शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

हवामान बदलामुळे शासकीय रुग्णालये ‘हाऊसफुल’

By admin | Updated: July 15, 2014 00:03 IST

पावसाळयाच्या दिवसात प्रत्येक वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी निर्जतुकीकरण करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली जाते. मात्र काही दिवस याकडे लक्ष दिले जाते. त्यानंतर पाण्याच्या शुध्दीकरणाकडे कोणाचेच

गोंदिया : पावसाळयाच्या दिवसात प्रत्येक वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी निर्जतुकीकरण करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली जाते. मात्र काही दिवस याकडे लक्ष दिले जाते. त्यानंतर पाण्याच्या शुध्दीकरणाकडे कोणाचेच लक्ष नसते. यामुळे या कालावधीत अनेक प्रकारचे आजार उदभवतात. सध्या तर पावसाळयाचे दिवस सुरू असूनही विहीर व बोअरवेलमधून ग्रामीण भागासह शहरातही अशुध्द पाणी पुरवठा केला जातो.यामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वातावरणात दररोज बदल घडून येत आहे. यामुळे कधी मोठ्या प्रमाणात उष्ण वातावरणाचा फटका तर कधी पाऊस पडताच थंडावा, या हवामानाच्या बदलामुळे ताप, हिवताप, गॅस्ट्रो अशा विविध प्रकारच्या आजारात वाढ झाली आहे. या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याने खाजगी व शासकीय रुग्णालये गर्दीने हाऊसफुल्ल असल्याचे चित्र सगळीकडेच दिसून येत आहे. ग्रामीण भागात शेतकरी सध्या पेरण्याच्या कामात गुंतला आहे. यामुळे आपले कार्य लवकर पूर्ण कसे करता येईल या उद्देशाने उन्ह-पावसाची तमा न राखता दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतात. यामुळे सर्वसाधारण आजारचे बळी ठरतात. दिवसभराचा उकाडा व उष्णतेनेही कहरच केला असल्याने हा हवामान प्रत्येकालाच मानवणारा नसतो. काही दिवस अचानक पावसाचे आगमन झाले की, हवामानात पूर्णत: बदल होऊन दैनंदिन चक्रच बदलते. यामुळे रुग्णांच्या संख्येत पावसाळा लागताच वाढ झाल्याचे दिसते. यावर्षी कधी पाऊस कधी उन्ह असते. यामुळे नविन पाणी विहीरी व तलावात काही प्रमाणात साचले गेले. यामुळे तलावांचे स्त्रोत ज्या विहीरींना आहे. त्या तलावात पावसाच्या पहिल्याच पाण्याने रस्त्यावरील व नाल्यावरील दुुर्गंधी घाण वाहून जाते. हे पाणी ज्या जलस्त्रोताला मिळते ते पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्या पाण्याचा पिण्यासाठी वापरही केला जात आहे. अनेक प्रकारचे रोग पुढे येतात. यामुळे सुध्दा रुग्णांच्या संख्येत वाढ होते. ग्रामीण भागात काही ठिकाणी आरोग्य केंद्र नसल्यामुळे खाजगी डॉक्टरांच्या व्यवसायात वाढ झाल्याचे दिसते. खाजगी डॉक्टरांच्या व्यवसायात वाढ झाल्याचे दिसते. खाजगी डॉक्टर ग्रामीण भागात वाजवीपेक्षा जास्त शुल्क रुग्णाकडून वसूल करीत असतात. आजार त्वरीत बरा व्हावा या उद्देशाने वेळेचा विचार न करता रुग्णांना आकारलेली शुल्क द्यावी लागते. यामुळे काही रुग्ण शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतांना दिसतात. कमी दामात आपली चांगली सेवा केली जाईल. या अपेक्षेने शासकीय व रुग्णालयातही रुग्णांची संख् या मोठ्या प्रमाणात दिसते. ऐन पावसाळयात आर्द्रा नक्षत्रातच पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. यामुळे ताप, हिवताप, गॅस्ट्रो अशा अनेक प्रकारच्या व्याधींना नागरिकांना घेरलेले आहे. चिंतातूर शेतकऱ्यांची चिंताही आजाराला आमंत्रण देत आहे. पावसाळा लागताच अनेक प्रकारची जीव-जंतू दिसून येतात. त्याच्याही प्रकोपाने आजार संभवतात. खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णांची तोबा गर्दी दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)