शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर; तापमान ४३.५ अंशावर, नवतपानंतर जास्त ताप

By कपिल केकत | Updated: June 3, 2023 19:54 IST

२५ मे पासून सुरू झालेला नवतपा शुक्रवारी (दि.२) संपला असून यंदा नवतपाने जिल्हावासीयांना चांगलाच ताप दिला.

गोंदिया : २५ मे पासून सुरू झालेला नवतपा शुक्रवारी (दि.२) संपला असून यंदा नवतपाने जिल्हावासीयांना चांगलाच ताप दिला. मात्र नवतपा संपल्यानंतर जिल्हा अधिक तापत असल्याचे शनिवारी (दि.३) आले. कारण, शनिवारी जिल्ह्याचे तापमान ४३.५ अंशांवर पोहोचले होते व जिल्हा विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर होता. जून महिना लागला असून तापमान वाढत चालले असल्याने जिल्हावासीयांचा जीव कासावीस होत आहे. आता त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून फक्त पावसाची वाट पाहत आहेत.

यंदा मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे दोन महिने पाहिजे तसा उन्हाळा तापला नाही. एप्रिल महिन्यातील मोजकेच दिवस तापमान वाढले होते व बहुतांश महिना पावसातच गेला होता. परिणामी सूर्यदेव जिल्ह्यावर तापू शकले नाहीत. मात्र मे महिना लागताच अवकाळी पावसाने जिल्ह्यातून पाय काढला व सूर्याने आपला हिशेब बरोबर केला. अवघ्या मे महिन्यात चांगलेच ऊन तापल्याने मार्च व एप्रिल महिन्यातील कसरही निघून गेली. विशेष म्हणजे, तापमान ४१-४१ अंशांच्या घरात असले तरीही उकाड्याने नागरिकांचे जास्त हाल झाले.

त्यात नवतपानेही चांगलेच भाजून काढले असतानाच शनिवारी (दि.२) नवतपा संपूनही तापमान उलट वाढताना दिसत आहे. शनिवारी जिल्ह्याचे तापमान ४३.५ अंशावर होते. विशेष म्हणजे, सर्वाधिक तापमान अमरावतीचे ४३.६ अंशांवर असल्याने गोंदिया जिल्हा विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर होता.

२० एप्रिल रोजी होते ४३.५ अंश तापमान- जिल्ह्याचे तापमान यंदा सातत्याने ४१-४२ अंशांतच नोंदले गेले आहे. मात्र उकाड्यामुळे जिल्हावासीयांना जास्त त्रास सहन करावा लागला आहे. अशात शनिवारी (दि.३) जिल्ह्याचे तापमान दुसऱ्यांदा ४३.५ अंशावर पोहोचले व ते सर्वाधिक असल्याचे दिसले. यापूर्वी २० एप्रिल रोजी जिल्ह्याचे तापमान ४३.५ अंशांवर गेले होते व तेव्हाही जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता.

हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज नाहीचजून महिना लागला असून तीन दिवस लोटले आहेत. मात्र त्यानंतरही अद्यापपर्यंत जिल्ह्यात पावसाचे काहीच चिन्ह दिसत नाही. उलट लगतच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावत आहे. तर जिल्ह्याचे तापमान सातत्याने वाढत असून उन्हाळ्याने काही पाठ सोडलेली नाही. त्यात हवामान खात्याकडूनही पावसाचा काहीच अंदाज वर्तविण्यात आलेला नाही.

विदर्भातील प्रथम पाच क्रमांकावरील जिल्हेजिल्हा- तापमान

  1. अमरावती- ४३.६
  2. गोंदिया- ४३.५
  3. वर्धा व अकोला- ४३.४
  4. चंद्रपूर- ४३.२
  5. ब्रह्मपुरी- ४२.८ 
टॅग्स :gondiya-acगोंदिया