शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

By admin | Updated: August 17, 2015 01:40 IST

हिशोब न सादर न केल्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा विरोध करीत ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.

पांढरी येथील घटना : ग्रामविकास अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार पांढरी : हिशोब न सादर न केल्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा विरोध करीत ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. स्वातंत्र दिनी आयोजित ग्रामसभेत हा प्रकार घडला असून ग्रामविकास अधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. प्रत्येक गावात १५ आॅगस्ट रोजी आमसभेचे आयोजन केले जात असून त्यामध्ये नवीन कामांची रुपरेखा आखली जाऊन तंटामुक्त समितीसह अन्य समित्यांची निवड केली जाते. त्यानुसार येथील सभा सुरू असताना गावकऱ्यांनी येथील ग्रामविकास अधिकारी एम.एस. रामटेके यांना मे महिन्याची ग्रामसभा न झाल्यामुळे मागील हिशेब मागितला. परंतु रामटेके यांनी हिशेब न दिल्यामुळे ग्रामवासीयांनी कुठे तरी भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करून त्यांना सर्व दस्तावेज सादर करण्यास सांगितले. परंतु त्यांनी दस्तावेज सादर न केल्याने गावकऱ्यांनी सरपंच अनिल मेंढे व संपर्क अधिकारी एन.जे. रहांगडाले यांच्या समोर ग्रामसभेची प्रोसिडींग लिहून घेतली. तसेच समस्त गावकरी व पोलीस पाटील उत्तम कोटांगले, यादोराव मदनकर यांच्या समक्ष सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या खोलीला कुलूप ठोकले. ग्रामविकास अधिकारी रामटेके यांच्याकडे डुंडा व पांढरी ग्रामपंचायतचा कारभार असून ठरलेल्या दिवशी ग्रा.पं. कार्यालयात ते हजर राहत नाही. त्यामुळे जनतेला दाखल्याकरिता भटकंती करावी लागते. ग्रामसभेत झालेला ठराव पंचायत समितीला पाठवित नसल्याने गावामध्ये विकासाची कामे होत नाही. झालेल्या कामाचे बिल कंत्राटदाराला देत असून कॅशबुकवर लिहले जात नाही. असा भोंगळ कारभार सुरू असून त्यांची तक्रार खंडविकास अधिकारी रामदास धांडे यांना दिली असता तेही रामटेके यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात तक्रार दिली. मात्र त्यांनी सुध्दा कसलीही कारवाई न केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे आठ दिवसापूर्वी पांढरी व डुंडा ग्रामपंचायतचे आॅडीट झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी आॅडीट कशाप्रकारे केले याची चौकशी व्हावी, मागील पाच वर्षांचा हिशेब देण्यात यावा तसेच रामटेके यांना पांढरी व डुंडा ग्राम पंचायत मधून काढण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा खंडविकास अधिकारी यांच्या समक्ष करण्यात यावी, ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी द्यावे. अशा प्रकारे सदर आमसभेची प्रोसिडींग ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊन त्यांच्या खोलीला गावकरी, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील व ग्रामपंचायतचे अधिकारी यांच्या समक्ष कुलूप लावण्यात आले. रामटेके यांची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे तरी चौकशी करून कारवाईची मागणी समस्त गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)