शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

जिल्ह्याची भूजल पातळी २ मीटरने खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:37 IST

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ५० टक्केच पाऊस झाला. तो देखील खंड स्वरुपात पडला. परिणामी सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देउन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट : कमी पावसाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ५० टक्केच पाऊस झाला. तो देखील खंड स्वरुपात पडला. परिणामी सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. याचाच परिणाम भूजल पातळीवर झाला असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच भूजल पातळी २.०८ मीटरने खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना यंदा भीषण पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाकडून सुरूवातीपासूनच वर्तविली जात होतीे. त्यामुळे कधी नव्हे ते यंदा गोंदिया शहराला पुजारीटोला प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव आणि सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर भूजल पातळी अवलंबून असते.मात्र अल्प पावसामुळे जिल्ह्यातील लहान, मोठ्या, मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या स्थितीत केवळ २० टक्केच पाणीसाठा आहे. तर काही तलाव आताच कोरडे पडले आहेत. त्याचाच परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत प्रथमच आॅक्टोबर-नोव्हेबर महिन्यात जिल्ह्याची भूजल पातळी २.०८ मीटरने खालावल्याचे बोलल्या जाते.मागील वर्षी याच कालावधीत भूजल पातळी ४.१० मीटर होती. यंदा आॅक्टोबर महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे जिल्ह्यातील ७९ विहीरींचे निरीक्षण करण्यात आले.यात पाच वर्षांच्या तुलनेत ६६ विहिरींची पाण्याची पातळी खालावलीे असल्याचे आढळले. तर १३ विहीरींच्या पाण्याच्या पातळीत थोडी सुधारणा झाली असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.गोरेगाव तालुक्यावर सर्वाधिक परिणामकमी पावसाचा सर्वाधिक फटका गोरेगाव तालुक्याला बसला. या तालुक्यातील ३ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या विहिरींची पाण्याची पातळी ५.१७ मीटरने खालावली आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील ११ विहिरींपैकी १० विहिरींची ४.३३ मीटरने पातळी खालावली. परंतु एका विहीरीत ०.१४ मीटरने सुधारणा झाली. आमगाव तालुक्यातील ९ विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २.६७ मीटरने पाण्याची पातळी खालावली आहे. गोंदिया तालुक्यातील १० विहीरींचे सर्वेक्षण करण्यात आले. ८ विहीरींची पाण्याची पातळी खालावली असल्याचे आढळले.भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे निरीक्षण विहीरींची पाण्याची पातळी मोजण्यात आली. यात भूजल पातळी खालवल्याचे लक्षात आले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत यंदा प्रथमच भूजल पातळी २.०८ मीटरने खालावली असल्याचे आढळले.वाय.एस. वालदेवरिष्ठ भूवैज्ञानिक, गोंदिया.

टॅग्स :Waterपाणी