शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

‘गुडमॉर्निंग’ पथकाने वसूल केला सात लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:21 IST

नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. या पथकाने मागील दीड वर्षात जिल्हाभरात ५८३ फेऱ्या काढून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांकडून ७ लाख २ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्देदीड वर्षात पथकाच्या ५८३ फेऱ्या : नादुरूस्त असलेली ४३ हजार २४८ शौचालये झाली सज्ज

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. या पथकाने मागील दीड वर्षात जिल्हाभरात ५८३ फेऱ्या काढून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांकडून ७ लाख २ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. यात सर्वात जास्त दंड तिरोडा तालुक्यातील लोकांना बसला आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात आलेला मोहिमेतून ग्रामीण व शहरी भागात घरोघरी शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. पण त्या शौचालयांचा वापर न करता गावकरी उघड्यावर शौच करीत होते. निर्मल ग्राम किंवा निर्मल जिल्हा करण्याच्या नादात जिल्ह्यात ओबड-धोबड शौचालय तयार करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ४४ हजार २२५ शौचालय नादुरूस्त होते. ते नादुरूस्त शौचालय दुरूस्त करण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी लागत होता. परंतु तो निधी शासनाने देण्यास नकार दिल्यामुळे जिल्हा परिषदेने मागील दिड वर्षात केलेल्या जनजागृतीमुळे ४३ हजार २४८ शौचालय तयार करण्यात आले आहे.नादुरूस्त असलेले शौचालय सुरू करण्यासाठी सर्वात मोठे प्रयत्न करून एवढे शौचालय सुरू करणारा गोंदिया जिल्हा राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिला जिल्हा आहे. ‘गुडमॉर्निंग’ पथकाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील गावागावांत ५८३ फेऱ्या गुडमॉर्निंग पथकाने मारल्या. यासाठी तालुकास्तरावर १६ गट पाडण्यात आले होते. गुडमॉर्निंेग पथकाच्या जनजागृतीमुळे २१ हजार ३४७ शौचालय लोकांनी स्वयंस्फूर्तीने बांधले आहेत. शौचालयात न जाता उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोकांना दंड ही करण्यात आला. पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत ‘गूडमॉर्निंग’ पथकातील अधिकारी, कर्मचारी व गावकऱ्यांनी पथकासह गावच्या वेशीवर जाऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. इतकेच नव्हे तर गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करण्यात आली. लोकांना शौचालयाचे महत्व पटवून त्यांना शौचालय बांधण्यासाठी बाध्य करण्यात आले.गृहभेटीही ठरल्या प्रभावीशौचालयाचा वापर न करणाºया किंवा ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा २३ हजार ६०८ लोकांच्या घरी स्वच्छ भारत अभियान राबविणाऱ्या लोकांनी भेटी दिल्या. एवढ्या घरांच्या भेटी ४६८ अधिकारी-कर्मचाºयांनी केल्या आहेत. या गृहभेटीची फलश्रृती म्हणजे १४ हजार ५६ लोकांनी आपल्या घरी शौचालय बांधले आहेत. यासाठी १६ ठिकाणी नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच ३१ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे १३१ शिबिर जिल्ह्यात घेण्यात आले. या शिबिरात ३१०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांनीही शौचालय किती महत्वाचे आहे हे शिबिराच्या माध्यमातून लोकांना पटवून दिले.१.८० लाख महिलांना वाणातून स्वच्छतेचा संदेशगोंदिया जिल्ह्यातील लोकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी संक्रांतीच्या हळदीकुंकू व वाणातून १ लाख ८० हजार महिलांपर्यंत शौचालयाचे महत्व पोहचविण्यात आले. १ हजार ७९७ आंगणवाडीमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ही जनजागृती करण्यात आली. वाण म्हणून पतंजलीकडून १ लाख ७३ हजार साबण दिल्या. जिल्हा परिषद कडून वाण म्हणून सॅनिटरी पॅड देण्यात आले. हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरल्याचे जनमाणसात चर्चा आहे.शौचालयासाठी लाभार्थ्यांना १२ हजार रूपये देऊन शौचालयाचे बांधकाम करणे अवघड नाही. मात्र नादुरूस्त शौचालय तयार करणे अत्यंत अवघड होते. त्या दृष्टीने विविध उपक्रम राबवून ते शौचालय तयार करण्याचे कार्य जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आले. विशेष म्हणजे, याची दखल केंद्रस्तरावर घेण्यात आली आहे.-राजेश राठोड, उपमुख्य कार्यपालन अधिकारी, पाणी व स्वच्छता जि.प. गोंदिया.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान