शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:48 IST

यंदा कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देहेमंत पटले : पालकमंत्री, सहकारमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे भविष्यात शेतकºयांच्या सक्षमीकरणासाठी जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्री राजकुमार बडोले व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून निवेदनही देण्यात आले आहे.निवेदनानुसार, यंदा जिल्ह्यातील ३५ टक्के शेतकºयांनी सिंचनाअभावी पेरणीच केली नाही. त्यातच कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम पेरणीवर झाला असून किडींच्या प्रादुर्भावामुळे ते धानपिकही शेतकºयांच्या हातून जाण्याच्या मार्गावर आहे. यातच अवकाळी पावसाने हातात असलेल्या धानपिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदील झाला आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह पुढील हंगामाच्या चिंतेत जिल्ह्यातील शेतकरी आहे. याशिवाय यंदा सरासरीत ५५ टक्केच पाऊस पडल्याने नैसर्गिक जलस्त्रोतात जलसाठा अत्यल्प आहे. अशावेळी भविष्यातील नियोजनाकरिता शासनाने वेळीच दखल घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकºयांना व त्यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे तातडीची आर्थिक मदत व सेवा पुरविण्यात यावी.