शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

दुष्काळावर शासन- प्रशासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:08 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने यावर उपाययोजना करुन शेतकºयांना मदत करावी, या हेतूने जि.प. सभागृहात मागील अनेक सभांमध्ये सर्व बाजूच्या सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.

ठळक मुद्देधानशेती पडिक : जि.प. सदस्य परशुरामकर यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने यावर उपाययोजना करुन शेतकºयांना मदत करावी, या हेतूने जि.प. सभागृहात मागील अनेक सभांमध्ये सर्व बाजूच्या सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. दुष्काळी परिस्थितीबाबद सरकारला अवगत करण्याचा ठराव पारित करण्यात आला. मात्र अद्यापही यावर कार्यवाही न झाल्याने दुष्काळी परिस्थितीबाबत शासन-प्रशासन उदासिन असल्याचा आरोप जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केला आहे.मागील १० आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. यात तातडीने शासनाला दुष्काळी परिस्थितीबाबत अवगत करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. पण सर्वसाधारण सभेला एक महिना होऊनही सभेच्या कार्यवाहीची अवतरण प्रत तयारच झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावरुन जि.प. पदाधिकारी व प्रशासन किती गंभीर आहे, हे दिसून येत आहे. शेतकºयांशी यांना काहीही देणेघेणे नाही, असेच दिसून येत असल्याचा आरोप जि.प. सदस्य परशुरामकर यांनी केला आहे.जिल्ह्यातील संपूर्ण अर्थकारण शेतकरी पिकवित असलेल्या धानावर अवलंबून आहे. पण धान पिकास लागणारा पाऊसच झाला नसल्याने जिल्ह्यात बहुतांश धान शेती पडीक आहे. या पडीक शेतीमध्ये पाऊस येईल, या हेतूने शेतकºयांनी महागडे वाण व शेतीची मशागत करुन त्यावर मोठा खर्च केलेला आहे. पण पाऊसच न झाल्याने शेतकºयांचा सर्व खर्च व्यर्थ गेला आहे. जी काही रोवणी झाली तीसुध्दा सुध्दा टिकून राहील की नाही याची शेतकºयांना खात्री देता येत नाही.जि.प. सभागृहात ५३ सदस्य असून सर्व शेतकºयांनी पोर, सुना, कुणी स्वत:ला शेती कसणारे समजणारे आहेत. मागील जुलै महिन्यापासून पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने प्रत्येक स्थायी समितीच्या सभेत व १० आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा घडवून आणण्यात आली. सर्व पक्ष्याच्या सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन दुष्काळी परिस्थितीवरील ठरावाचे समर्थन केले. सभागृहात झालेल्या चर्चेबाबत ठराव पारित झाला तर त्याची अवतरण प्रत तयार करुन शासनास तातडीने पाठवणे गरजेचे असते. जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीची शासनास माहिती होणे गरजेचे आहे. मात्र गोंदिया जिल्हा परिषद याला अपवाद आहे.१० आॅगस्टला ठराव होऊनही त्या ठरावाची अवतरण प्रत शासनाला अजूनपर्यंत पाठविण्यात आलेली नाही. यावरुन जि.प. सभागृहात सर्व आकडेवारीसह चर्चा करुनही काहीही फरक पडत नाही. याबाबत संबंधित विभागाला विचारणा केली असता आम्ही अवतरण प्रत तयार करुन अध्यक्ष यांच्या सहीसाठी पाठवले, पण अध्यक्षांची सही झाली नसल्याने शासनास माहिती पाठवता आलेली नाही, असे संबंधित विभागाचे म्हणणे आहे. जेव्हा दोन दिवसांच्या आत शासनाला सूचित करण्याचे सभागृहात ठरले होते, मात्र अद्यापपर्यंत सूचित करण्यात आले नाही. यावरुन जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी यांना शेतकºयांवर ओढवलेल्या संकटाशी काही घेणेदेणे नाही, त्यांच्या दु:खाची उपेक्षाच केले जात आहे, असा आरोप परशुरामकर यांनी केला आहे.