शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

त्या पाच गावांची आरोग्य सेवा अद्यापही भगवान भरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

मुरकुडोह-दंडारीचे सर्व पाच गावे मिळून एकूण जवळपास एक हजार लोकांचे या गावांमध्ये वास्तव्य आहे.परंतु या एक हजार लोकसंख्येमागे एका आरोग्य उपकेंद्राची सोय अद्यापही करण्यात आलेली नाही.या गावातील लोकांची प्रकृती बिघडल्यास त्यांना जवळपास २० किमीचा प्रवास करुन दरेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे लागते.यासाठी त्यांना आपला पूर्ण दिवस खर्च करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याअभावी सुध्दा ते शक्य होत नाही.

ठळक मुद्देपावसाळ्यात जीव मुुठीत घेवून राहावे लागते : आरोग्य विषयक सोयींचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील मुरकुडोह दंडारीच्या पाचही गावांमध्ये ना शासकीय ना खासगी स्वरुपाची कुठलीच आरोग्य सेवा उपलब्ध नाही. या भागातील लोकांना नेहमीच जीव मुठीत घेवून जीवन जगावे लागत असते.आरोग्य सेवेच्या बाबतीत शासनाने या गावांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या पाचही गावांची आरोग्यविषयक सेवा भगवान भरोसे असल्याचे चित्र आहे.मुरकुडोह-दंडारीचे सर्व पाच गावे मिळून एकूण जवळपास एक हजार लोकांचे या गावांमध्ये वास्तव्य आहे.परंतु या एक हजार लोकसंख्येमागे एका आरोग्य उपकेंद्राची सोय अद्यापही करण्यात आलेली नाही.या गावातील लोकांची प्रकृती बिघडल्यास त्यांना जवळपास २० किमीचा प्रवास करुन दरेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे लागते.यासाठी त्यांना आपला पूर्ण दिवस खर्च करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याअभावी सुध्दा ते शक्य होत नाही. परिणामी त्यांना आपल्या पारंपरिक उपचारावर अवलंबून राहावे लागते. एखाद्या आजारावर तातडीने औषधोपचार मिळण्याची गरज पडल्यास ती सोय मिळाली नाही की कधी-कधी जीव गमविण्याची वेळ येथील गावकऱ्यांवर येते. या परिसरासाठी आरोग्याची सोय म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा आहे. या पांचही गावांचा समावेश याच आरोग्य केंद्रात करण्यात आला. परंतु दरेकसा उपकेंद्र हे प्राथमिक आरोग्य केंद्रात संलग्नीत असल्यामुळे येथे स्वतंत्र इमारत व्यवस्था किंवा औषधोपचाराची व्यवस्था नाही. या उपकेंद्राच्या आरोग्य सेवा व आरोग्य सेविकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातच आपली सेवा द्यावी लागत असते. दरेकसा उपकेंद्रा अंतर्गत मुरकुडोह-दंडारी या पाच गावां व्यतिरिक्त डहारटोला, डुंबरेटोला, कोपालगड, दल्लाटोला आणि चांदसूरज या इतर पाच गावांचा सुद्धा समावेश आहे. या उपकेंद्रात एकूण १० गावांचा समावेश आहे. परंतु या गावांसाठी फक्त एक आरोग्य सेवक आणि दोन आरोग्य सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना दहाही गावांना सतत आरोग्य सेवा देणे शक्य नाही. एवढ्यात मुरकुडोह दंडारीसारख्या २० किमी अंतरावर असलेल्या गावामध्ये जाणे तर मुळीच शक्य होत नाही. पावसाळ्याच्या दिवसात तर कुणीच येथे पोहचू शकत नाही. त्यामुळे येथील लोकांना आरोग्याच्या बाबतीत भगवान भरोसे राहावे लागते. इतर दिवसात महिन्यातून किंवा दोन महिन्यात आरोग्य सेवक येथे भेट देतात. हा भाग जंगलव्याप्त असल्याने या परिसरात हिवतापाची लागण लोकांना लवकर होते. हे असे आजार आहेत की यावर ताबडतोब औषधोपचार मिळणे आवश्यक असते. परंतु दुर्गम भाग रस्त्यांचा अभाव व रुग्णांसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध होऊ शकत नसल्याने त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी गावठी इलाज करण्यावर लोकांचा विश्वास आहे. एखादया महिलेची प्रसूती करण्याची वेळ आली की अशावेळी गावातील दायी प्रसूतीची कामे करते. तर कधी कधी प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांना मोठी कसरत करावी लागते.मंजुरी मिळून ही उपकेंद्र सुरु नाहीमागील एक वर्षापुर्वीच मुरकुडोह-दंडारीसाठी महाराष्ट्र शासनाने एक उपकेंद्र सुरु करण्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार त्या गावांमध्ये कोणत्याही एका ठिकाणी प्राथमिक औषधोपचार आणि आरोग्य सेविका व आरोग्य सेवक नियुक्त करुन त्यांना त्या ठिकाणी नियमित सेवा देण्याची व्यवस्था केली पाहिजे. परंतु जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल