शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

शिंगाड्याच्या शेतीतून आठ महिन्यात दीड लाखाचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:45 IST

शेतीतील वाढता लागवड खर्च आणि तीच तीच पिके घेतली जात असल्याने जमिनीची पोत देखील दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तर शेती करणे तोट्याचे होत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढत आहे.

ठळक मुद्देडुलीचंद पटेल या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग : बोडीची झाली मदत

डी.आर. गिरीपुंजे ।लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : शेतीतील वाढता लागवड खर्च आणि तीच तीच पिके घेतली जात असल्याने जमिनीची पोत देखील दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तर शेती करणे तोट्याचे होत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढत आहे. मात्र नैराश्याच्या गर्तेतून बाहेर येत तिरोडा तालुक्यातील बिहिरीया येथील एका शेतकऱ्याने शेतीतील बोडीच्या मदतीने शिंगाड्याची शेती करुन आठ महिन्यात दीड लाखाचे उत्पन्न घेतले.यात त्यांना ९० हजार रुपयांचा शुध्द नफा झाला. बोडीमध्ये शिंगाड्याची यशस्वी शेती करुन त्यांनी शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करुन धान पिकाला पर्याय सुध्दा दिला आहे.डुलीचंद नारायण पटले रा.बिहिरीया असे शिंगाड्याची यशस्वी शेती करणाºया शेतकºयाचे नाव आहे. पटले यांच्याकडे एकूण तीन एकर शेती आहे. खरीप हंगामात भात पीक, रब्बी हंगामात गहू, कोरडवाहू पिकांची लागवड करतात. धान पीक म्हटले की जास्त व हमखास उत्पादनासाठी संरक्षित सिंचनाची गरज असते. धानाच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते समाधानी नव्हते. यासाठी ते सतत कृषी विभागाच्या अधिकाºयांच्या संर्पकात होते. सन २०१५-१६ वर्षी त्यांच्या गावाची निवड सेंद्रीय शेतीसाठी झाली. मी सुद्धा त्यात स्वच्छेने सहभागी झालो. सुरुवातीला ही शेती नवीन वाटली. परंतु त्या शेतीत वापरले जाणारे खत हे बाजारपेठेतून न आणता घरच्या घरी तयार करण्याचे प्रशिक्षण कृषी सहायक अजय खंडाईत दिले.त्यामुळे खतावरील खर्चाची बचत झाली. त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या वर्षीच मी एक एकर शेती संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने केली. त्यासाठी लागणारे दशपर्णी अर्क, जीवामृत, बिजामृत, गांडूळ खत,हिरवळीचे खत घरीच तयार केले. हळू हळू उत्पादनात वाढ होऊन खर्चाची बचत झाली. बाजारात माझ्या तांदळाची मागणी वाढली. रासायनिक तांदळाच्या तुलनेत प्रती किलो १५ रुपये जास्त मिळू लागले. कृषी विभागातंर्गत मागेल त्याला बोडी योजनेतंर्गत शेतात बोडी तयार केली.बोडीत शिंगाड्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला.कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात बोडीत शिंगाड्याची लागवड केली.८ महिन्याच्या कालावधीत पीक हातात आले. विशेष म्हणजे शिंगाडा पिकाला कोणत्याही प्रकारचा रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत नाही. मशागतीचा खर्च कमी येतो. शिंगाड्याची बाजारात विक्री करण्याची गरज नाही. छोटे-छोटे व्यापारी बांधावर येवून शिंगाडे खरेदी करतात. मागील हंगामात शिंगाड्याच्या शेतीतून १ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून खर्च वगळता ९० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. त्यानंतर बोडीत पाणी शिल्लक असल्याने त्यात मत्स्यबीज सोडले. ते आता एक ते दीड किलोपर्यंत झाले आहे. त्यामुळे बोडीचा तिहेरी लाभ झाल्याचे पटले यांनी सांगितले. यासाठी कृषी सहायक अजय खंडाईत, कृषी पर्यवेक्षक रहांगडाले, मंडळ कृषी अधिकारी मोहाडीकर,तालुका कृषी अधिकारी एम.ए.वावधने आणि एस.आर.पुस्तोडे व उमेश सोनेवाने यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती