शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

पावसाच्या विलंबाने करपली धानाची रोपे

By admin | Updated: July 16, 2014 00:15 IST

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील काही मोजक्या गावांतील शेतीला इटियाडोह जलाशय, नवेगावबांध तलावाचे पाणी मिळते. उर्र्वरीत गावे मात्र जलसिंचनापासून आजही वंचित आहेत. त्यामुळे मागील

दुबार पेरणीही अशक्य : बळीराजासमोर उभे ठाकले जीवनमरणाचे संकटअमरचंद ठवरे - बोंडगावदेवीअर्जुनी/मोरगाव तालुक्यातील काही मोजक्या गावांतील शेतीला इटियाडोह जलाशय, नवेगावबांध तलावाचे पाणी मिळते. उर्र्वरीत गावे मात्र जलसिंचनापासून आजही वंचित आहेत. त्यामुळे मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाची रोपे करपल्या गेली आहेत. आता दुबार पेरणी करून रोवणी करण्याचीही वेळ निघून गेल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच खचून गेला. अशा परिस्थितीत पुढील वर्षभर संसाराचा गाडा कसा हाकणार, असा प्रश्न त्याच्यापुढे आ वासून उभा आहे.रोहीणी, मृग, आर्द्रा हे पावसाचे नक्षत्र कोरडेच गेल्याने भोळाभाबडा शेतकरी पावसाची वाट पाहात पूर्णत: खचून गेला आहे. मृग नक्षत्रातील एक-दोन सरींमुळे शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे लावले. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बियाण्यांची उगवणच झाली नाही. काही प्रमाणात वाढलेली रोपे मधल्या उघाडीदरम्यान तापलेल्या उन्हामुळे करपलेल्या अवस्थेत दिसत आहे. रोपे सुकल्याने दुबार पेरणी केल्याशिवाय गत्यंतर नाही.परंतू आता दुबार पेरणीही शक्य नसल्याचे कृषी विभाग सांगत आहे. तालुक्यात पाच महसूल विभाग आहेत. नवेगावबांध महसूल विभागात ४०८१ हे.आर.क्षेत्र खरीप पिकाखाली आहे. अर्जुनी/मोरगाव ४९५४ हे, महागाव ५९११ हे., केशोरी ४६९४ हे., बोंडगावदेवी ३५६३ हे. क्षेत्र ेखरीप पिकाखाली अपेक्षित आहे. मृग नक्षत्राच्या सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने धानाची उगवण पूर्णपणे झाली नाही. जी रोपे आज शेताच्या बांधावर दिसत आहेत, ती पूर्णत: करपलेल्या अवस्थेत आहेत. राष्ट्रीय पंचांगानुसार मृग, आर्द्रा हे पावसाचे नक्षत्र समजले जातात. परंतु आर्द्रा नक्षत्र पूर्णत: कोरडाच गेला, महागडी बी-बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले. परंतु तळपत्या उन्हाने पऱ्ह्यांची रोपे पूर्णत: सुकून गेली. गाढव वाहन घेऊन आलेल्या पूनर्वसू नक्षत्राने जोर दाखविण्याचे सोडून दिल्याने सूर्यराजाने आग ओकून जीवाची लाहीलाही केली. त्यात धानाचे पऱ्हे वाचविण्यासाठी भूमिपुत्रांनी शर्तीचे प्रयत्न केले, परंतु हातामध्ये पाणीच नाही तर पऱ्हे कुठून वाचणार अशी विदारक परिस्थिती तालुक्यात पहायला मिळाली. ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:ची ओलिताची सोय आहे, त्यांनी काही तुरळक प्रमाणात धानाची रोवणी केली आहे. तळपत्या उन्हाने हिरवे दिसणारे पऱ्हे मात्र आज पूर्णत: सुकलेले दिसत आहे. आता पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचा फायदा किती होईल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.तालुक्यात २०८३८ हे. क्षेत्रात धान रोवणी तर ११९९ हेक्टर क्षेत्रात आवत्यासाठी अपेक्षीत आहे. पेरणी झाली, रोपे उगवली, परंतु पावसाअभावी बांधातील रोपे मरणासन्न झाली. पाऊस पडण्याचे चार नक्षत्र संपल्यात जमा आहे. परंतु पावसाचा जोर अजूनही वाढलेला दिसत नाही. त्यामुळे सर्वांचा पोशिंदा असलेला शेतकरी मोठ्या धर्मसंकटात सापडला आहे. आता त्यांना रोख स्वरूपात मदत देण्यासाठी शासनानेच पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे.