शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सरकार शेतकºयांची फसवणूक करीत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:05 IST

सरकार कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची फसवणूक करीत आहे. कधी नोटबंदी, पीक विमा अशा उपक्रमातून सामान्य जनतेला त्रास देण्याचे काम करित आहे.

ठळक मुद्देविजय शिवणकर : दुष्काळ घोषित करण्याचा एकमताने ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : सरकार कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची फसवणूक करीत आहे. कधी नोटबंदी, पीक विमा अशा उपक्रमातून सामान्य जनतेला त्रास देण्याचे काम करित आहे. सरकार जनतेचे कामे करित नसेल तर अशा सरकारला धडा शिकविण्याची जबाबदारी राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते विजय शिवणकर यांनी केले.ग्राम बनगाव येथील सरस्वती विद्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्टÑवादी काँग़्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष मनोहर चंद्रीकापुरे, जि.प. सदस्य सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती, कृउबासचे माजी सभापती टिकाराम मेंढे, महिला आघाडीच्या अध्यक्ष कविता रहांगडाले, माजी जि.प. सदस्य उषा हर्षे, महिला महासचिव संगीता दोनोडे, पं.स.सदस्य प्रमोद शिवणकर, सिंधू भूते, तिरथ येटरे, महासचिव लक्ष्मी येळे, निखील पशिने, सरपंच संगीता ब्राम्हणकर, सुधा शहारे, सुनीता रहांगडाले, संगीता भांडारकर, बाबूलाल दोनोडे, प्राचार्य कमलबापू बहेकार, रविंद्र मेश्राम, विनोद कुन्नमूवार, बेनीश्वर कटरे, सिताराम फुंडे, सुरेंद्र कोटांगले, मुक्तानंद पटले, कल्पना बावनथडे, पुष्पा चौधरी, विनोद बोरकर, जनार्धन शिंगाडे, संजय मुनेश्वर, रवी क्षीरसागर, टुंडीलाल कटरे, दिनदयाल चौरागडे, तुलेंद्र कटरे, रमन डेकाटे उपस्थित होते.याप्रसंगी हर्षे यांनी, सत्ता परिवर्तन कराल तरच सामान्यांचे दिवस येतील. केवळ राष्टÑवादीचे कार्यकर्ते हे राष्टÑीय कार्यकर्ते आहेत. त्यांनी निवडणुकीपुरते मर्यादित न राहता समाज कार्यात भाग घ्यावा असे आवाहन केले. चंद्रीकापुरे यांनी, महराष्टÑातच नव्हे तर संपूर्ण देशात शेतकºयांचे खच्चीकरण केले जात आहे. पिक विमाच्या फक्त देखावा व कागांवा करण्यात आला. त्याचे फलस्वरुप शेतकºयांना मिळाले नाही आणि मिळणार देखील नाही. सरकार व रिलायंन्सने फसवेगिरी केली आहे. आॅफलाईन अर्ज आजही जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. त्याचे काय, सरकारने उत्तर दयावे असे मत व्यक्त केले.यावेळी ग्राम पंचायत निवडणूक, बेरोजगाराचे प्रश्न, शेतकºयांचे प्रश्न, दुष्काळ, कृषीमालाला रास्त भाव मिळावा तसेच सरकार धोरणाविरोधात आंदोलनाची चर्चा करण्यात आली. तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार यांनी दुष्काळ घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला तो पारित करण्यात आला. संचालन महासचिव देवेंद्र मच्छिरके यांनी केले. आभार कमल बहेकार यांनी मानले. कार्यक्रमासाठी विजय रगडे, राजू फुंडे, मेघश्याम मेंढे, लक्ष्मण हत्तीमारे, भरत येटरे, राहूल रगडे, प्रकाश फुंडे, विजय भांडारकर, संजय रावत, पुरुषोत्तम चुटे, संतोष श्रीखंडे, विजय मुनेश्वर, प्रशांत गायधने आदिंनी सहकार्य केले.

भाजप-सेना कार्यकर्त्यांचा प्रवेशया सभेत ग्राम करंजी येथील परसराम लांजेवार, जितेंद्र लांजेवार, संतोष लांजेवार, राजेश लांजेवार, राजाराम लांजेवार, शालीकराम लांजेवार सह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप व शिवसेनेतून राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान पक्षाची तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.