शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

‘गुडमॉर्निंग’ पथकाने वसूल केला सात लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:21 IST

नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. या पथकाने मागील दीड वर्षात जिल्हाभरात ५८३ फेऱ्या काढून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांकडून ७ लाख २ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्देदीड वर्षात पथकाच्या ५८३ फेऱ्या : नादुरूस्त असलेली ४३ हजार २४८ शौचालये झाली सज्ज

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. या पथकाने मागील दीड वर्षात जिल्हाभरात ५८३ फेऱ्या काढून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांकडून ७ लाख २ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. यात सर्वात जास्त दंड तिरोडा तालुक्यातील लोकांना बसला आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात आलेला मोहिमेतून ग्रामीण व शहरी भागात घरोघरी शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. पण त्या शौचालयांचा वापर न करता गावकरी उघड्यावर शौच करीत होते. निर्मल ग्राम किंवा निर्मल जिल्हा करण्याच्या नादात जिल्ह्यात ओबड-धोबड शौचालय तयार करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ४४ हजार २२५ शौचालय नादुरूस्त होते. ते नादुरूस्त शौचालय दुरूस्त करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी लागत होता. परंतु तो निधी शासनाने देण्यास नकार दिल्यामुळे जिल्हा परिषदेने मागील दिड वर्षात केलेल्या जनजागृतीमुळे ४३ हजार २४८ शौचालय तयार करण्यात आले आहे.नादुरूस्त असलेले शौचालय सुरू करण्यासाठी सर्वात मोठे प्रयत्न करून एवढे शौचालय सुरू करणारा गोंदिया जिल्हा राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिला जिल्हा आहे. ‘गुडमॉर्निंग’ पथकाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील गावागावांत ५८३ फेऱ्या गुडमॉर्निंग पथकाने मारल्या. यासाठी तालुकास्तरावर १६ गट पाडण्यात आले होते. गुडमॉर्निंेग पथकाच्या जनजागृतीमुळे २१ हजार ३४७ शौचालय लोकांनी स्वयंस्फूर्तीने बांधले आहेत. शौचालयात न जाता उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोकांना दंड ही करण्यात आला. पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत ‘गूडमॉर्निंग’ पथकातील अधिकारी, कर्मचारी व गावकऱ्यांनी पथकासह गावच्या वेशीवर जाऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. इतकेच नव्हे तर गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करण्यात आली. लोकांना शौचालयाचे महत्व पटवून त्यांना शौचालय बांधण्यासाठी बाध्य करण्यात आले.गृहभेटीही ठरल्या प्रभावीशौचालयाचा वापर न करणाºया किंवा ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा २३ हजार ६०८ लोकांच्या घरी स्वच्छ भारत अभियान राबविणाऱ्या लोकांनी भेटी दिल्या. एवढ्या घरांच्या भेटी ४६८ अधिकारी-कर्मचाºयांनी केल्या आहेत. या गृहभेटीची फलश्रृती म्हणजे १४ हजार ५६ लोकांनी आपल्या घरी शौचालय बांधले आहेत. यासाठी १६ ठिकाणी नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच ३१ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे १३१ शिबिर जिल्ह्यात घेण्यात आले. या शिबिरात ३१०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांनीही शौचालय किती महत्वाचे आहे हे शिबिराच्या माध्यमातून लोकांना पटवून दिले.१.८० लाख महिलांना वाणातून स्वच्छतेचा संदेशगोंदिया जिल्ह्यातील लोकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी संक्रांतीच्या हळदीकुंकू व वाणातून १ लाख ८० हजार महिलांपर्यंत शौचालयाचे महत्व पोहचविण्यात आले. १ हजार ७९७ आंगणवाडीमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ही जनजागृती करण्यात आली. वाण म्हणून पतंजलीकडून १ लाख ७३ हजार साबण दिल्या. जिल्हा परिषद कडून वाण म्हणून सॅनिटरी पॅड देण्यात आले. हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरल्याचे जनमाणसात चर्चा आहे.शौचालयासाठी लाभार्थ्यांना १२ हजार रूपये देऊन शौचालयाचे बांधकाम करणे अवघड नाही. मात्र नादुरूस्त शौचालय तयार करणे अत्यंत अवघड होते. त्या दृष्टीने विविध उपक्रम राबवून ते शौचालय तयार करण्याचे कार्य जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आले. विशेष म्हणजे, याची दखल केंद्रस्तरावर घेण्यात आली आहे.-राजेश राठोड, उपमुख्य कार्यपालन अधिकारी, पाणी व स्वच्छता जि.प. गोंदिया.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान