शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

जिल्ह्याची भूजल पातळी २ मीटरने खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:37 IST

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ५० टक्केच पाऊस झाला. तो देखील खंड स्वरुपात पडला. परिणामी सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देउन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट : कमी पावसाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ५० टक्केच पाऊस झाला. तो देखील खंड स्वरुपात पडला. परिणामी सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. याचाच परिणाम भूजल पातळीवर झाला असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच भूजल पातळी २.०८ मीटरने खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना यंदा भीषण पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाकडून सुरूवातीपासूनच वर्तविली जात होतीे. त्यामुळे कधी नव्हे ते यंदा गोंदिया शहराला पुजारीटोला प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव आणि सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर भूजल पातळी अवलंबून असते.मात्र अल्प पावसामुळे जिल्ह्यातील लहान, मोठ्या, मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या स्थितीत केवळ २० टक्केच पाणीसाठा आहे. तर काही तलाव आताच कोरडे पडले आहेत. त्याचाच परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत प्रथमच आॅक्टोबर-नोव्हेबर महिन्यात जिल्ह्याची भूजल पातळी २.०८ मीटरने खालावल्याचे बोलल्या जाते.मागील वर्षी याच कालावधीत भूजल पातळी ४.१० मीटर होती. यंदा आॅक्टोबर महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे जिल्ह्यातील ७९ विहीरींचे निरीक्षण करण्यात आले.यात पाच वर्षांच्या तुलनेत ६६ विहिरींची पाण्याची पातळी खालावलीे असल्याचे आढळले. तर १३ विहीरींच्या पाण्याच्या पातळीत थोडी सुधारणा झाली असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.गोरेगाव तालुक्यावर सर्वाधिक परिणामकमी पावसाचा सर्वाधिक फटका गोरेगाव तालुक्याला बसला. या तालुक्यातील ३ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या विहिरींची पाण्याची पातळी ५.१७ मीटरने खालावली आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील ११ विहिरींपैकी १० विहिरींची ४.३३ मीटरने पातळी खालावली. परंतु एका विहीरीत ०.१४ मीटरने सुधारणा झाली. आमगाव तालुक्यातील ९ विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २.६७ मीटरने पाण्याची पातळी खालावली आहे. गोंदिया तालुक्यातील १० विहीरींचे सर्वेक्षण करण्यात आले. ८ विहीरींची पाण्याची पातळी खालावली असल्याचे आढळले.भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे निरीक्षण विहीरींची पाण्याची पातळी मोजण्यात आली. यात भूजल पातळी खालवल्याचे लक्षात आले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत यंदा प्रथमच भूजल पातळी २.०८ मीटरने खालावली असल्याचे आढळले.वाय.एस. वालदेवरिष्ठ भूवैज्ञानिक, गोंदिया.

टॅग्स :Waterपाणी