शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

जीर्ण इमारतीतून ग्रामपंचायतीचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:05 IST

नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात सद्यस्थितीत ५४५ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ३० ग्रामपंचायतींना जागाच उपलब्ध नसल्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे.१२६ ग्रामपंचायतीचा कारभार जीर्ण इमारतीतून सुरु असल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : ३० ग्रामपंचायतींना जागाच उपलब्ध नाही

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात सद्यस्थितीत ५४५ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ३० ग्रामपंचायतींना जागाच उपलब्ध नसल्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे.१२६ ग्रामपंचायतीचा कारभार जीर्ण इमारतीतून सुरु असल्याची बाब पुढे आली आहे.आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आदिवासींच्या उत्थानासाठी राबविण्यात येणाºया योजना किंवा त्यांना दिला जाणारा लाभ हा ग्रामपंचायतींच्या माध्यमातून देण्यात येते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीच दुर्बल घटकात असल्याचे वास्तव चित्रण गोंदिया जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.आमगाव तालुक्यातील एका ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत नाही. अर्जुनी-मोरगाव १, गोरेगाव १३, सालेकसा ४, तिरोडा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींना स्वत:ची जागा नाही. या ३० ही ग्रामपंचायतींकडे जागा आहे परंतु इमारत नाही अशी अवस्था आहे. जिल्ह्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या इमारती अत्यंत जीर्ण झाल्यामुळे त्या ग्रामपंचायतच्या इमारती बांधण्याची नितांत गरज आहे. आमगाव तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या जीर्ण झाल्या आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १९, देवरी १९,गोंदिया १६, गोरेगाव ६, सडक-अर्जुनी १५, सालेकसा १ व तिरोडा १० ग्रामपंचायतच्या इमारती जीर्ण आहेत.महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना मग्रारोहयो, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम, १४ वित्त आयोगाची कामे, विशेष देखभाल दुरूस्ती व शासनाच्या कुठल्याही योजनांचा फायदा घ्याचा असेल तर ग्रामपंचायतशिवाय पर्याय नाही. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना स्वत:चे छत नसल्यामुळे भाड्याच्या खोलीतून योजनांचा पाठपुरावा करावा लागत आहे.आपले सरकारला जागा नाहीशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीत सुरू केले. या सेवा केंद्रासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत एक स्वतंत्र खोली असणे आवश्यक आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींपैकी ३७८ ग्रामपंचायतमध्ये या सेवा केंद्रासाठी स्वतंत्र खोली नाही. त्यात आमगाव तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतमध्ये,अर्जुनी-मोरगाव ६९, देवरी २७, गोंदिया १०६, गोरेगाव ५५, सडक-अर्जुनी ६२, सालेकसा ११, तिरोडा १७ ग्रामपंचायतमध्ये स्वतंत्र खोली देण्यात आली नाही. अशी दुरवस्था ग्रामपंचायतींची गोंदिया जिल्ह्यात आहे.