शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

शाळा बंद करण्याचा शासनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:52 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळा आणि शिक्षकांचा समस्या प्रलंबित असताना कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा घाट शासनाने रचला आहे.

ठळक मुद्देसमितीचा आंदोलना इशारा : अधीक्षकाला दिले मागण्यांचे निवेदन

ऑनलाईन लोकमतगोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळा आणि शिक्षकांचा समस्या प्रलंबित असताना कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा घाट शासनाने रचला आहे. असा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केला आहे. विविध मागण्यांचे निवेदन सोमवारी (दि.५) मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक करमरकर यांना देण्यात आले.या वेळी दिलेल्या निवेदनातून कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा. मोफत गणवेश वाटपातील अटीशर्ती न्यायसंगत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात बालपणापासून भेदभाव व पक्षपाताची भावना निर्माण होते. त्यामुळे मुलीप्रमाणे मुलांनाही मोफत गणवेश योजनेत समावेश करावा. १९८२ मधील मूळ पेंशन योजना व भविष्य निर्वाह योजना लागू करावी. सर्व शिक्षकांना एमएससीआयटी अहर्ताधारक करण्याची मुदत २०१८ पर्यंत वाढवून द्यावी. शिक्षकांना आॅनलाईन कामातून मुक्त करावे. शाळेत केंद्र स्तरावर डाटा एन्ट्री आॅपरेटर व सर्व सुविधा देण्यात याव्या आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.या वेळी शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, उपाध्यक्ष सुरेश कश्यप, विनोद बडोले, तालुका सचिव विनोद बहेकार, संदीप मेश्राम, संगणक व्ही.जी. राठोड, पी.बी. सर्याम, जी.एम. बैस, टी.झेड. नंदेश्वर, अविनाश नेवारे, रोशन मस्करे, अनूप नागपुरे, रंगारी, पठान आदी उपस्थित होते.