शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेचे धिंडवडे

By admin | Updated: September 9, 2014 00:28 IST

आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहात आहेत. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य सेवेचे धिंडवडे निघत असून

यशवंत मानकर - आमगावआरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहात आहेत. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य सेवेचे धिंडवडे निघत असून २०० रुग्णांच्या उपचाराचा भार केवळ एका डॉक्टरवर आल्याने उपचार कुणाचा करावा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आमगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तू अद्यावत आहेत. परंतु नागरिकांना मिळणारी आरोग्य सेवा डॉक्टर व कर्मचाऱ्यांअभावी सलाईनवर येऊन पडली आहे. तालुक्यातील ठाणा, कालीमाटी, अंजोरा, घाटटेमनी, तिगाव, बनगाव तसेच आमगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी रुग्णांची मोठी गर्दी उसळत आहे. परंतु सुविधाच उपलब्ध नसल्याने रुग्ण खासगी डॉक्टरकडे उपचार घेण्यासाठी जातात व आर्थिक तडजोड करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत.तिगाव आरोग्य केंद्रावर नियंत्रण नसल्याने कर्मचाऱ्यांचे ‘आॅल इज वेल’ आहे. डॉक्टर व सुविधांच्या अभावामुळे रुग्ण उपचारासाठी दुसरीकडे वळत आहेत. प्रसुत मातांना तातडीची सेवा देण्यासाठी रुग्णालय खटारा वाहनावर अवलंबून आहे. औषधांचा तुटवडा नेहमीचाच प्रश्न आहे. तालुक्यातील मुख्य केंद्र आमगाव येथे ग्रामीण रुग्णालयात तांत्रिक सुविधा व स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष आहे. रुग्णालयात दररोज ३०० रुग्ण आरोग्य तपासणीसाठी दाखल होतात. परंतु उपचार देणारे डॉक्टर व कर्मचारी पुरेसे नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. या रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. हृषीकेश शंभरकर यांनी सदर विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. तसेच रिक्त पदांच्या मागणीकडे लक्ष वेधले. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे येथील आरोग्यसेवा अद्यावत झाली नाही. येथे दैनंदिन सेवा देण्यासाठी डॉ. शंभरकर व सहकाऱ्यांना तारेवरची कसरत करून ३०० रुग्णांना आरोग्य सेवा द्यावी लागते. या कर्मचाऱ्यांचा वसाहतींची समस्यासुद्धा आवासून उभी आहे. त्यामुळे कर्मचारी निवास व्यवस्थेपासून वंचित आहेत.तालुक्यातील ग्रामीण भागात प्राथमिक उपचार केंद्र व उपकेंद्र आरोग्य सेवा देत आहेत. परंतु योग्य उपचार व सुविधा मिळावी यासाठी ग्रामीण परिसरातील रुग्ण आमगाव येथील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवा घेण्यासाठी गर्दी करतात. रुग्णसेवेचा आदर्श निर्माण करणारे बनगाव प्राथमिक उपचार केंद्र रुग्णांना उपचार देण्यासाठी तत्पर असले तरी दैनंदिन २०० रुग्णांना उपचार देण्यासाठी असमर्थ ठरत आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु यापैकी डॉ. अविनाश येळणे उच्च शिक्षणासाठी रजेवर गेल्याने विभागाने दुसऱ्या डॉक्टरची सोय उपलब्ध करुन दिली नाही. आरोग्य सेवकांची दोन पदे रिक्त आहेत. आरोग्य तपासणीत प्रयोगशाळेचे महत्वपूर्ण योगदान आहे. परंतु तंत्रज्ञांची पदेही रिक्त असल्याने विविध तपासणी कंत्राटी पद्धतीवरील सहायक व्यक्तीवर अवलंबून आहे. येथे तांत्रिक सुविधांचा अभाव असूनही रुग्णसेवा सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे . रुग्णांच्या कक्षात व परिसरात औषधांचा घनकचरा पडून आहे. गाद्या स्वच्छ नसल्याने रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या ३० खाटांच्या रुग्णालयात स्वच्छतेची नितांत गरज आहे. तालुक्यात आरोग्यसेवा देणारी यंत्रणा स्वत:च्या विभागातील मिळणाऱ्या सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न पुढे आहे. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांच्या कमतरतेमुळे रूग्णांना खासगी रुग्णालयाकडे वळावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींना रुग्णांना सामोरे जावे लागते.