शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

गोरेगावातील पाणीपुरवठा योजनेची वाट मोकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:36 IST

गोरेगाव शहराकरिता नव्या पाणी पुरवठा योजनेची वाट मोकळी झाल्याची दिसत आहे. नगर पंचायतच्या स्थापने नंतरच या दिशेने प्रयत्न केले जात होते. मात्र आता नगर पंचायतकडून या संदर्भात एक पत्र महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला देण्यात आले आहे.

ठळक मुद्देनगर पंचायतचे मजिप्राला पत्र : लवकरच एस्टीमेट बनविणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव शहराकरिता नव्या पाणी पुरवठा योजनेची वाट मोकळी झाल्याची दिसत आहे. नगर पंचायतच्या स्थापने नंतरच या दिशेने प्रयत्न केले जात होते. मात्र आता नगर पंचायतकडून या संदर्भात एक पत्र महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला देण्यात आले आहे.गोरेगावला लागून अगोदरचीच एक पाणी पुरवठा योजना सुरू आहे. या योजनेतून गोरेगाव त्याला लागून असलेल्या चार गावांना संयुक्तरित्या पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र ही जुनी व जर्जर झाली आहे. यामुळे नव्या योजनेसाठी कित्येक वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. त्यात गोरेगावला नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर या प्रयत्नांना अधीक जोर दिला जात होता.यासाठी नगर पंचायतकडून प्रस्ताव मंजूर करून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला देणे बंधनकारक होते. त्यानुसार गोरेगाव नगर पंचायतने नुकतेच दोन-तीन दिवसांपूर्वी एक पत्र महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला दिले आहे.त्यानंतर आता एक-दोन दिवसांत महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कडून एक पत्र तयार करून गोरेगाव नगर पंचायतला दिले जाणार आहे. या पत्रात नगर पंचायतकडून एक रक्कम टाकण्याचे आवाहन केले जाणार आहे. ही रक्कम टाकल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांकडन सर्वेक्षणाचे काम सुरू केले जाणार आहे. हे सर्वेक्षण झाल्यानंतर कामाचे एस्टीमेट तयार करून राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे एक प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतरच योजनेच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. आता नवीन पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला कधी मंजुरी मिळते यावर सर्व काही अवलंबून आहे. मात्र योजनेची वाट मोकळी झाल्याने योजना येणार हे स्पष्ट झाले आहे.काय आहे नवीन पाणीपुरवठा योजनेतजुन्या व सध्या सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेत तीन टाक्या बनलेल्या आहेत. या तीन टाक्यांना नवीन योजनेतही कामी आणले जाईल. याशिवाय एक नवी टाकी तयार केली जाईल. नव्या योजनेत गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत येणाºया नवीन वसाहत ज्या जुन्या योजनेत समाविष्ट नाहीत त्यांना जोडले जाईल. याशिवाय पुर्ण पाईप लाईन नव्याने टाकली जाणार. जल शुद्धीकरण केंद्र क्वचीतच स्थापित केले जाईल. जुनी योजना चार गावांसाठी होती, मात्र नवीन योजना फक्त नगर पंचायत अंतर्गत येणाºया गावांसाठी राहणार आहे.नुकतेच पत्र मिळाले आहे. नवीन पाणी पुरवठा योजना तयार केली जाणार असून तसे प्रयत्न सुरू आहेत. गोरेगाववासीयांनी शुद्ध पाणी पुरवठा व्हावा हेच आमचे प्रयत्न आहे.-रोशनी धमगाये , अभियंता, मजिप्रा

टॅग्स :Waterपाणी