शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

गोंदिया, अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 05:00 IST

जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १०० हेक्टरमधील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आली आहे. या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर अनेक शेतकऱ्यांची केलेली रोवणी वाहून गेल्याने त्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्याने नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर धरणाच्या पाणी पातळीही वाढ झाली आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ  झाल्याने शुक्रवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता या धरणाचे सहा दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५२.८ मिमी पाऊस झाला असून, गोंदिया आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जून महिन्यात पावसाने दगा दिल्याने पावसाची ३० ते ४० टक्के तूट निर्माण झाली होती. त्यामुळे पुढे काय होणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. टाकलेले पऱ्हेदेखील वाळण्याच्या मार्गावर आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार  हजेरी लावल्याने जून महिन्यात पडलेली पावसाची तूट भरून निघाली असून, सरासरीच्या १४१ टक्के पाऊस झाला आहे.  त्यातच मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने नदी, नाले, तलाव व सिंचन प्रकल्प भरल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट बऱ्याच प्रमाणात दूर झाले आहे. खरीप हंगामाची चिंतादेखील काही प्रमाणात कमी झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५२.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, अर्जुनी मोरगाव आणि गोंदिया तालुक्यात  अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रातसुध्दा पावसाचा जोर कायम असल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला  धरणाचे ७ दरवाजे शुक्रवारी सकाळी उघडण्यात आले. 

सरासरीच्या १४१.१ टक्के पाऊस - जिल्ह्यात १ जून ते १५ जुलै या कालावधीत ३९३.६ मिमी पाऊस पडतो. तर प्रत्यक्षात या कालावधीत आतापर्यंत ५५५.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्याची सरासरी १४१.१ टक्के आहे. तर मान्सून कालावधीत ४५.३ टक्के पाऊस झाला आहे. 

त्या ९६ गावांना सतर्कतेचा इशारा पावसाचा जोर कायम असून, जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. शुक्रवारी पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. कालीसरार धरणाचेही दरवाजे उघडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठालगत असलेल्या ९६ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान - जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १०० हेक्टरमधील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आली आहे. या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर अनेक शेतकऱ्यांची केलेली रोवणी वाहून गेल्याने त्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे.  

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर