शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

धानाला हमीभाव अन् बेरोजगारांच्या हाताला काम केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:36 IST

गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित आहे. या दोन्ही जिल्ह्यातील धान हे प्रमुख पीक आहे. मात्र या जिल्ह्यातील शेतकरी मागील तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहेत.

ठळक मुद्देबळीराजाचा सवाल : ७० हजारांवर बेरोजगार, जिल्ह्यात शेतीपूरक उद्योगांचा अभाव

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित आहे. या दोन्ही जिल्ह्यातील धान हे प्रमुख पीक आहे. मात्र या जिल्ह्यातील शेतकरी मागील तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहेत. तर मागील दहा वर्षांत केवळ धानाच्या हमीभावात ९०० रुपयांची वाढ झाली. त्या तुलनेत लागवड खर्चात पाच ते दहा पट वाढ झाली आहे.धानाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे. तर मागील पाच वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग स्थापन न झालेल्या रोजगाराचा अभाव आहे. त्यामुळे योग्य हमीभाव व बेराजगारांच्या हाताला काम केव्हा मिळणार असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.जिल्ह्यात २ लाख ८६ हजार खातेदार शेतकरी आहेत. तर दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दीड लाखावर आहे. विभक्त कुटुंब पध्दतीमुळे शेतीचे तुकडे पडत आहे. परिणामी क्षेत्र लहान आणि लागवड खर्च अधिक अशी स्थिती आहे. मागील दहा वर्षांत धानाच्या हमीभावात केवळ ९०० रुपयांनी वाढ झाली तर धानाच्या एकरी लागवड खर्च १८ ते २० हजार रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे केलेला लागवड खर्च सुध्दा भरून निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव देण्याची मागणी केली जात आहे. पण अद्यापही ही मागणी पूर्ण झाली नसल्याने शेतकरी खासगी व्यापाºयांच्या आर्थिक शोषणाला बळी पडत आहे. धानाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी भाव मिळत असल्याने शेती तोट्याची होत चालली असून २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार असा सवाल शेतकºयांनी केला आहे. जिल्ह्यात २०१५ पासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. तर धापेवाडा, कटंगी, झाशीनगर, घुर्मरा आदी सिंचन प्रकल्प रखडले आहेत.त्यामुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येण्यापासून वंचित असून शेतकºयांना दुबार पीक घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागून शेतकरी केव्हा समृध्द होणार असा सवाल देखील शेतकºयांनी केला आहे. जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून जलयुक्त शिवार अंतर्गत अडीच हजारावर कामे करण्यात आली. त्यामुळे थोडीफार मदत झाली. मात्र भूगर्भातील पाण्याचा उपसा वाढला असल्याने जिल्ह्यातील भूजल पातळी ३ ते ४ फूट खोल गेली आहे. त्यामुळे भूजल पातळी कायम ठेवण्यासाठी जमिनीत पाण्याचा पुनर्भरणावर भर देण्याची गरज आहे.तज्ज्ञांचे मतशेतमालाला कृषी मुल्य आयोगाने ठरविलेल्या दरानुसार हमीभाव मिळत नाही तोपर्यंत शेतकºयांचा सर्वांगिन विकास शक्य नाही. कर्मचाºयांप्रमाणे शेतकºयांना सुध्दा सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर किमान पेशंन मिळायला हवे. तोपर्यंत शेतकरी समृध्द होणार नाही.-विजय जांवधिया, शेतकरी नेते.शासनाने शेतीच्या लागवड खर्चाचा आणि त्यातून हाती येणाºया उत्पादनाचा विचार करुन शेतमालाचे हमीभाव ठरविण्याची गरज आहे. तरच शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचाविणे शक्य आहे. तरच शेतकरी नैराश्याच्या गर्तेतून बाहेर येतील.- शरद निंबाळकर, माजी कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ.

टॅग्स :Farmerशेतकरी