शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावातील पाणीपुरवठा योजनेची वाट मोकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:36 IST

गोरेगाव शहराकरिता नव्या पाणी पुरवठा योजनेची वाट मोकळी झाल्याची दिसत आहे. नगर पंचायतच्या स्थापने नंतरच या दिशेने प्रयत्न केले जात होते. मात्र आता नगर पंचायतकडून या संदर्भात एक पत्र महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला देण्यात आले आहे.

ठळक मुद्देनगर पंचायतचे मजिप्राला पत्र : लवकरच एस्टीमेट बनविणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव शहराकरिता नव्या पाणी पुरवठा योजनेची वाट मोकळी झाल्याची दिसत आहे. नगर पंचायतच्या स्थापने नंतरच या दिशेने प्रयत्न केले जात होते. मात्र आता नगर पंचायतकडून या संदर्भात एक पत्र महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला देण्यात आले आहे.गोरेगावला लागून अगोदरचीच एक पाणी पुरवठा योजना सुरू आहे. या योजनेतून गोरेगाव त्याला लागून असलेल्या चार गावांना संयुक्तरित्या पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र ही जुनी व जर्जर झाली आहे. यामुळे नव्या योजनेसाठी कित्येक वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. त्यात गोरेगावला नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर या प्रयत्नांना अधीक जोर दिला जात होता.यासाठी नगर पंचायतकडून प्रस्ताव मंजूर करून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला देणे बंधनकारक होते. त्यानुसार गोरेगाव नगर पंचायतने नुकतेच दोन-तीन दिवसांपूर्वी एक पत्र महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला दिले आहे.त्यानंतर आता एक-दोन दिवसांत महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कडून एक पत्र तयार करून गोरेगाव नगर पंचायतला दिले जाणार आहे. या पत्रात नगर पंचायतकडून एक रक्कम टाकण्याचे आवाहन केले जाणार आहे. ही रक्कम टाकल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांकडन सर्वेक्षणाचे काम सुरू केले जाणार आहे. हे सर्वेक्षण झाल्यानंतर कामाचे एस्टीमेट तयार करून राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे एक प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतरच योजनेच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. आता नवीन पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला कधी मंजुरी मिळते यावर सर्व काही अवलंबून आहे. मात्र योजनेची वाट मोकळी झाल्याने योजना येणार हे स्पष्ट झाले आहे.काय आहे नवीन पाणीपुरवठा योजनेतजुन्या व सध्या सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेत तीन टाक्या बनलेल्या आहेत. या तीन टाक्यांना नवीन योजनेतही कामी आणले जाईल. याशिवाय एक नवी टाकी तयार केली जाईल. नव्या योजनेत गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत येणाºया नवीन वसाहत ज्या जुन्या योजनेत समाविष्ट नाहीत त्यांना जोडले जाईल. याशिवाय पुर्ण पाईप लाईन नव्याने टाकली जाणार. जल शुद्धीकरण केंद्र क्वचीतच स्थापित केले जाईल. जुनी योजना चार गावांसाठी होती, मात्र नवीन योजना फक्त नगर पंचायत अंतर्गत येणाºया गावांसाठी राहणार आहे.नुकतेच पत्र मिळाले आहे. नवीन पाणी पुरवठा योजना तयार केली जाणार असून तसे प्रयत्न सुरू आहेत. गोरेगाववासीयांनी शुद्ध पाणी पुरवठा व्हावा हेच आमचे प्रयत्न आहे.-रोशनी धमगाये , अभियंता, मजिप्रा

टॅग्स :Waterपाणी