शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
7
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
8
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
9
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
10
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
11
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
12
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
13
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
14
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
15
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
16
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
17
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
18
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
19
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
20
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांपासून हाजराफॉल बेवारस

By admin | Updated: August 3, 2014 23:28 IST

एकेकाळी सतत वन विकास महामंडळाच्या देखरेखीत असलेला हाजराफॉल परिसर मागील जवळपास २० वर्षांपासून बेवारस व नियंत्रणाबाहेर झालेला दिसत आहे. त्यामुळे येथे कोणीही केव्हाही

विजय मानकर - सालेकसाएकेकाळी सतत वन विकास महामंडळाच्या देखरेखीत असलेला हाजराफॉल परिसर मागील जवळपास २० वर्षांपासून बेवारस व नियंत्रणाबाहेर झालेला दिसत आहे. त्यामुळे येथे कोणीही केव्हाही बेरोकटोक पणे येतात आणि वाटेल ते कृत्य करून जातात. त्यामुळे याचा परिणाम येणाऱ्या पर्यटकांसोबतच येथील नैसर्गिक सौंदर्यासोबत बहुमूल्य वनसंपत्ती आणि वन्य प्राण्यांवर झालेला आहे. आज हा परिसर उजाड होण्याच्या वाटेवर जाताना दिसत आहे. अशा परिस्थितीत हाजराफॉल परिसराचा वाली कोण, असा ही प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे.२५-३० वर्षापूर्वीचा दृश्य आठवला तर आपणास असे माहीत होईल की, हाजरा परिसर पूर्णत: वनविकास महामंडळाच्या नियंत्रणात होते. या ठिकाणी कर्मचारी व अधिकारी राहण्यासाठी क्वार्टर असलेली एक वसाहत होती. यात पिण्याच्या पाण्यासाठी विहिर, वीज पुरवठा व इतर आवश्यक सोयी सुविधा पुरेशा प्रमाणात होत्या. त्याचबरोबर येथे एक पिठाची चक्कीसुद्धा होती. येथे पीठ दळण करण्यासाठी जमाकुडो, दरेकसा येथील लोक येत होते. सर्व सोयी सुविधाअसून वनीकरणाचे प्रकल्प चालत होते व वनसंवर्धन करण्याच्या दिशेने आवश्यक ते सर्व कार्यक्रम या ठिकाणी राबविण्यात येत होते. त्या माध्यमातून अनेक कर्मचारी येथे कार्यरत होते. त्याचबरोबर या परिसरातील अनेक बेरोजगार युवकांना काम मिळत होते. तसेच मजूर वर्गांंनासुद्धा वर्षभर मजुरीचे साधन प्राप्त होत होते. त्यामुळे या परिसरात सतत प्रत्येक बाबीवर नजर व नियंत्रण होते. या परिसरात वनविकास महामंडळाचे एक विश्राम गृह सुद्धा होते. त्यात द्वितीय श्रेणीचे दोन सूट, विश्राम कक्ष, स्वयंपाक घर व इतर खोल्यांचा समावेश होता. त्या खोल्यांना अमलतास, पारीजात, रोहण असे नाव देण्यात आले होते. या ठिकाणी अनेक अधिकारी, पदाधिकारी येवून विश्रांती व मुक्काम करीत होते. त्यामुळे सतत वनविकास महामंडळाचे कर्मचारी, चौकीदार आदी सेवेत व देखरेखीत तत्पर होते. बाहेरुन आलेल्या प्रत्येकांना आकर्षित व प्रभावित करणारे असे हे परिसर होते. परंतु ८० आणि ९० च्या दशकात काही अप्रिय घटना घडल्यामुळे या परिसराचे हे वैशिष्ट्य लुप्त झाले. येथील वैभव नष्ट झाले आणि हाजराफॉल परिसर बेवारस झाले. आज या परिसराचा कोणी वाली दिसत नाही. प्रशासन, वन विभाग व लोकप्रतिनिधी कोणीही याकडे विशेष लक्ष देण्यास रस घेताना दिसत नाही. ८० च्या दशकात वाघाचा धुमाकूळ वाढलेला होता. तर ९० च्या दशकात नक्षली कारवाया व दहशतीमुळे या परिसराला सोडून पलायन झाले. हाजराफॉल अनाथ झाले. १९८४-८५ च्या दरम्यान एकदा वाघाने एका कर्मचाऱ्याच्या मुलाला घरुन रात्री झोपेत असताना उचलून नेले व त्याचे भक्षण केले. त्यामुळे येथील वसाहतीत राहणारे सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय दहशतीत आले. त्यानंतरही वाघाचा आक्रमणकारी वावर सुरुच राहीला. नाईलाजाने येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वसाहत सोडली. एकीकडे दहशतीचे वातावरण असताना त्याच काळात नक्षली कारवायासुद्धा होऊ लागल्या व शासनाचा निषेध म्हणून नक्षलीवादी वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय, निमशासकीय संपत्तीची जाळपोळ व नुकसान करू लागले. कर्मचाऱ्यांनी वसाहत सोडल्यानंतरही येथील विश्राम गृहाची देखरेख व उपयोग सुरू राहीला. इतर उपक्रम सुद्धा सुरू राहीले. परंतु नक्षलवाद्यांनी विश्रामगृहाला टार्गेट केले व त्यालाही जाळून राख करून टाकले. त्यानंतर या परिसरात कोणीही रात्री थांबायला तयार झाला नाही. आज परिस्थिती बघितल्यावर असे दिसले की येथील क्वार्टर व विश्रामगृह सगळे जमिनदोस्त झाले आहेत. सर्व योजना बंद झाल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांकडे या परिसराची देखरेख असेल ते दिवसात सुद्धा या परिसरात सतत देखरेख करताना दिसत नाही. त्यामुळे या परिसरात प्राण्यांची शिकार व किमती वृक्षांची कत्तल यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी वने नष्ट होण्याच्या मार्गावर तर प्राणी लुप्त होण्याच्या वाटेवर गेले आहेत. अशात येथे हाजराफॉल परिसर बेवारस झाल्यामुळे कोणीही कुठलाही व्यक्ती केव्हाही येऊन येथे बिनधास्त वावरतो. निसर्गाशी छेडछाड करून जातो व जीवाला धोका ओढवून घेतो.