शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

मंगेझरीत हाताची घडी, तोंडावर बोट

By admin | Updated: March 14, 2015 01:32 IST

जादूटोण्याच्या संशयातून झालेल्या हत्येमुळे चर्चेत आलेले मंगेझरी हे गाव अवघे १२०० लोकवस्तीचे आहे.

मनोज ताजने गोंदियाजादूटोण्याच्या संशयातून झालेल्या हत्येमुळे चर्चेत आलेले मंगेझरी हे गाव अवघे १२०० लोकवस्तीचे आहे. गावाच्या एका कोपऱ्यात झालेली घडामोड वाऱ्यासारखी काही क्षणात दुसऱ्या कोपऱ्यात पसरते. पण अनिल हळदे यांची बेदम मारहाण करून हत्या करताना त्याचा आवाज कोणालाच ऐकायला आला नाही, असे होऊ शकत नाही. गावातील अनेक लोक या घटनेचे साक्षीदार आहेत. पण पोलिसांच्या ससेमिऱ्यामुळे आणि मारेकऱ्यांच्या भितीमुळे कोणीही ही घटना मी पाहिली असे म्हणण्यास तयार नाही. सर्वकाही नजरेसमोर घडले असताना आपण काहीच पाहीले नाही, आपल्याला काहीच माहीती नाही, असे उत्तर पोलिसांना मिळत आहे.या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून सखोल माहिती घेण्यासाठी दिनांक १६ पर्यंत पीसीआर मिळविला. आरोपींनी गुन्ह्याची कबूली ही केली, पण जोपर्यंत या घटनेची साक्ष कुणी देणार नाही तोपर्यंत न्यायालयात हे प्रकरण तग धरू शकणार नाही. आरोपी आज जरी गुन्हा कबूल करीत असले तरी न्यायालयात ते आपले बयाण पलटवू शकतात. त्यासाठी प्रत्यक्ष घटना पाहणारे साक्षीदार पोलिसांसाठी महत्वाचे ठरणार आहे. आदिवासी समाजाचे प्राबल्य मंगेझरी या जंगलाने वेढलेल्या गावात आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. केवळ पाच घरे पोवार समाजाची तर चार घरे मरार समाजाची आहेत. त्या मरार समाजाच्या चार भावंडामध्ये वर्षभरापूर्वी अनिल हळदेची भर पडली होती. त्यामुळे बाहेरगावाहून आलेली दुसऱ्या समाजातील व्यक्तीच गावात जादूटोणा करू शकते, असा समज काही लोकांनी करून अनिल विरूध्द गावात वातावरण तयार केले आणि त्याला कायमचे दूर केले. तिघांच्या मृत्यूने बळावला जादूटोण्याचा संशय वर्षभरापासून मंगेझरीत राहायला आलेला अनिल जादूृटोणा करतो असा संशय गेल्या काही दिवसांतच बळावला होता. गेल्या दीड ते दोन महिन्यांत गावातील दोन शाळकरी मुलांसह एका इसमाचा आजाराने मृत्यू झाला. या शिवाय गावातील एक महिलाही आजारी आहे. त्या सर्वांवर अनिलने जादू केली होती असा गावकऱ्यांच्या संशय आहे. होळीची राख तळहातावर घेऊन अनिल दुसऱ्यांकडे पाहून ‘छू’ करीत होता, अशी माहिती आहे. गावकऱ्यांच्या अंधश्रध्दाळूपणामुळे त्यांनी या जादूचा धसका घेतला होता. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला नाही. या प्रकरणात आरोपी या पेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. पोलिसांत कोणी साक्ष देऊ नये यासाठी आरोपींच्या लोकांकडून गावात दहशत पसरविण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करावी.डॉ. प्रकाश धोटे जिल्हा संघठक, अंनिस