शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे त्रिस्तरीय आंदोलन

By admin | Updated: August 24, 2014 23:35 IST

राज्य शासनाने आॅगस्ट २०१३ पासून किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यापासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व सबंधित अधिकाऱ्यांवर

गोंदिया : राज्य शासनाने आॅगस्ट २०१३ पासून किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यापासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व सबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करणे व सेवाशर्तीच्या अंमलबजावणीच्या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतचे कर्मचारी त्रिस्तरीय आंदोलन करणार आहेत. सदर आंदोलनाचा निर्णय जिल्हा महासंघाच्या श्रीकिशन उके यांच्या अध्यक्षतेखाली गोंदियात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. सदर बैठकीत राज्य महासंघाचे सचिव मिलिंद गणवीर यांनी सांगितले की, सुधारित किमान वेतन सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत ग्राम विकास मंत्रालयाने आदेश दिले आहे. तसेच त्यावर अंमल न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही आहेत. मात्र बहुतांश ग्रामपंचायती या शासन निर्णयाचे उल्लंघन करीत आहेत. याकरिता जबाबदार विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या कर्तव्याचे पालन करताना दिसत नाही, असे ते म्हणाले. मिलिंद गणवीर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मागील १४ महिन्यांत जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या कर्मचाऱ्यांचे मोर्चे, धरणे झाले. त्यानंतर १० फेब्रुवारी २०१४ पासून १९ फेब्रुवारी २०१४ पर्यंत गोंदिया जिल्हा परिषदेवर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. याच काळात जिल्हा परिषदेने पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतीना सूचना दिल्या. मात्र यातही जिल्हा परिषदेने केवळ कागदी घोडे सोडल्याखेरीज काहीच केले नाही. या प्रकारामुळे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरत आहे. ग्रामपंचायतला पुरेसी आवक नाही, अनुदान मिळणार तेव्हा देणार, आपल्या मर्जीने देणार तसेच देणार किंवा नाही हे आम्हीच ठरवणार, अशा प्रकारचे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे. याचाच अर्थ आपल्या संघटन शक्तीचा वापर लहान कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्याकरिता करीत असल्याचे दिसून येते. शासन लोकसंख्येच्या आधारावर परिमंडळ एकच्या ग्रामपंचायतीला ५० टक्के, परिमंडळ दोनच्या ग्रामपंचायतीला ७५ टक्के व परिमंडळ तीनच्या ग्रामपंचायतीला कर्मचाऱ्यांच्या वेतनावर १०० टक्के अनुदान शासनातर्फे दिले जाईल. त्यामुळे महासंघाने वेतन न देणाऱ्या ग्रामपंचायतीवर धरणे आंदोनल करणे, त्यानंतर पंचायत समित्यांवर व अखेरच्या टप्यात संप तसेच जिल्हा परिषदेवर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलनाचे कार्यक्रम ठरविण्यासाठी २८ आॅगस्ट रोजी गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली येथे, ३० आॅगस्ट रोजी गोंदिया तालुक्यातील कामठा येथे, ३ सप्टेंबर रोजी अर्जुनी/मोरगाव येथे, ६ सप्टेंबर रोजी तिरोडा व सडक/अर्जुनी येथे ८ सप्टेंबर रोजी, सालेकसा येथे ९ सप्टेंबर रोजी, आमगांव व देवरी येथे ११ सप्टेंबर रोजी तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये संबंधितांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ग्रामपंचायत महासंघाचे सचिव मिलिंद गणवीर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)