शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

गोंदिया रेल्वे स्थानकावर मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 21:55 IST

पंधरा दिवसांपूर्वीच मुंबई येथील रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळून चार जणांना आपला जीव गमावावा लागला होता.अशाच घटनेची पुनरावृत्ती गोंदिया रेल्वे स्थानकावर सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देगर्दीच्या तुलनेत पादचारी पूल अरुंद : रेल्वे विभागाचे तंत्र चुकले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंधरा दिवसांपूर्वीच मुंबई येथील रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळून चार जणांना आपला जीव गमावावा लागला होता.अशाच घटनेची पुनरावृत्ती गोंदिया रेल्वे स्थानकावर सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ५ वरील पादचारी पूल फारच अरुंद असून प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात येथे सुध्दा मुंबईच्या घटनेची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हावडा-मुंबई मार्गावरील एक मुख्य रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले जाते. शिवाय दक्षिण मध्य पूर्व रेल्वे विभागात सर्वाधिक महसूल सुध्दा या रेल्वे स्थानकावरुन मिळतो.दररोज दीडशेच्या आसपास रेल्वे गाड्या या रेल्वे स्थानकावरुन धावतात. तर दहा ते पंधरा हजार प्रवाशी दररोज या रेल्वे स्थानकावरुन ये-जा करतात. छत्तीसगड, मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची सुध्दा या रेल्वे स्थानकावर वर्दळ असते. प्रवाशी आणि रेल्वे गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेवून रेल्वे विभागाने गोंदिया रेल्वे स्थानकाचा विकास करीत फलाटांची संख्या वाढविली. सध्या या रेल्वे स्थानकावर एकूण ५ फलाट आहे. या प्रत्येक फलाटावर प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून पादचारी पूल व लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काहीच महिन्यापूर्वी रेल्वे विभागाने फलाट क्रमांक ५ वर पादचारी पूल तयार केला. मात्र हा पूल फारच अरुंद असून बरेचदा पुलावरुन प्रवाशांची कोंडी होत असते. या फलाटावर विदर्भ एक्स्प्रेस, गोंदिया-बालाघाट, महाराष्टÑ एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या थांबतात. विदर्भ एक्सप्रेसने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असून ही गाडी आल्यानंतर या पुलावर प्रचंड गर्दी होती.त्यामुळे या पुलावरुन रेल्वे स्थानकाबाहेर पडण्यास पंधरा ते वीस मिनिटे लागतात.जेव्हा की हे अंतर केवळ पाच ते सात मिनिटाचे आहे. या पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कधी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. बºयाच प्रवाशांनी ही बाब रेल्वे विभागाच्या लक्षात आणून दिली. मात्र अद्यापही यावर कुठलीच उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे पादचारी पुलाचा धोका कायम आहे.

टॅग्स :railwayरेल्वे