शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

गोंदियात सात हजार क्विंटल धानाला केवळ ताडपत्र्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 12:34 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या एकूण १०० धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी केली जाते. मात्र खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी शासनाने या विभागाला अद्यापही गोदामे उपलब्ध करुन दिली नाही.

ठळक मुद्दे१२ वर्षांपासून गोदामांचा केवळ प्रस्तावचदरवर्षी लाखो रुपयांचे नुकसानशासनाचे केवळ पोकळ आश्वासन

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या एकूण १०० धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी केली जाते. यंदा आदिवासी विकास महामंडळाने खरीप आणि रब्बी हंगामात एकूण १३ लाख २७ हजार क्विंटल धान खरेदी केली. खरेदी केलेल्या धानाची एकूण किमत २३२ कोटी २६ लाख रुपये आहे. मात्र खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी शासनाने या विभागाला अद्यापही गोदामे उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा धान जिल्ह्यात ठिकठिकाणी उघड्यावर पडून आहे.ही परिस्थिती दरवर्षीच आहे.आदिवासी भागातील शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा त्यांची फसवणूक होवू नये यासाठी आदिवासी विकास महामंडळातंर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करुन हमीभावाने धान खरेदी केली जाते. दरवर्षी या विभागाला खरेदी केलेला धान गोदामांअभावी उघड्यावरच ठेवावा लागतो. त्यामुळे पाऊस व इतर कारणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र यानंतरही हा विभाग आणि शासनाने कसलाच धडा घेतला नाही. यंदा आदिवासी विकास महामंडळाने खरीप आणि रब्बी हंगामात एकूण १३ लाख २७ हजार क्विंटल विक्रमी धान खरेदी केली. खरेदी केलेल्या संपूर्ण धानाची किमत २३२ कोटी २६ लाख रुपये आहे. मात्र हा सर्व धान ठेवण्यासाठी या विभागातर्फेभाड्याने गोदामे घेण्याची सुध्दा तरतूद नाही. तर मागील दहा बारा वर्षांपासून गोदामांचा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडला आहे. या प्रस्तावरील धूळ झटकून गोदामांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अद्याप कुणीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे खरेदी केलेला कोट्यवधी रुपयांचा धान तसाच ताडपत्र्या झाकून मोकळ्या जागेवर ठेवण्याची वेळ आली आहे. या विभागातंर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाची राईस मिलर्ससह करार करुन भरडाई तयार केली जाते.राईस मिलर्स धानाची भरडाई करुन तांदूळ संबंधित विभागाकडे जमा करतात. आदिवासी विकास महामंडळाने आत्तापर्यंत खरेदी केलेल्या एकूण १३ लाख २७ हजार क्विंटल धानापैकी ६ हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्याचे आदेश राईस मिलर्स देण्यात आले आहे. तर उर्वरित ७ हजार क्विंटल धान अद्यापही तसाच उघड्यावर ताडपत्र्या झाकून ठेवला असल्याचे आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले.बारा वर्षांत पन्नास प्रस्तावआदिवासी विकास महामंडळातंर्गत खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी गोदाम बांधण्यात यावे,अथवा भाडेतत्त्वावर घेण्यात यावे. यासंबंधिचे जवळपास ५० प्रस्ताव मागील बारा वर्षांत शासनाकडे पाठविण्यात आले. मात्र अद्यापही या प्रस्तावांचा विचार झाला नसल्याने कोट्यवधी रुपयांचा धान केवळ ताडपत्र्यांच्या भरोश्यावर उघड्यावर पडला आहे.

सुरक्षा रक्षकांचा अभावआदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला धान ताडपत्र्या झाकून उघड्यावर ठेवण्यात आला आहे. धानाची सुरक्षा करण्यासाठी एखाद्या सुरक्षा रक्षकाची सुध्दा नियुक्ती केली नाही. त्यामुळे जनावरांकडून सुध्दा मोठ्या प्रमाणात धानाची नासधूस होते. तर काही धान चोरीला सुध्दा जात असल्याचे बोलल्या जाते. मात्र याचे शासनाला कसलेच सोयरसुतक नाही.

४३ गोदामांची गरजआदिवासी विकास महामंडळातंर्गत ४३ धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून हमीभावानुसार जिल्ह्यात धान खरेदी केली जाते. मात्र खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी गोदामांची व्यवस्था नाही. त्यामुळे या विभागाने जिल्ह्यात १० हजार मेट्रीक टन क्षमतेचे ४३ गोदाम बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी शासनाकडे केली होती. पण यावर अद्यापही कुठलाच विचार झाला नसल्याने गोदामांची समस्या कायम असून दरवर्षी धानाचे नुकसान होत आहे.

टॅग्स :agricultureशेती