शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

गोंदिया रेल्वे स्थानकावर मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 21:55 IST

पंधरा दिवसांपूर्वीच मुंबई येथील रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळून चार जणांना आपला जीव गमावावा लागला होता.अशाच घटनेची पुनरावृत्ती गोंदिया रेल्वे स्थानकावर सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देगर्दीच्या तुलनेत पादचारी पूल अरुंद : रेल्वे विभागाचे तंत्र चुकले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंधरा दिवसांपूर्वीच मुंबई येथील रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल कोसळून चार जणांना आपला जीव गमावावा लागला होता.अशाच घटनेची पुनरावृत्ती गोंदिया रेल्वे स्थानकावर सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ५ वरील पादचारी पूल फारच अरुंद असून प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात येथे सुध्दा मुंबईच्या घटनेची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हावडा-मुंबई मार्गावरील एक मुख्य रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले जाते. शिवाय दक्षिण मध्य पूर्व रेल्वे विभागात सर्वाधिक महसूल सुध्दा या रेल्वे स्थानकावरुन मिळतो.दररोज दीडशेच्या आसपास रेल्वे गाड्या या रेल्वे स्थानकावरुन धावतात. तर दहा ते पंधरा हजार प्रवाशी दररोज या रेल्वे स्थानकावरुन ये-जा करतात. छत्तीसगड, मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांची सुध्दा या रेल्वे स्थानकावर वर्दळ असते. प्रवाशी आणि रेल्वे गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेवून रेल्वे विभागाने गोंदिया रेल्वे स्थानकाचा विकास करीत फलाटांची संख्या वाढविली. सध्या या रेल्वे स्थानकावर एकूण ५ फलाट आहे. या प्रत्येक फलाटावर प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून पादचारी पूल व लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काहीच महिन्यापूर्वी रेल्वे विभागाने फलाट क्रमांक ५ वर पादचारी पूल तयार केला. मात्र हा पूल फारच अरुंद असून बरेचदा पुलावरुन प्रवाशांची कोंडी होत असते. या फलाटावर विदर्भ एक्स्प्रेस, गोंदिया-बालाघाट, महाराष्टÑ एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या थांबतात. विदर्भ एक्सप्रेसने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असून ही गाडी आल्यानंतर या पुलावर प्रचंड गर्दी होती.त्यामुळे या पुलावरुन रेल्वे स्थानकाबाहेर पडण्यास पंधरा ते वीस मिनिटे लागतात.जेव्हा की हे अंतर केवळ पाच ते सात मिनिटाचे आहे. या पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कधी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. बºयाच प्रवाशांनी ही बाब रेल्वे विभागाच्या लक्षात आणून दिली. मात्र अद्यापही यावर कुठलीच उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे पादचारी पुलाचा धोका कायम आहे.

टॅग्स :railwayरेल्वे