शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

गोंदिया, अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 05:00 IST

जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १०० हेक्टरमधील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आली आहे. या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर अनेक शेतकऱ्यांची केलेली रोवणी वाहून गेल्याने त्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्याने नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर धरणाच्या पाणी पातळीही वाढ झाली आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ  झाल्याने शुक्रवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता या धरणाचे सहा दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५२.८ मिमी पाऊस झाला असून, गोंदिया आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जून महिन्यात पावसाने दगा दिल्याने पावसाची ३० ते ४० टक्के तूट निर्माण झाली होती. त्यामुळे पुढे काय होणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. टाकलेले पऱ्हेदेखील वाळण्याच्या मार्गावर आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार  हजेरी लावल्याने जून महिन्यात पडलेली पावसाची तूट भरून निघाली असून, सरासरीच्या १४१ टक्के पाऊस झाला आहे.  त्यातच मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने नदी, नाले, तलाव व सिंचन प्रकल्प भरल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट बऱ्याच प्रमाणात दूर झाले आहे. खरीप हंगामाची चिंतादेखील काही प्रमाणात कमी झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५२.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, अर्जुनी मोरगाव आणि गोंदिया तालुक्यात  अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रातसुध्दा पावसाचा जोर कायम असल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला  धरणाचे ७ दरवाजे शुक्रवारी सकाळी उघडण्यात आले. 

सरासरीच्या १४१.१ टक्के पाऊस - जिल्ह्यात १ जून ते १५ जुलै या कालावधीत ३९३.६ मिमी पाऊस पडतो. तर प्रत्यक्षात या कालावधीत आतापर्यंत ५५५.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्याची सरासरी १४१.१ टक्के आहे. तर मान्सून कालावधीत ४५.३ टक्के पाऊस झाला आहे. 

त्या ९६ गावांना सतर्कतेचा इशारा पावसाचा जोर कायम असून, जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. शुक्रवारी पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. कालीसरार धरणाचेही दरवाजे उघडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठालगत असलेल्या ९६ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान - जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १०० हेक्टरमधील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आली आहे. या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर अनेक शेतकऱ्यांची केलेली रोवणी वाहून गेल्याने त्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे.  

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर