शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
4
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
5
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
6
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
7
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
8
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
9
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
10
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
11
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
12
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
13
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
14
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
16
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
17
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
18
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
19
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
20
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?

‘गुडमॉर्निंग’ पथकाने वसूल केला सात लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:21 IST

नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. या पथकाने मागील दीड वर्षात जिल्हाभरात ५८३ फेऱ्या काढून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांकडून ७ लाख २ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्देदीड वर्षात पथकाच्या ५८३ फेऱ्या : नादुरूस्त असलेली ४३ हजार २४८ शौचालये झाली सज्ज

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. या पथकाने मागील दीड वर्षात जिल्हाभरात ५८३ फेऱ्या काढून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांकडून ७ लाख २ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. यात सर्वात जास्त दंड तिरोडा तालुक्यातील लोकांना बसला आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात आलेला मोहिमेतून ग्रामीण व शहरी भागात घरोघरी शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. पण त्या शौचालयांचा वापर न करता गावकरी उघड्यावर शौच करीत होते. निर्मल ग्राम किंवा निर्मल जिल्हा करण्याच्या नादात जिल्ह्यात ओबड-धोबड शौचालय तयार करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ४४ हजार २२५ शौचालय नादुरूस्त होते. ते नादुरूस्त शौचालय दुरूस्त करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी लागत होता. परंतु तो निधी शासनाने देण्यास नकार दिल्यामुळे जिल्हा परिषदेने मागील दिड वर्षात केलेल्या जनजागृतीमुळे ४३ हजार २४८ शौचालय तयार करण्यात आले आहे.नादुरूस्त असलेले शौचालय सुरू करण्यासाठी सर्वात मोठे प्रयत्न करून एवढे शौचालय सुरू करणारा गोंदिया जिल्हा राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिला जिल्हा आहे. ‘गुडमॉर्निंग’ पथकाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील गावागावांत ५८३ फेऱ्या गुडमॉर्निंग पथकाने मारल्या. यासाठी तालुकास्तरावर १६ गट पाडण्यात आले होते. गुडमॉर्निंेग पथकाच्या जनजागृतीमुळे २१ हजार ३४७ शौचालय लोकांनी स्वयंस्फूर्तीने बांधले आहेत. शौचालयात न जाता उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोकांना दंड ही करण्यात आला. पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत ‘गूडमॉर्निंग’ पथकातील अधिकारी, कर्मचारी व गावकऱ्यांनी पथकासह गावच्या वेशीवर जाऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. इतकेच नव्हे तर गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करण्यात आली. लोकांना शौचालयाचे महत्व पटवून त्यांना शौचालय बांधण्यासाठी बाध्य करण्यात आले.गृहभेटीही ठरल्या प्रभावीशौचालयाचा वापर न करणाºया किंवा ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा २३ हजार ६०८ लोकांच्या घरी स्वच्छ भारत अभियान राबविणाऱ्या लोकांनी भेटी दिल्या. एवढ्या घरांच्या भेटी ४६८ अधिकारी-कर्मचाºयांनी केल्या आहेत. या गृहभेटीची फलश्रृती म्हणजे १४ हजार ५६ लोकांनी आपल्या घरी शौचालय बांधले आहेत. यासाठी १६ ठिकाणी नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच ३१ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे १३१ शिबिर जिल्ह्यात घेण्यात आले. या शिबिरात ३१०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांनीही शौचालय किती महत्वाचे आहे हे शिबिराच्या माध्यमातून लोकांना पटवून दिले.१.८० लाख महिलांना वाणातून स्वच्छतेचा संदेशगोंदिया जिल्ह्यातील लोकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी संक्रांतीच्या हळदीकुंकू व वाणातून १ लाख ८० हजार महिलांपर्यंत शौचालयाचे महत्व पोहचविण्यात आले. १ हजार ७९७ आंगणवाडीमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ही जनजागृती करण्यात आली. वाण म्हणून पतंजलीकडून १ लाख ७३ हजार साबण दिल्या. जिल्हा परिषद कडून वाण म्हणून सॅनिटरी पॅड देण्यात आले. हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरल्याचे जनमाणसात चर्चा आहे.शौचालयासाठी लाभार्थ्यांना १२ हजार रूपये देऊन शौचालयाचे बांधकाम करणे अवघड नाही. मात्र नादुरूस्त शौचालय तयार करणे अत्यंत अवघड होते. त्या दृष्टीने विविध उपक्रम राबवून ते शौचालय तयार करण्याचे कार्य जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आले. विशेष म्हणजे, याची दखल केंद्रस्तरावर घेण्यात आली आहे.-राजेश राठोड, उपमुख्य कार्यपालन अधिकारी, पाणी व स्वच्छता जि.प. गोंदिया.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान