शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

गोंदिया रेल्वे स्थानकावर मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 21:55 IST

पंधरा दिवसांपूर्वीच मुंबई येथील रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळून चार जणांना आपला जीव गमावावा लागला होता.अशाच घटनेची पुनरावृत्ती गोंदिया रेल्वे स्थानकावर सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देगर्दीच्या तुलनेत पादचारी पूल अरुंद : रेल्वे विभागाचे तंत्र चुकले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंधरा दिवसांपूर्वीच मुंबई येथील रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळून चार जणांना आपला जीव गमावावा लागला होता.अशाच घटनेची पुनरावृत्ती गोंदिया रेल्वे स्थानकावर सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ५ वरील पादचारी पूल फारच अरुंद असून प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात येथे सुध्दा मुंबईच्या घटनेची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हावडा-मुंबई मार्गावरील एक मुख्य रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले जाते. शिवाय दक्षिण मध्य पूर्व रेल्वे विभागात सर्वाधिक महसूल सुध्दा या रेल्वे स्थानकावरुन मिळतो.दररोज दीडशेच्या आसपास रेल्वे गाड्या या रेल्वे स्थानकावरुन धावतात. तर दहा ते पंधरा हजार प्रवाशी दररोज या रेल्वे स्थानकावरुन ये-जा करतात. छत्तीसगड, मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची सुध्दा या रेल्वे स्थानकावर वर्दळ असते. प्रवाशी आणि रेल्वे गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेवून रेल्वे विभागाने गोंदिया रेल्वे स्थानकाचा विकास करीत फलाटांची संख्या वाढविली. सध्या या रेल्वे स्थानकावर एकूण ५ फलाट आहे. या प्रत्येक फलाटावर प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून पादचारी पूल व लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काहीच महिन्यापूर्वी रेल्वे विभागाने फलाट क्रमांक ५ वर पादचारी पूल तयार केला. मात्र हा पूल फारच अरुंद असून बरेचदा पुलावरुन प्रवाशांची कोंडी होत असते. या फलाटावर विदर्भ एक्स्प्रेस, गोंदिया-बालाघाट, महाराष्टÑ एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या थांबतात. विदर्भ एक्सप्रेसने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असून ही गाडी आल्यानंतर या पुलावर प्रचंड गर्दी होती.त्यामुळे या पुलावरुन रेल्वे स्थानकाबाहेर पडण्यास पंधरा ते वीस मिनिटे लागतात.जेव्हा की हे अंतर केवळ पाच ते सात मिनिटाचे आहे. या पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कधी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. बºयाच प्रवाशांनी ही बाब रेल्वे विभागाच्या लक्षात आणून दिली. मात्र अद्यापही यावर कुठलीच उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे पादचारी पुलाचा धोका कायम आहे.

टॅग्स :railwayरेल्वे