शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सरकारने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:36 IST

लोकसभा निवडणुकीला घेऊन भाजप सरकारने धानाला २०० रूपयांची वाढ दिली. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाकडून नेहमीच धानाला तीन हजार रूपये क्विंटल भाव देण्याची मागणी केली जात होती. मात्र स्वत:चे सरकार आल्यानंतर त्यांना याचा विसर पडला आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : जब्बारटोला येथे गॅस कनेक्शन वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीला घेऊन भाजप सरकारने धानाला २०० रूपयांची वाढ दिली. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाकडून नेहमीच धानाला तीन हजार रूपये क्विंटल भाव देण्याची मागणी केली जात होती. मात्र स्वत:चे सरकार आल्यानंतर त्यांना याचा विसर पडला आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांनी १३ हजार ५०० ते १८ हजार रूपयांची एकरी भरपाई दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याची पोस्टरबाजी केली. मात्र शेतकºयांनी केवळ एक हजार ते पंधराशे रूपयांची भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करीत असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल म्हणाले.तालुक्यातील ग्राम जब्बारटोला येथे आयोजीत गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना पंचायत समिती सभपती माधुरी हरिणखेडे यांनी, भाजप सरकारने मोठ मोठ्या योजनांची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली नाही. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना दोन वर्षांपासून अनुदान मिळाले नसून कित्येकांच्या घरांचे बांधकाम बंद पडले आहे. गोंदिया तालुक्यात सुमारे सहा हजार लाभार्थी असून त्यांच्या घरांचे काम अडकले असल्याचे त्यांनी सांगीतले.याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, चमन बिसेन, प्रकाश डहाट, रमेश लिल्हारे, बंडू शेंडे, वत्सला चिखलोंडे, सेवक चिखलोंडे, निलिमा शहारे, दयावंती सोनवाने, मिनाक्षी वैद्य, सुप्रिया उंदीरमारे, वनमाला शहारे, महेश रहांगडाले, भय्यालाल चिखलोंडे, थामनलाल लिल्हारे, भेजेंद्र जैतवार यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.सभामंडप व रस्ता बांधकामाचे भूमिपूजनगॅस कनेक्श वाटप कार्यक्रमांतर्गत आमदार अग्रवाल यांच्या हस्ते ग्राम जब्बारटोला येथील २१ लाभार्थ्याना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. तर सोबतच सहा लाख रूपयांच्या निधीतून मंजूर दुर्गा मंदिरातील सभामंडप व गावातील अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालFarmerशेतकरी