शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

गोंदियात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्यानंतर पाणी टंचाईची संभाव्य स्थिती ओळखून जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वेळीच उपाय योजना केली नाही. परिणामी मागील चार दिवसांपासून शहराला होणार पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. तर गोंदियात प्रथमच पाणी बाणीची स्थिती निर्माण ...

ठळक मुद्देचार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प : पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्यानंतर पाणी टंचाईची संभाव्य स्थिती ओळखून जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वेळीच उपाय योजना केली नाही. परिणामी मागील चार दिवसांपासून शहराला होणार पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. तर गोंदियात प्रथमच पाणी बाणीची स्थिती निर्माण झाली आहे.गोंदिया शहराची लोकसंख्या दोन लाखांवर असून शहराला डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची आहे. प्रती व्यक्ती १३५ लिटर याप्रमाणे मजीप्रा ग्राहकांना दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा करते. मात्र जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले कोरडे पडले आहेत. तसेच भूजल पातळीत सुध्दा घट झाली आहे. तर यंदा वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. त्यामुळे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली. तर गेल्या चार पाच दिवसांपासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच केल्या जात नसल्याने पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. काही भागातील नळाला पाच मिनिटे पाणी येऊन ते बंद होत असल्याने दैनदिन वापरासाठी दूरवरुन पाणी आणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. शहरातील अनेक भागातील बोअरवेल नादुरुस्त आहेत तर सार्वजनिक विहिरींमधील गाळांचा उपसा न केल्याने त्यांनी देखील तळ गाठल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील काही मोजक्या विहिरी आणि बोअरवेलवर महिलांची पाण्यासाठी गर्दी असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मागील २० ते २५ वर्षांत प्रथमच शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले असून याला जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जबाबदार असल्याची ओरड शहरवासीयांची आहे.उपाययोजनेकडे दुर्लक्षभूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हा प्रशासन आणि मजीप्रा यांना दिलेल्या अहवालानुसार यंदा शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता होती. त्या दृष्टीने या दोन्ही विभागाने उपाय योजना करण्याची गरज होती. मात्र वेळ पडल्यास पुजारीटोला धरणाचे पाणी आणून शहरवासीयांची तहान भागवू असे घसा कोरडा पडेपर्यंत या दोन्ही विभागाच्या अधिनस्त अधिकाºयांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात वेळीच कुठलीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे.

टॅग्स :Waterपाणी