शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
4
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
5
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
6
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
7
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
8
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
9
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
10
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
11
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
12
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
13
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
14
'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
15
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
16
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
17
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
19
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या विलंबाने करपली धानाची रोपे

By admin | Updated: July 16, 2014 00:15 IST

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील काही मोजक्या गावांतील शेतीला इटियाडोह जलाशय, नवेगावबांध तलावाचे पाणी मिळते. उर्र्वरीत गावे मात्र जलसिंचनापासून आजही वंचित आहेत. त्यामुळे मागील

दुबार पेरणीही अशक्य : बळीराजासमोर उभे ठाकले जीवनमरणाचे संकटअमरचंद ठवरे - बोंडगावदेवीअर्जुनी/मोरगाव तालुक्यातील काही मोजक्या गावांतील शेतीला इटियाडोह जलाशय, नवेगावबांध तलावाचे पाणी मिळते. उर्र्वरीत गावे मात्र जलसिंचनापासून आजही वंचित आहेत. त्यामुळे मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाची रोपे करपल्या गेली आहेत. आता दुबार पेरणी करून रोवणी करण्याचीही वेळ निघून गेल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच खचून गेला. अशा परिस्थितीत पुढील वर्षभर संसाराचा गाडा कसा हाकणार, असा प्रश्न त्याच्यापुढे आ वासून उभा आहे.रोहीणी, मृग, आर्द्रा हे पावसाचे नक्षत्र कोरडेच गेल्याने भोळाभाबडा शेतकरी पावसाची वाट पाहात पूर्णत: खचून गेला आहे. मृग नक्षत्रातील एक-दोन सरींमुळे शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे लावले. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बियाण्यांची उगवणच झाली नाही. काही प्रमाणात वाढलेली रोपे मधल्या उघाडीदरम्यान तापलेल्या उन्हामुळे करपलेल्या अवस्थेत दिसत आहे. रोपे सुकल्याने दुबार पेरणी केल्याशिवाय गत्यंतर नाही.परंतू आता दुबार पेरणीही शक्य नसल्याचे कृषी विभाग सांगत आहे. तालुक्यात पाच महसूल विभाग आहेत. नवेगावबांध महसूल विभागात ४०८१ हे.आर.क्षेत्र खरीप पिकाखाली आहे. अर्जुनी/मोरगाव ४९५४ हे, महागाव ५९११ हे., केशोरी ४६९४ हे., बोंडगावदेवी ३५६३ हे. क्षेत्र ेखरीप पिकाखाली अपेक्षित आहे. मृग नक्षत्राच्या सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने धानाची उगवण पूर्णपणे झाली नाही. जी रोपे आज शेताच्या बांधावर दिसत आहेत, ती पूर्णत: करपलेल्या अवस्थेत आहेत. राष्ट्रीय पंचांगानुसार मृग, आर्द्रा हे पावसाचे नक्षत्र समजले जातात. परंतु आर्द्रा नक्षत्र पूर्णत: कोरडाच गेला, महागडी बी-बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले. परंतु तळपत्या उन्हाने पऱ्ह्यांची रोपे पूर्णत: सुकून गेली. गाढव वाहन घेऊन आलेल्या पूनर्वसू नक्षत्राने जोर दाखविण्याचे सोडून दिल्याने सूर्यराजाने आग ओकून जीवाची लाहीलाही केली. त्यात धानाचे पऱ्हे वाचविण्यासाठी भूमिपुत्रांनी शर्तीचे प्रयत्न केले, परंतु हातामध्ये पाणीच नाही तर पऱ्हे कुठून वाचणार अशी विदारक परिस्थिती तालुक्यात पहायला मिळाली. ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:ची ओलिताची सोय आहे, त्यांनी काही तुरळक प्रमाणात धानाची रोवणी केली आहे. तळपत्या उन्हाने हिरवे दिसणारे पऱ्हे मात्र आज पूर्णत: सुकलेले दिसत आहे. आता पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचा फायदा किती होईल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.तालुक्यात २०८३८ हे. क्षेत्रात धान रोवणी तर ११९९ हेक्टर क्षेत्रात आवत्यासाठी अपेक्षीत आहे. पेरणी झाली, रोपे उगवली, परंतु पावसाअभावी बांधातील रोपे मरणासन्न झाली. पाऊस पडण्याचे चार नक्षत्र संपल्यात जमा आहे. परंतु पावसाचा जोर अजूनही वाढलेला दिसत नाही. त्यामुळे सर्वांचा पोशिंदा असलेला शेतकरी मोठ्या धर्मसंकटात सापडला आहे. आता त्यांना रोख स्वरूपात मदत देण्यासाठी शासनानेच पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे.