शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगाव शहर होणार टँॅकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 21:52 IST

गोरेगाव नगरपंचायतच्या एकूण आठ वार्डात सध्या टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योनजा अपयशी ठरल्यानंतर न.प.ने स्वत: पाणी पुरविण्याचे काम प्रस्तावित केले आहे. त्या दिशेने शहरात सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली. लवकरच नगर पंचायतच्या वतीने शहराला पाणी पुरवठा होणार आहे.

ठळक मुद्देनगरपंचायतने उचलले पाऊल : सर्वेक्षणाला सुरूवात, लवकरच कामाला गती

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गोरेगाव नगरपंचायतच्या एकूण आठ वार्डात सध्या टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योनजा अपयशी ठरल्यानंतर न.प.ने स्वत: पाणी पुरविण्याचे काम प्रस्तावित केले आहे. त्या दिशेने शहरात सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली. लवकरच नगर पंचायतच्या वतीने शहराला पाणी पुरवठा होणार आहे.प्रादेशिक पाणी पुरवठा योजना गेल्या दहा वर्षापासून गोरेगाव शहरात कार्यान्वित आहे. पण वरिष्ठांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला कायमची घरघर लागली. नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळणे, दिवा स्वप्न ठरत असतांना चक्क नगर पंचायतीला स्वत:चे टँकर लावावे लागले. वर्षानू-वर्षापासून फुटलेल्या पाईप लाईन व त्या पाईप लाईन मधून होणारी लाखो लिटर पाण्याची गळती आदी समस्या लक्षात घेत नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी त्यावर मंथन करीत त्यांनी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना नगर पंचायतला हस्तांतरीत करण्याची मागणी केली. त्या दिशेने आता गोरेगाव शहरात पाईप लाईन टाकण्यासाठी सर्वेक्षण सुरु आहे. पाईप लाईनचा अंदाजीत खर्च, शासन दरबारी मांडल्यावर मंजुरी घेण्यात येणार आहे.यासंदर्भात संपूर्ण अहवाल प्रशासनाकडे मांडल्यावर पाणी पुरवठा योजना न.प.ला हस्तांतरीत होणार आहे. गोरेगाव नगर पंचायतची अकरा हजाराच्या जवळपास लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी दहा वर्षापूर्वी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या मोठा गाजावाजा करण्यात आला. घरोघरी नळाचे कनेक्शन देण्यात आले. पण मुबलक पाण्याचा नादात अनेकांनी टुल्लू पंप लावल्याने अनेक ग्राहकांना पाणी मिळण्यापासून वंचित राहावे लागले.पाण्याचा प्रश्न मार्गी लागणारहलबीटोला, श्रीरामपूर या दोन वार्डात जानेवारी महिन्यापासून न.प.ने टॅकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे. या दोन वार्डात प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी नाही त्यामुळे येथे दरवर्षी येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.आठ वार्डात पाणी टंचाईऐन उन्हाळ्यात पाण्याची भिषण टंचाई लक्षात घेत नगरपंचायतने टँकर द्वारेपाणी पुरवठा केला पण कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी न.प.ने ठोस पाऊले उचलीत आहेत. पाणी समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे भविष्यात निदान या वार्डात पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही.गोरेगाव शहरातील प्रमुख आठ वार्डात उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवते.सर्व नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे म्हणून प्रशासनाकडे पाणी पुरवठा योजनेचा खर्च प्रस्तावित करणार आहे. सध्या युध्दपातळीवर काम सुरु आहे. अंदाजपत्रक दाखल केल्यावर प्रशासनाकडून मंजुरी प्राप्त होईल.त्यानंतर पाणी पुरवठा नगरपंचायतच्या माध्यमातून केला जाईल.- आशिष बारेवार, नगराध्यक्ष न.प.गोरेगाव

टॅग्स :water shortageपाणीटंचाई