शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

आरोग्य सेवेचे धिंडवडे

By admin | Updated: September 9, 2014 00:28 IST

आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहात आहेत. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य सेवेचे धिंडवडे निघत असून

यशवंत मानकर - आमगावआरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहात आहेत. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य सेवेचे धिंडवडे निघत असून २०० रुग्णांच्या उपचाराचा भार केवळ एका डॉक्टरवर आल्याने उपचार कुणाचा करावा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आमगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तू अद्यावत आहेत. परंतु नागरिकांना मिळणारी आरोग्य सेवा डॉक्टर व कर्मचाऱ्यांअभावी सलाईनवर येऊन पडली आहे. तालुक्यातील ठाणा, कालीमाटी, अंजोरा, घाटटेमनी, तिगाव, बनगाव तसेच आमगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी रुग्णांची मोठी गर्दी उसळत आहे. परंतु सुविधाच उपलब्ध नसल्याने रुग्ण खासगी डॉक्टरकडे उपचार घेण्यासाठी जातात व आर्थिक तडजोड करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत.तिगाव आरोग्य केंद्रावर नियंत्रण नसल्याने कर्मचाऱ्यांचे ‘आॅल इज वेल’ आहे. डॉक्टर व सुविधांच्या अभावामुळे रुग्ण उपचारासाठी दुसरीकडे वळत आहेत. प्रसुत मातांना तातडीची सेवा देण्यासाठी रुग्णालय खटारा वाहनावर अवलंबून आहे. औषधांचा तुटवडा नेहमीचाच प्रश्न आहे. तालुक्यातील मुख्य केंद्र आमगाव येथे ग्रामीण रुग्णालयात तांत्रिक सुविधा व स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष आहे. रुग्णालयात दररोज ३०० रुग्ण आरोग्य तपासणीसाठी दाखल होतात. परंतु उपचार देणारे डॉक्टर व कर्मचारी पुरेसे नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. या रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. हृषीकेश शंभरकर यांनी सदर विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. तसेच रिक्त पदांच्या मागणीकडे लक्ष वेधले. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे येथील आरोग्यसेवा अद्यावत झाली नाही. येथे दैनंदिन सेवा देण्यासाठी डॉ. शंभरकर व सहकाऱ्यांना तारेवरची कसरत करून ३०० रुग्णांना आरोग्य सेवा द्यावी लागते. या कर्मचाऱ्यांचा वसाहतींची समस्यासुद्धा आवासून उभी आहे. त्यामुळे कर्मचारी निवास व्यवस्थेपासून वंचित आहेत.तालुक्यातील ग्रामीण भागात प्राथमिक उपचार केंद्र व उपकेंद्र आरोग्य सेवा देत आहेत. परंतु योग्य उपचार व सुविधा मिळावी यासाठी ग्रामीण परिसरातील रुग्ण आमगाव येथील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवा घेण्यासाठी गर्दी करतात. रुग्णसेवेचा आदर्श निर्माण करणारे बनगाव प्राथमिक उपचार केंद्र रुग्णांना उपचार देण्यासाठी तत्पर असले तरी दैनंदिन २०० रुग्णांना उपचार देण्यासाठी असमर्थ ठरत आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु यापैकी डॉ. अविनाश येळणे उच्च शिक्षणासाठी रजेवर गेल्याने विभागाने दुसऱ्या डॉक्टरची सोय उपलब्ध करुन दिली नाही. आरोग्य सेवकांची दोन पदे रिक्त आहेत. आरोग्य तपासणीत प्रयोगशाळेचे महत्वपूर्ण योगदान आहे. परंतु तंत्रज्ञांची पदेही रिक्त असल्याने विविध तपासणी कंत्राटी पद्धतीवरील सहायक व्यक्तीवर अवलंबून आहे. येथे तांत्रिक सुविधांचा अभाव असूनही रुग्णसेवा सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे . रुग्णांच्या कक्षात व परिसरात औषधांचा घनकचरा पडून आहे. गाद्या स्वच्छ नसल्याने रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या ३० खाटांच्या रुग्णालयात स्वच्छतेची नितांत गरज आहे. तालुक्यात आरोग्यसेवा देणारी यंत्रणा स्वत:च्या विभागातील मिळणाऱ्या सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न पुढे आहे. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांच्या कमतरतेमुळे रूग्णांना खासगी रुग्णालयाकडे वळावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींना रुग्णांना सामोरे जावे लागते.