शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

महामंडळावर कृपा अन् फेडरेशनवर अवकृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने यंदा ४ नोव्हेंबरपासून एकूण ९८ शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीला सुरूवात केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेनशनच्या एकूण ६४ केंद्रावर आत्तापर्यंत एकूण २ लाख ९० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाच्या ३४ केंद्रावरुन १ लाख ५ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे.

ठळक मुद्दे५३ कोटी रुपयांचे चुकारे थकले : १० हजार शेतकऱ्यांची पायपीट, फेडरेशनला यंदा अ‍ॅडव्हांस नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केली जाते.यंदा खरेदी केंद्र सुरू झाले तरी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला खरेदीसाठी अ‍ॅडव्हांस व खरेदी केलेल्या धानाचे चुकारे करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. परिणामी ५३ कोटी रुपयांचे चुकारे थकले असून शेतकरी अडचणीत आले आहे. शासनाने आदिवासी विकास महामंडळाला ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे शासनाची महामंडळावर कृपा आणि फेडरेशनवर अवकृपा असल्याचे चित्र आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने यंदा ४ नोव्हेंबरपासून एकूण ९८ शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीला सुरूवात केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेनशनच्या एकूण ६४ केंद्रावर आत्तापर्यंत एकूण २ लाख ९० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. तर आदिवासी विकास महामंडळाच्या ३४ केंद्रावरुन १ लाख ५ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे.महामंडळाने खरेदी केलेल्या एकूण धानापैकी आतापर्यंत ४३७ शेतकऱ्यांना २ कोटी ५७ लाख रुपयांचे चुकारे केले आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांचे चुकारे जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी महामंडळाला शासनाने ७ कोटी रुपयांचा निधी सुरूवातीलाच उपलब्ध करुन दिला. मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची परिस्थिती नेमकी या विरुध्द आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला दरवर्षी शासनाकडून खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वी अ‍ॅडव्हांसमध्ये निधी उपलब्ध करुन दिला जातो. मात्र यंदा खरेदी केंद्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही अ‍ॅडव्हांस देण्यात आला नाही.फेडरेशनच्या सर्व ६६ खरेदी केंद्रावरुन आतापर्यंत एकूण २ लाख ९० हजार ८७७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. ९ हजार ८२५ शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या एकूण धानाची किमत ५२ कोटी ७९ लाख ४४ हजार रुपये आहे. फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी वांरवार मुंबई येथे जाऊन चुकारे करण्यासाठी निधीची मागणी केली. मात्र अद्यापही चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.अनेक शेतकऱ्यांनी गरजेपोटी आणि उधार उसनवारीची परतफेड करण्यासाठी त्वरीत धानाची विक्री केली. मात्र त्यांना महिनाभरापासून चुकारे मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशाराशासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धान खरेदी केली जात असल्याने १० हजारावर शेतकºयांनी धानाची विक्री केली. मात्र आता महिना लोटूनही आणि वांरवार शासकीय धान खरेदी केंद्राच्या पायऱ्या झिजवून सुध्दा चुकारे मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले असून त्यांच्यात असंतोष वाढत आहे. येत्या आठ दिवसात चुकारे न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.निधी न मिळण्याचे कारण अस्पष्टमागील महिनाभरापासून शेतकऱ्यांचे ५२ कोटी रुपयांहून अधिक धानाचे चुकारे थकले आहे. ही परिस्थिती केवळ गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील इतरही जिल्ह्यात आहे. फेडरेशनचे अधिकारी वांरवार मुंबई येथे जात आहे. मात्र त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. चुकारे देण्यास विलंब होण्याचे नेमके कारण सांगितले जात नसल्याने सरकारची तिजोरी रिकामी झाल्याचे बोलले जात आहे.शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या दारातशासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करुन सुध्दा महिना महिनाभर चुकारे मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रती क्विंटलमागे ४०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र त्यांची गरज भागत असल्याने त्यांची सुध्दा तक्रार नसल्याचे चित्र आहे.खरेदीवर होणार परिणामऐन खरीप हंगामातील धान खरेदीला सुरूवात झाली असताना सुरुवातीपासूनच चुकारे आणि बारदान्याची अडचण भासत आहे. त्यामुळे शेतकरी सुध्दा त्रस्त झाले असून त्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर जाणे टाळले आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदीवर परिणाम होत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्ड