शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

बंदोबस्तात पार पडली ग्रामसभा

By admin | Updated: December 4, 2014 23:10 IST

तालुक्यातील महागाव येथील शासकीय जमीन गट क्र.५८ मधील ०.४० हे.आर. जागा भारतीय बौद्ध स्मारक संस्थेला बौद्ध विहाराचे बांधकाम व इतर कार्यक्रमासाठी मंजूर करण्यासंदर्भात

३५ वर्ष जुने प्रकरण : हजारांवर गावकऱ्यांची उपस्थितीअर्जुनी/मोरगाव : तालुक्यातील महागाव येथील शासकीय जमीन गट क्र.५८ मधील ०.४० हे.आर. जागा भारतीय बौद्ध स्मारक संस्थेला बौद्ध विहाराचे बांधकाम व इतर कार्यक्रमासाठी मंजूर करण्यासंदर्भात ग्रामसभा घेऊन हा ठराव गावकऱ्यांसमोर ठेवण्यात यावा यासाठी ४ डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या जमिनीचा गेल्या ३५ वर्षांपासून वाद सुरू आहे. पूर्व परिस्थिती लक्षात घेत चोख बंदोबस्तात ही सभा पार पडली. विशेष म्हणजे या ग्रामसभेनिमित्त बंद पाळण्यात आला असून सभेला एक हजार २४३ गावकरी उपस्थित होते.या संबंधाने ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत गोंदिया येथे सभा घेण्यात आली. त्यानुसार तहसीलदार संतोष महाले यांनी महागाव ग्रामपंचायतला पत्र देऊन ग्रामसभेचे कार्यवृत्त सादर करण्यास कळविले. या अनुषंगाने ४ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी यशवंत परशुरामकर होते. यावेळी मंचावर सरपंच गुरुदेव उपरीकर, सत्यपालसिंह पवार, ग्रा.पं. सदस्य नेवारे, देशमुख, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रावण निमकर, पोलीस पाटील झोडे, पं.स.चे माजी उपसभापती नारायण ठाकरे, के.टी. शहारे, आर.के. देशमुख, तुकाराम देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. ग्रामसभेची सुरुवात झाली व यावेळी जमीन मंजूर करण्यासंदर्भात गावकऱ्यांचे मनोगत ऐकण्यात आले. मत व्यक्त करणाऱ्या सर्वांनीच ही जागा बौद्ध स्मारक समितीला देण्यात येऊ नये असे मत व्यक्त केले. तर या वादग्रस्त जागेवर तारेचे कुंपन अथवा सुरक्षाभिंत तयार करण्याची मागणी काही गावकऱ्यांनी केली. ग्रामसभेचे अध्यक्ष परशुरामकर यांची भूमिका अत्यंत आक्रमक होती. या सभेत तहसीलदार का उपस्थित झाले नाही. याविषयी प्रचंड आगपाखड करण्यात आली. शेवटी या ग्रामसभेत उपस्थित असलेल्या एक हजार २४३ लोकांना १५० रुपये मजुरी देण्यात यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल व आंदोलनाच्या दिवशी ही १५० रुपयांप्रमाणे मजुरी वसूल करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वारंवार ग्रामसभा घेऊन गावातील जनतेस वेढीस घेण्याचा प्रकार केला जात आहे असा आरोपही त्यांनी केला. ग्रामसभेला लागणारा खर्च बौध्द स्मारक समितीकडून वसूल करण्यात यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी गावकऱ्यांच्या उपस्थितीत ठरावांचे वाचन करण्यात आले. उपस्थितांनी हात उंचावून ठराव संमतीला दुजोरा दिला. एकमताने ठराव पारीत करण्यात आला. या ग्रामसभेत बौध्द स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित झाले नाहीत. बौध्द स्मारक समितीला गट क्र. ५८ ची जागा दिली जाणार नाही. शासकीय यंत्रणेने गट नं. ५८ संबधी पुन्हा हुकूमत गाजवली तर त्यावेळी रक्तपात झाल्यास गावकरी जबाबदार राहणार नाही. यासाठी अधिकारीच जबाबदार राहतील. गट क्र. ५६, ५७ व ५८ हे ग्रामसभेत ठराव पारीत झाल्याशिवाय देता येणार नाही. गट नं. ५७ मधील अतिक्रमणास ग्रां.प.ला जबाबदार धरून ते पाडण्यात यावे. गट क्रं. ५७ मध्ये दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रास रद्द करण्यात यावे, तसेच गट क्र. ५८ मध्ये तारांच्या कुंपणासाठी ग्रां.प. कडे पैसे नसल्यास गावकऱ्यांनी गोळा करून ते पूर्ण करण्यासाठी सहमती दर्शविली. (तालुका प्रतिनिधी)