शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

गोपाला...गोपाला... देवकीनंदन गोपाला...

By admin | Updated: February 28, 2017 01:03 IST

खेडी रोगमुक्त व सुशिक्षित, साक्षर व्हावीत यासाठी ग्रामस्वच्छता अभियान काळाची गरज आहे, ...

जनजागरण : माणिक देशमुख यांनी हुबेहुब साकारले गाडगेबाबांचे कीर्तनसंतोष बुकावन अर्जुनी मोरगावखेडी रोगमुक्त व सुशिक्षित, साक्षर व्हावीत यासाठी ग्रामस्वच्छता अभियान काळाची गरज आहे, हा मूलमंत्र देणाऱ्या वैराग्यमूर्ती गाडगेबाबांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे व्रत अमरावती येथील अभिरूची कला व क्रीडा मंदिरातर्फे ‘क्रांतियोगी गाडगेबाबा’ या एक तासाच्या नाट्य प्रस्तुतीकरणातून स्वीकारून जनजागरण करण्यात आले. शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक बांधकाम मंत्रालयातील उपसिचव फुलचंद मेश्राम यांनी स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ निर्मित व गाडगेबाबा अध्यासन केंद्र अमरावती विद्यापीठाद्वारे प्रायोजित कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.भारत स्वतंत्र होऊन ६९ वर्षे झालीत. आजही खेडी अडाणी-अशिक्षित व अंधश्रद्धाळू आहेत, हे देशाचे दुर्दैव ! प्रगतीला खीळ बसविणाऱ्या या गोष्टींपासून मुक्तता मिळविण्यासाठी सर्वप्रथम खेडी शहरांशी जोडली पाहिजेत. शौचालय, वीज व पाणी या किमान गरजांची पूर्तता व्हायला हवी. तरच खेड्यातील मुलं शहरात शिकून शहाणी होतील. ‘जे आपणांसी ठावे, ते इतरांशी सांगावे,शहाणे करुन सोडावे सकल जना’याप्रमाणे वागतील असे म्हणत त्यांनी हुबेहूब गाडगेबाबा साकारले.विदर्भ संतपरंपरेतील एक अलौकिक व आगळा संत अवतरला. श्रम प्रतिष्ठेचा एक अद्भूत आविष्कार करणार कृषिपूत्र, वैराग्याचा एक अनोखा अवतार, ज्ञानगंगेचा शोध घेणारा एक मुक्तात्मा, ऋण काढून सण साजरा करु नका म्हणून सांगण्यासाठी आपला संसार उधळणारा एक मुसाफिर, लोकसेवक म्हणजे काय? याचा कृतीतून आदर्श देणारा एक महापुरुष, अनाथ अपंगाचा आधार, भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, बेघरांना घर मागणारा धर्मात्मा, अंधश्रद्धेला ठाम विरोध करणारा सश्रद्ध ज्ञानयोगी, जातीभेदाची कोळिष्टके, जळमटे, झुगारणारा क्रांतियोगी द्रष्टा सन्यासी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणून समाजप्रबोधन करणारा एक लोकसंग्राहक अशा अनेकविध उपाध्यांनी ओळखले जाणारे संत गाडगेबाबा. त्यांनी त्यावेळी दिलेला दृष्टांत आजही आधुनिक युगात लागू पडतो, नव्हे तर त्यांच्या कार्याची शिकवण या वैज्ञानिक युगाच्या पिढीला महाराष्ट्र शासनाद्वारे दिली जाते. त्यांचे तत्कालीन उपक्रम आज शासनाला राबवावे लागतात. असा हा वऱ्हाडातल्या शेंडगावचा देविदास व दापुऱ्याचा डेबू कर्मयोगी म्हणून ओळखला जातो. आपला संसार व घरदार सोडून माणसातील ईश्वर जागवण्यासाठी त्याने जीवाचे रान केले. त्यांच्यासोबत केवळ तुकारामांची अभंगवाणी व कबीराची वाणी होती. अपार कष्ट करण्याची तत्परता व प्रचंड सहनशीलतेच्या बळावर तो क्रांतियोगी बनला. डोक्यावर खापरं, अंगावर बावला वेष, हातात काठी आणि दुसऱ्या हातात खराटा आणि मुखात गोपाला...गोपाला... देवकीनंदन गोपाला...चा जयघोष करणारा डेबू गाडगेबाबा झाला. ते आपल्या कीर्तनातून सांगतात.‘कर्ज काढून देवाची यात्रा करू नकागाई-बैलांची चिंता वाहात जामुलांना शिकविल्याविना राहू नकादेवाला नवस करून कोंबडी-बकरी मारु नकाआई-बापांची सेवा कराकर्ज काढून दिवसवारे करू नकाशिवाशिव पाळू नकादारू पिऊ नकादेवाचे भजन केल्याशिवाय राहू नका’त्यांनी देशाला दिलेला हा संदेश वैज्ञानिक युगातील पिढीला देण्याचे व्रत संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती अध्यापन केंद्रामार्फत अभिरुची कला व क्रीडा मंदिराच्या कलावंतांनी स्वीकारले आहे. त्यांचा हा ४८ वा प्रयोग होता. गाडगेबाबांची कविता प्रा. माणिक देशमुख यांनी हुबेहुब साकारली. या नाटकाचे दिग्दर्शन एम.टी. देशमुख यांनी केले. तर अ‍ॅड. रसिका बडवेकर देशमुख, रविशंकर संगेकर, शिल्पा ढोक, स्वपनील शेळके, अभिजित देशमुख, गजानन संगेकर, प्रकाश गिरणकर, प्रियंका राजनेकर यांनी उत्कृष्ट अभिनय साकारून प्रेक्षकांना जुन्या काळात नेले.