शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

शेती पडीक असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:20 IST

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुुलनेत फार कमी पाऊस झाला. तर ऐन रोवणीच्या कालावधीत पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातीेल अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केलीे नव्हती. परिणामी जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टर शेती पडीक राहिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये रोष : पावसाअभावी ५५ हजार हेक्टर शेतीत रोवणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुुलनेत फार कमी पाऊस झाला. तर ऐन रोवणीच्या कालावधीत पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातीेल अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केलीे नव्हती. परिणामी जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टर शेती पडीक राहिली. धानाचे पऱ्हे आणि मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च सुध्दा निघाला नाही. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक कोंडी झाली. मात्र या शेतकºयांना अद्यापही शासनाने कुठली नुकसान भरपाई दिली त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.२०१७ चे खरीप हंगामात संपूर्ण जिल्ह्यात सरासरीच्या निम्मा पाऊस झाल्याने नर्सरी टाकून मशागत केलेली सुमारे ५५ हजार हेक्टर शेतीत रोवणीच झाली नाही. यात आमगाव तालुक्यातील चारही महसूल मंडळात २१३७ हेक्टर, सालेकसा तालुक्यातील ३ महसूल मंडळात १ हजार ८६ हेक्टर, गोरेगाव तालुक्यातील ३ महसूल मंडळात १० हजार ८३० हेक्टर, गोंदिया तालुक्यातील ७ महसूल मंडळात १४ हजार ६९२ हेक्टर, देवरी तालुक्यातील ३ महसूल मंडळातील ९ हजार १७२ हेक्टर, सडक-अर्जुनी तालुक्यातील ३ महसूल मंडळात २ हजार ८१४ हेक्टर, तिरोडा तालुक्यातील ४ महसूल मंडळातील १२ हजार ३०२ हेक्टर, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४ महसूल मंडळातील बोंडगावदेवी २४१ हेक्टर अशी सुमारे ५५ हजार हेक्टर शेत जमीन पडीक राहीली.सुरूवातीला बºयापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रोवणी करण्यासाठी धानाचे पºहे टाकले होते. तसेच हवामान विभागाने सुध्दा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. महागडे बियाणेही वापरुन शेतीची मशागत केली होती. मात्र पावसाअभावी रोवणीच न झाल्याने बियाणाचा खर्च, मशागतीच्या खर्चाचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसला. मागील दोन तीन वर्षांपासून कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला तोंड देणाºया शेतकऱ्यांना मागीलवर्षी पावसाअभावी शेती पडीक ठेवावी लागल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले.याचा अहवाल सुध्दा कृषी विभागाने शासनाला पाठविला होता. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही शेतकºयांना कुठलीच आर्थिक मदत देण्यात आली नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून हीच का सरकारची शेतकºयांप्रती संवेदनशिलता असा सवाल उपस्थित केला जात आहे.पीक विम्याच्या लाभापासून वंचितपावसाअभावी रोवणी न करणाऱ्या बहुतेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक काढला होता. मात्र त्याचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला नाही.केवळ तिरोडा तालुक्यातील वडेगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. तर उर्वरित ३० महसूल मंडळातील एकाही शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे पीक विम्याच्या हप्त्याचा भुर्दंड शेतकºयांना बसला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती