शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

२० गावांतील नळ योजनांना ग्रीन सिग्नल

By admin | Updated: July 21, 2014 23:55 IST

ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील २० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली आहे. नुतकेच पार पडलेल्या जलव्यवस्थाप व स्वच्छता

गोंदिया : ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील २० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली आहे. नुतकेच पार पडलेल्या जलव्यवस्थाप व स्वच्छता समितीच्या सभेत हि मंजूरी देण्यात आली आहे. या योजनांची अंदाजपत्रकीय किंमत १३ कोटी २२ लाख ४५ हजार १७० रूपये एवढी आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होतात. गावांत नळ पाणी पुरवठा योजना नसल्याने हातपंप, विहीरी किंवा अन्य जलस्त्रोतांमधून नागरिकांना आपली तहान भागवावी लागते. परिणामी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आजार फोफावतात व कधी तर काहींना जीव गमवावा लागतो अशी स्थिती असते. अशात गावाला स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मिळावी अशी प्रत्येक गावकऱ्यांची मागणी असते. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजने मार्फत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम २०१३-१४-१५ मधील कृती आराखड्यात ग्रामीण भागातून नळ पाणी पुरवठा योजनांची मागणी करण्यात आली होती. या मागणीवर निर्णय घेण्याच्या दृष्टीने नुकतीच जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सभेत हा विषय मांडण्यात आला. यावर ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हा उदात्त हेतू पुढे ठेऊन अध्यक्षांनी २० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली. मंजूरी देण्यात आलेल्या योजनांमध्ये गोंदिया तालुक्यातील बनाथर, मोरवाही, नवरगाव कला, बटाना, डोंगरगाव, मुंडीपार, धानमगाव, मजितपूर, गिरोला, चुटीया, बिरसोला, रापेवाडा, गोरेगाव तालुक्यातील सर्वाटोला, तिरोडा तालुक्यातील कोडेलोहारा, सेजगाव, भजेपार, काचेवानी, सालेकसा तालुक्यातील गिरोला, आमगाव तालुक्यातील महारीटोला व सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी या गावातील योजनांचा समावेश आहे. या योजनांचे १३ कोटी २२ लाख ४५ हजार १७० रूपयांचे अंदाजपत्रक असून लवकरच या योजनेची कामे पूर्ण होतील असे अध्यक्षांनी कळविले आहे. (शहर प्रतिनिधी)