ व बिस्कीट व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. त्यांची आस्थेने विचारपूस करून शासनाच्या योजनांचा लाभ बालक व त्यांच्या कुटुंबीयांना देण्याची ग्वाहीसुद्धा जिल्हाधिकारी खवले यांनी दिली. हा दु:खाचा काळ आहे, शासन आपणास सर्वतोपरी मदत करणार, विधवा पेन्शन योजना व इतर सोयी- सवलतींकरिता शासनाकडून मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देवरीचे उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ, आमगावचे तहसीलदार डी.एस. भोयर उपस्थित होते. 

१५० बालकांचे वडिलांचे छत्र हरपलेकोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कहर केले. साडेपाचशेवर नागरिकांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंंबांतील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने त्या कुटुंबांवर मोठे संकट कोसळले. १५० बालकांचे वडिलांचे छत्र, तर ४७ बालकांचे आई- वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आली आहे. अशा बालकांचा शोध घेऊन आता शासनाकडून मदत केली जात आहे.

कोरोनामुळे आई- वडिलांचे छत्र हिरावलेल्या बालकांसाठी शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा लाभ त्यांना दिला जातो. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून प्रशासन तुमच्या पाठीशी खंभीरपणे उभे असल्याची जाणीव करून अशा कुटुंबांना भेट देण्याचा उपक्रम प्रशासनाने सुरू केला आहे. -राजेश खवले, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू