शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

भेसळयुक्त पदार्थांमुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: November 1, 2014 02:00 IST

तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील बऱ्याच गावात हॉटेल्समधून सर्रास निकृष्ट व भेसळयुक्त खाद्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे.

गोंदिया : तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील बऱ्याच गावात हॉटेल्समधून सर्रास निकृष्ट व भेसळयुक्त खाद्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. अस्वच्छ वातावरणात होत असलेल्या भेसळयुक्त खाद्य पदार्थांच्या विक्रीमुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होऊन त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अन्न व नागरी औषध प्रशासन विभाग तांत्रीक कारणांवरून औषध विक्रेत्यांवर कारवाई करतात. मात्र हॉटेल्समधून विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त व निकृष्ट खाद्य पदार्थांकडे या विभागाचे लक्ष असल्याचे दिसत नाही. विशेष म्हणजे जिल्हा अन्न औषध प्रशासन विभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसून येतो. परिसरात असलेल्या बहुतांश हॉटेल्समध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांची निर्मिती अस्वच्छ जागेत व उघड्यावरच केली जाते. शिवाय रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची धूळ खाद्य पदार्थांवर बसत असल्यामुळे या खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. हॉटेल्समधील पिण्याचे पाणी साठवून ठेवणारी भांडी स्वच्छ राहत नसून त्यात साठवलेले पाणी नागरिकांना प्यायला दिले जाते. तर जास्त नफा कमविण्यासाठी निष्कृष्ट साहीत्य वापरून खाद्य पदार्थ तयार केले जातात. शिवाय हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या व खाद्य पदार्थाची निर्मिती करणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी कधीच करण्यात येत नसल्यामुळे याचाही थेट परिणाम खाद्य पदार्थ घेणाऱ्या ग्राहकांवर होत असतो. प्रत्येक गावात बस थांबा, रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात लहान मोठे हॉटेल्स थाटले असल्यामुळे नागरिकांना याच हॉटेल्समधून खाद्य पदार्थ घेणे भाग पडते. चमचमीत आणि तेलयुक्त खाद्य पदार्थांमध्ये भेसळ तर असतेच शिवाय ते शिळे असल्याचीही शक्यता टाळता येत नाही. हे खाद्य पदार्थ येणाऱ्या -जाणाऱ्यांच्या नजरेत पडावे यासाठी समोरच ठेवले जातात. मात्र त्यावर रस्त्यावरची धूळ व माशा बसतात त्याकडे लक्ष दिले जात नाही. हेच पदार्थ सामान्य माणूस खरेदी करून खातो. त्यानंतर मात्र त्यांना आजारी पडावे लागते. यातही चिमुकल्यांना तर जास्तच त्रास होतो. सध्या दिवाळीची धामधूम सुरू असून मोठ्या प्रमाणात नाश्ता व मिष्ठान्न तयार केले जात आहे. यात भेसळीचे प्रकार टाळता येत नाही. असे असतानाही मात्र अन्न व औषध विभागाकडून काहीच पाऊलं उचलण्यात आले नसल्याचे दिसते. यामुळे हॉटेलवाल्यांचे फावते. अशात अन्न औषधी प्रशासन विभागाने वेळोवेळी हॉटेल्सची तपासणी करावी अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. (शहर वार्ताहर)