शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

चांदोरीत उगवले पांढरे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:01 IST

पारंपरिक धान शेतीला फाटा देत एका शेतमजुराने चक्क आपल्या शेतात पांढरे सोने उगविले असून हे पांढरे सोने त्याच्या शेतात मोठ्या ऐटीने डोलत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देशेतमजुराने केला प्रयोग : पाच एकरात कापूस व तुरीची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : पारंपरिक धान शेतीला फाटा देत एका शेतमजुराने चक्क आपल्या शेतात पांढरे सोने उगविले असून हे पांढरे सोने त्याच्या शेतात मोठ्या ऐटीने डोलत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.तिरोडा तालुक्यातील ग्राम चांदोरी खुर्द येथील टेकलाल वामन भोयर नामक शेतमजुराचा हा यशस्वी प्रयोग आहे. कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आपल्या अनुभवाच्या आधारावर त्याने भल्याभल्यांना मागे टाकत ही कामगिरी करून दाखविली आहे.तिरोडा तालुक्यातील ग्राम चांदोरी खुर्द येथील शेतमजूर टेकलाल भोयर हे वर्धा जिल्ह्यातील सेलु तालुक्यातील घोराड गावात काम करीत होते. तेथेच त्यांनी कापूस लागवडीचा अनुभव घेतला व गावी परतून शेती भाड्याने घेतली. येथे त्यांनी पहिल्यांदाच कापूस लागवडीचा प्रयोग केला. जमिनीची पोत कशी असावी, स्वत: आयुर्वेदीक औषध तयार करून त्याची फवारणी, खत टाकणे या सर्व अनुभवाचा वापर त्यांनी येथे केला. परिणामी, त्यांच्या शेतात आज पांढरे सोने ऐटीने डोलत आहे. जिल्ह्याला धानाचा कटोरा म्हटले जात असून येथील शेतकरी फक्त धानाच्या मागेच राहतात. मात्र टेकलाल भोयर यांनी कापसाची लागवड करून धानावरच अवलंबून राहता पीक बदल करण्याचा संदेश दिला आहे.विशेष म्हणजे, कृषी विभागाकडून बागायती भाजीपाला, फुलशेती, केळी, पॉली हाऊस, गहू, चना यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करून मोठमोठे शिबिर घेतले जाते. यासाठी जाहिरात केली जाते. मात्र कापसासाठी कोणत्याही कृषी अधिकारी व लोकप्रतिनिधीने पुढाकार घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले नाही. मात्र भोयर यांनी आपल्या अनुभव जिद्दीने उसनवारीवर पैसे घेऊन धानाच्या जिल्ह्यात कापसाचा यशस्वी प्रयोग करून दाखविला. आता कापूस काढण्यास सुरुवात करणे सुरु होणार असून पाच ते सहा लाखांचे उत्पन्न होणार. विशेष म्हणजे, हा अनुभवाचा अन्य शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू असे ही त्यांनी सांगीतले.कृषी विभागाबद्दल व्यक्त केली नाराजीभोयर यांनी पंचायत समिती कृषी विभाग, तिरोडा येथील कृषी अधिकारी कार्यालयाला लेखी अर्ज देवून काही मार्गदर्शन मागीतले होते. पण मार्गदर्शन तर दूरच मात्र एखाद्या अधिकाºयाने त्यांच्या शेतात साधा फेरफटकाही मारला नाही. हाच प्रयोग एखाद्या मोठ्या शेतकऱ्याचा किंवा लोकप्रतिनिधीचा असता तर त्याला बघण्यासाठी हजारो शेतकºयांना शेतावर नेले असते व उदोउदो केला असता अशी शोकांतीका व्यक्त करीत त्यांनी कृषी विभागाबद्दल नाराजी व्यक्त केली. याकडे जिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी भोयर यांच्या शेतातील पिकाची पाहणी करावी अशी या शेतकऱ्याची मागणी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती