शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

२० गावांतील नळ योजनांना ग्रीन सिग्नल

By admin | Updated: July 21, 2014 23:55 IST

ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील २० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली आहे. नुतकेच पार पडलेल्या जलव्यवस्थाप व स्वच्छता

गोंदिया : ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील २० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली आहे. नुतकेच पार पडलेल्या जलव्यवस्थाप व स्वच्छता समितीच्या सभेत हि मंजूरी देण्यात आली आहे. या योजनांची अंदाजपत्रकीय किंमत १३ कोटी २२ लाख ४५ हजार १७० रूपये एवढी आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होतात. गावांत नळ पाणी पुरवठा योजना नसल्याने हातपंप, विहीरी किंवा अन्य जलस्त्रोतांमधून नागरिकांना आपली तहान भागवावी लागते. परिणामी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आजार फोफावतात व कधी तर काहींना जीव गमवावा लागतो अशी स्थिती असते. अशात गावाला स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मिळावी अशी प्रत्येक गावकऱ्यांची मागणी असते. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजने मार्फत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम २०१३-१४-१५ मधील कृती आराखड्यात ग्रामीण भागातून नळ पाणी पुरवठा योजनांची मागणी करण्यात आली होती. या मागणीवर निर्णय घेण्याच्या दृष्टीने नुकतीच जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सभेत हा विषय मांडण्यात आला. यावर ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हा उदात्त हेतू पुढे ठेऊन अध्यक्षांनी २० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली. मंजूरी देण्यात आलेल्या योजनांमध्ये गोंदिया तालुक्यातील बनाथर, मोरवाही, नवरगाव कला, बटाना, डोंगरगाव, मुंडीपार, धानमगाव, मजितपूर, गिरोला, चुटीया, बिरसोला, रापेवाडा, गोरेगाव तालुक्यातील सर्वाटोला, तिरोडा तालुक्यातील कोडेलोहारा, सेजगाव, भजेपार, काचेवानी, सालेकसा तालुक्यातील गिरोला, आमगाव तालुक्यातील महारीटोला व सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी या गावातील योजनांचा समावेश आहे. या योजनांचे १३ कोटी २२ लाख ४५ हजार १७० रूपयांचे अंदाजपत्रक असून लवकरच या योजनेची कामे पूर्ण होतील असे अध्यक्षांनी कळविले आहे. (शहर प्रतिनिधी)