शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शासन म्हणते, दिव्यांगांनो ६०० रुपयात भागवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:05 IST

वाढती महागाई आणि खर्चामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. तर शासन दिव्यांगाना मागील १५ वर्षांपासून दर महिन्याला सहाशे रुपये मानधन देत आहे.

ठळक मुद्दे१५ वर्षांपासून मानधनात वाढ नाही : दिव्यांगानी मांडल्या व्यथा

ऑनलाईन लोकमतगोंदिया : वाढती महागाई आणि खर्चामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. तर शासन दिव्यांगाना मागील १५ वर्षांपासून दर महिन्याला सहाशे रुपये मानधन देत आहे. दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करा, अशी आमची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र शासनाने यात वाढ न करता तेवढ्यातच भागवा असे सांगत आहे. सहाशे रुपयात भागावयाचे कसे ते शासनानेच आम्हाला सांगावे, असा सवाल दिव्यांगानी मंगळवारी (दि.१३) लोकमत कार्यालयात आयोजित लोकमत परिचर्चेत उपस्थित केला.जिल्ह्यात २५ हजारावर दिव्यांग आहेत. दिव्यांगाना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी अपंग कल्याणकारी संघटनेच्या नेतृत्त्वात त्यांचा लढा सुरू आहे.मंगळवारी या संघटनेचे दिनेश पटले, आकाश मेश्राम, श्यामसुंदर बन्सोड, सहेबाज शेख, दुर्गेश जावलकर, रुमन मरस्कोल्हे, संजय घारपिंडे यांनी लोकमत कार्यालयात पोहचून परिचर्चेत त्यांच्या समस्यांचा पाढा वाचला. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच दिव्यांगाना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात, ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. यासाठी शासनाने सर्वच विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थाना ३ टक्के निधी राखीव ठेवून तो त्यांच्यासाठी खर्च करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय विभागाकडून तो खर्च केला जात नसल्याचे मेश्राम यांनी सांगितले.संजय गांधी निराधार योजनेतंर्गत दिव्यांगाना दर महिन्याला ६०० रुपये मानधन दिले जाते. मात्र एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती दिव्यांग असल्यास त्या दोघांही मिळून केवळ ९०० रुपये मानधन दिले जाते. हा दिव्यांगावर एकप्रकारचा अन्याय आहे. एकाच कुटुंबातील दोन जण नोकरीवर असल्यास त्या दोघांना स्वतंत्र वेतन न देता एकाचे वेतन दिले तर चालेल का? जो न्याय सरकारी कर्मचाºयांना दिला जातो तोच आम्हाला का लागू नाही. दिव्यांगाचा मुलगा २५ वर्षांचा झाल्यानंतर त्यांचे मानधन बंद केले जाते. मग आम्ही आमच्या वृध्दपकाळात जगायचे कसे, मानधनात वाढ करणे तर दूरच उलट त्यात कपात करुन दिव्यांगाचा सन्मानाने जगण्याचा हक्क सुध्दा शासन हिरावून घेत असल्याचे पटले म्हणाले. दिव्यांगाचा वेगळा विभाग स्थापन करुन यातंर्गत सर्व योजना राबवा, ३ टक्के निधी खर्च न करणाºया विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थावर कारवाही करा, शासकीय रुग्णालयात दिव्यांगासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करुन आठवड्यातून दोन दिवस प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे. रोजगारासाठी सुलभपणे कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी दिव्यांगानी या वेळी केली.घरकुल योजनेपासून डावललेसर्वच शासकीय योजनांचा लाभ देताना दिव्यांगाना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. मात्र यानंतरही शासनानेतर्फे राबविल्या जाणाºया घरकुल योजनेचा ३ टक्के लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना दिला जात नाही. पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन दिव्यांगाना योजनेपासून वंचित ठेवतात. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी केली.