शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

सरकार शेतकºयांची फसवणूक करीत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:05 IST

सरकार कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची फसवणूक करीत आहे. कधी नोटबंदी, पीक विमा अशा उपक्रमातून सामान्य जनतेला त्रास देण्याचे काम करित आहे.

ठळक मुद्देविजय शिवणकर : दुष्काळ घोषित करण्याचा एकमताने ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : सरकार कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची फसवणूक करीत आहे. कधी नोटबंदी, पीक विमा अशा उपक्रमातून सामान्य जनतेला त्रास देण्याचे काम करित आहे. सरकार जनतेचे कामे करित नसेल तर अशा सरकारला धडा शिकविण्याची जबाबदारी राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते विजय शिवणकर यांनी केले.ग्राम बनगाव येथील सरस्वती विद्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्टÑवादी काँग़्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष मनोहर चंद्रीकापुरे, जि.प. सदस्य सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती, कृउबासचे माजी सभापती टिकाराम मेंढे, महिला आघाडीच्या अध्यक्ष कविता रहांगडाले, माजी जि.प. सदस्य उषा हर्षे, महिला महासचिव संगीता दोनोडे, पं.स.सदस्य प्रमोद शिवणकर, सिंधू भूते, तिरथ येटरे, महासचिव लक्ष्मी येळे, निखील पशिने, सरपंच संगीता ब्राम्हणकर, सुधा शहारे, सुनीता रहांगडाले, संगीता भांडारकर, बाबूलाल दोनोडे, प्राचार्य कमलबापू बहेकार, रविंद्र मेश्राम, विनोद कुन्नमूवार, बेनीश्वर कटरे, सिताराम फुंडे, सुरेंद्र कोटांगले, मुक्तानंद पटले, कल्पना बावनथडे, पुष्पा चौधरी, विनोद बोरकर, जनार्धन शिंगाडे, संजय मुनेश्वर, रवी क्षीरसागर, टुंडीलाल कटरे, दिनदयाल चौरागडे, तुलेंद्र कटरे, रमन डेकाटे उपस्थित होते.याप्रसंगी हर्षे यांनी, सत्ता परिवर्तन कराल तरच सामान्यांचे दिवस येतील. केवळ राष्टÑवादीचे कार्यकर्ते हे राष्टÑीय कार्यकर्ते आहेत. त्यांनी निवडणुकीपुरते मर्यादित न राहता समाज कार्यात भाग घ्यावा असे आवाहन केले. चंद्रीकापुरे यांनी, महराष्टÑातच नव्हे तर संपूर्ण देशात शेतकºयांचे खच्चीकरण केले जात आहे. पिक विमाच्या फक्त देखावा व कागांवा करण्यात आला. त्याचे फलस्वरुप शेतकºयांना मिळाले नाही आणि मिळणार देखील नाही. सरकार व रिलायंन्सने फसवेगिरी केली आहे. आॅफलाईन अर्ज आजही जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. त्याचे काय, सरकारने उत्तर दयावे असे मत व्यक्त केले.यावेळी ग्राम पंचायत निवडणूक, बेरोजगाराचे प्रश्न, शेतकºयांचे प्रश्न, दुष्काळ, कृषीमालाला रास्त भाव मिळावा तसेच सरकार धोरणाविरोधात आंदोलनाची चर्चा करण्यात आली. तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार यांनी दुष्काळ घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला तो पारित करण्यात आला. संचालन महासचिव देवेंद्र मच्छिरके यांनी केले. आभार कमल बहेकार यांनी मानले. कार्यक्रमासाठी विजय रगडे, राजू फुंडे, मेघश्याम मेंढे, लक्ष्मण हत्तीमारे, भरत येटरे, राहूल रगडे, प्रकाश फुंडे, विजय भांडारकर, संजय रावत, पुरुषोत्तम चुटे, संतोष श्रीखंडे, विजय मुनेश्वर, प्रशांत गायधने आदिंनी सहकार्य केले.

भाजप-सेना कार्यकर्त्यांचा प्रवेशया सभेत ग्राम करंजी येथील परसराम लांजेवार, जितेंद्र लांजेवार, संतोष लांजेवार, राजेश लांजेवार, राजाराम लांजेवार, शालीकराम लांजेवार सह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप व शिवसेनेतून राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान पक्षाची तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.