शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गोंदियात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्यानंतर पाणी टंचाईची संभाव्य स्थिती ओळखून जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वेळीच उपाय योजना केली नाही. परिणामी मागील चार दिवसांपासून शहराला होणार पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. तर गोंदियात प्रथमच पाणी बाणीची स्थिती निर्माण ...

ठळक मुद्देचार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प : पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्यानंतर पाणी टंचाईची संभाव्य स्थिती ओळखून जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वेळीच उपाय योजना केली नाही. परिणामी मागील चार दिवसांपासून शहराला होणार पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. तर गोंदियात प्रथमच पाणी बाणीची स्थिती निर्माण झाली आहे.गोंदिया शहराची लोकसंख्या दोन लाखांवर असून शहराला डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची आहे. प्रती व्यक्ती १३५ लिटर याप्रमाणे मजीप्रा ग्राहकांना दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा करते. मात्र जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले कोरडे पडले आहेत. तसेच भूजल पातळीत सुध्दा घट झाली आहे. तर यंदा वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. त्यामुळे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली. तर गेल्या चार पाच दिवसांपासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच केल्या जात नसल्याने पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. काही भागातील नळाला पाच मिनिटे पाणी येऊन ते बंद होत असल्याने दैनदिन वापरासाठी दूरवरुन पाणी आणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. शहरातील अनेक भागातील बोअरवेल नादुरुस्त आहेत तर सार्वजनिक विहिरींमधील गाळांचा उपसा न केल्याने त्यांनी देखील तळ गाठल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील काही मोजक्या विहिरी आणि बोअरवेलवर महिलांची पाण्यासाठी गर्दी असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मागील २० ते २५ वर्षांत प्रथमच शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले असून याला जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जबाबदार असल्याची ओरड शहरवासीयांची आहे.उपाययोजनेकडे दुर्लक्षभूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हा प्रशासन आणि मजीप्रा यांना दिलेल्या अहवालानुसार यंदा शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता होती. त्या दृष्टीने या दोन्ही विभागाने उपाय योजना करण्याची गरज होती. मात्र वेळ पडल्यास पुजारीटोला धरणाचे पाणी आणून शहरवासीयांची तहान भागवू असे घसा कोरडा पडेपर्यंत या दोन्ही विभागाच्या अधिनस्त अधिकाºयांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात वेळीच कुठलीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे.

टॅग्स :Waterपाणी