शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गोंदियात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्यानंतर पाणी टंचाईची संभाव्य स्थिती ओळखून जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वेळीच उपाय योजना केली नाही. परिणामी मागील चार दिवसांपासून शहराला होणार पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. तर गोंदियात प्रथमच पाणी बाणीची स्थिती निर्माण ...

ठळक मुद्देचार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प : पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्यानंतर पाणी टंचाईची संभाव्य स्थिती ओळखून जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वेळीच उपाय योजना केली नाही. परिणामी मागील चार दिवसांपासून शहराला होणार पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. तर गोंदियात प्रथमच पाणी बाणीची स्थिती निर्माण झाली आहे.गोंदिया शहराची लोकसंख्या दोन लाखांवर असून शहराला डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची आहे. प्रती व्यक्ती १३५ लिटर याप्रमाणे मजीप्रा ग्राहकांना दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा करते. मात्र जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले कोरडे पडले आहेत. तसेच भूजल पातळीत सुध्दा घट झाली आहे. तर यंदा वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. त्यामुळे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली. तर गेल्या चार पाच दिवसांपासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच केल्या जात नसल्याने पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. काही भागातील नळाला पाच मिनिटे पाणी येऊन ते बंद होत असल्याने दैनदिन वापरासाठी दूरवरुन पाणी आणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. शहरातील अनेक भागातील बोअरवेल नादुरुस्त आहेत तर सार्वजनिक विहिरींमधील गाळांचा उपसा न केल्याने त्यांनी देखील तळ गाठल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील काही मोजक्या विहिरी आणि बोअरवेलवर महिलांची पाण्यासाठी गर्दी असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मागील २० ते २५ वर्षांत प्रथमच शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले असून याला जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जबाबदार असल्याची ओरड शहरवासीयांची आहे.उपाययोजनेकडे दुर्लक्षभूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हा प्रशासन आणि मजीप्रा यांना दिलेल्या अहवालानुसार यंदा शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता होती. त्या दृष्टीने या दोन्ही विभागाने उपाय योजना करण्याची गरज होती. मात्र वेळ पडल्यास पुजारीटोला धरणाचे पाणी आणून शहरवासीयांची तहान भागवू असे घसा कोरडा पडेपर्यंत या दोन्ही विभागाच्या अधिनस्त अधिकाºयांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात वेळीच कुठलीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे.

टॅग्स :Waterपाणी