शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

अतिथंडीने धानाच्या वाफ्यांची वाढ खुंटली

By admin | Updated: January 15, 2015 22:54 IST

सध्या न्यूनतम तापमानात होत असलेली घट व थंडीचा वाढता कडाका यामुळे पिके प्रभावित होत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी भात पिकासाठी कामाला लागला असून वाफे टाकण्यात आले आहेत.

गोंदिया : सध्या न्यूनतम तापमानात होत असलेली घट व थंडीचा वाढता कडाका यामुळे पिके प्रभावित होत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी भात पिकासाठी कामाला लागला असून वाफे टाकण्यात आले आहेत. मात्र थंडीच्या कडाक्याने वाफे कोमजत असून त्यांची वाढ खुंटली आहे. परिणामी उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे पीक प्रफुल्लीत दिसण्याऐवजी अतिथंडीने कोमेजलेली दिसतात. रबी उत्पादनातही आता घट होणार असल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. यंदा संकटांची मालिका सुरू आहे. यामुळे बळीराजा पिचला आहे. पावसाचा विलंब, नंतर थोडा पाऊस, पुन्हा पावसाची दडी या दृष्ट चक्रामुळे शेतकरी तुटला आहे. धान पिकाने दगा दिल्याने शेतकऱ्याने गहू, हरभरा, लाखोळी, जवस सारख्या जोड धान्यांतून भरपाई करण्याचा प्रयत्न केला. तर उन्हाळी बात विकासाठी धडपड सुरू केली आहे. सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रात वाफे टाकण्यात आले आहेत. मात्र थंडीचा जोर वाढतच चालल्याने या वाफ्यांवरही प्रभाव जाणवत आहे. कृषी तज्ज्ञांनुसार या अतिथंडीमुळे वाफ्यांची वाढ खुंटते व तोच प्रकार जिल्ह्यात सुद्धा बघता येत आहे. निसर्ग प्रत्येकवेळी शेतकऱ्यांसमोर विपरीत स्थिती निर्माण करीत आहे. इतकी संकटे कमी झाली म्हणून की काय अलीकडे थंडीची लाट तयार झाली आहे. तरिही थंडी व धुके यांचा सामना करीत शेतात पिके उभे आहे. जमिनीत पुरेसा ओलावा आहे. रासायनिक खते व किटकनाशकांच्या फवारण्या झाल्या आहेत. अशावेळी तूर, गहू व चना ही पिके बहारदार असने अपेक्षित असते. मात्र थंडीने ही सर्वच पिके कोमेजलेल्या अवस्थेत दिसत आहे. शिवाय पिकांची वाढ खुंटली आहे. थंडी अशीच कायम राहिल्यास उभे पीक वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)